शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

नात्यात लग्न करताना सावधान; अपत्याला या आजारांचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2023 19:33 IST

Nagpur News नात्यात लग्न करताय तर आताच सावधान व्हा. अशा लग्नामुळे आनुवंशिक आजाराचे प्रमाण वाढते.

नागपूर : अनेक वर्षांपासून जवळच्या नात्यामध्ये लग्न करण्याची परंपरा आहे. धर्म आणि कायद्याचीही अशा लग्नाला मान्यता आहे. त्यात मामाची मुलगी- आत्याचा मुलगा यांच्यातील लग्नाचे प्रमाण खूप जास्त आहे; परंतु नात्यात लग्न करताय तर आताच सावधान व्हा. अशा लग्नामुळे आनुवंशिक आजाराचे प्रमाण वाढते.

वंशपरंपरेने किंवा आनुवंशिकतेने जनुकांद्वारे मात्या- पित्याकडून अनेक शारीरिक वैशिष्ट्ये, गुणधर्म प्राप्त होत असतात. यामुळे जवळच्या नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांना होणाऱ्या अपत्यात आरोग्यविषयक समस्या जास्त उद्भवू शकतात. एका पिढीतून पुढच्या पिढीत त्याचे परिणाम जास्त दिसून येतात.

-नात्यात लग्न नकोच

काका, मामा, पुतणी, मावसबहीण यांच्यातील विवाह, मावस किंवा चुलत भाऊ बहिणीमधील विवाह किंवा मामाची मुलगी व आत्याच्या मुलामधील विवाह. याशिवाय थेट रक्ताचे नाते असलेल्यांमध्ये विवाह झाल्यास त्याला वैद्यकीय भाषेत ‘कॉनसॅनग्यूनस मॅरेज’ असे म्हणतात. नात्यात झालेल्या लग्नातून होणाऱ्या अपत्यामध्ये गतिमंदतेसह इतर आजारांचा धोका असतो.

-या आजारांचा धोका

:: नात्यात लग्न केल्याने प्रजननशक्तीवर परिणाम होऊ शकतो.

:: गर्भपाताचे प्रमाण वाढू शकते.

:: ‘स्टील बर्थ’ म्हणजे गर्भात बाळाचा मृत्यू होऊ शकतो.

:: इतर मुलांच्या तुलनेत मुलाचा बुद्ध्यांक कमी होऊ शकतो.

:: परंतु ज्यांचे नात्यात लग्न झालेले आहे त्यांनी घाबरून जाऊ नये. जेनिटिक कौन्सिलर किंवा आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांना या विषयी माहिती द्यावी. आनुवंशिक आजार टाळण्यासाठी काळजी घ्यावी.

-‘थॅलेसेमिया’चाही धोका

दोन ‘थॅलेसेमिया मायनर’ पीडित स्त्री-पुरुष यांच्यापासून जन्म घेणारे अपत्ये अत्यंत घातक थॅलेसेमिया पीडित होऊ शकते. ज्यामुळे जीवहानी होण्याची भीती असते. याकरिता प्रत्येक व्यक्तीने विवाहपूर्व किंवा ज्या विवाहित स्त्री-पुरुष अपत्यासाठी इच्छुक आहेत, अशा व्यक्तींना ‘थॅलेसेमिया मायनर’ची रक्त चाचणी करणे अत्यंत आवश्यक आहे. ‘थॅलेसेमिया मेजर’ या रोगाने पीडित मुले शरीरात रक्त कमी असल्या कारणाने पिवळी पडतात. भूक, वजन आणि शारीरिक हालचाल कमी असल्याने शारीरिक विकासही कमी होतो. शरीरात रक्ताची कमतरता असल्याने अशा रुग्णांना वेळोवेळी रक्त पुरवठा करण्याची गरज भासते. या रोगाचा उपचार खूप कठीण आणि खर्चिक आहे.

- नात्यात लग्न टाळलेलेच बरे

जवळच्या नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांना होणाऱ्या अपत्यात आनुवंशिक आजाराचे प्रमाण जास्त असते. यात रक्तविकारांसह मेंदू व मांसपेशी संदर्भातील आजार होण्याचा धोका असतो. विशेषत: सिकलसेल व थॅलेसेमिया आजाराचा धोका वाढतो. यामुळे शक्यतो जवळच्या नात्यात लग्न टाळलेलेच बरे. लग्न झाले असले तर अपत्य होण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

-डॉ. दीप्ती चांद, प्रमुख मेडिसिन विभाग, मेयो

टॅग्स :Healthआरोग्यmarriageलग्न