शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नात्यात लग्न करताना सावधान; अपत्याला या आजारांचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2023 19:33 IST

Nagpur News नात्यात लग्न करताय तर आताच सावधान व्हा. अशा लग्नामुळे आनुवंशिक आजाराचे प्रमाण वाढते.

नागपूर : अनेक वर्षांपासून जवळच्या नात्यामध्ये लग्न करण्याची परंपरा आहे. धर्म आणि कायद्याचीही अशा लग्नाला मान्यता आहे. त्यात मामाची मुलगी- आत्याचा मुलगा यांच्यातील लग्नाचे प्रमाण खूप जास्त आहे; परंतु नात्यात लग्न करताय तर आताच सावधान व्हा. अशा लग्नामुळे आनुवंशिक आजाराचे प्रमाण वाढते.

वंशपरंपरेने किंवा आनुवंशिकतेने जनुकांद्वारे मात्या- पित्याकडून अनेक शारीरिक वैशिष्ट्ये, गुणधर्म प्राप्त होत असतात. यामुळे जवळच्या नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांना होणाऱ्या अपत्यात आरोग्यविषयक समस्या जास्त उद्भवू शकतात. एका पिढीतून पुढच्या पिढीत त्याचे परिणाम जास्त दिसून येतात.

-नात्यात लग्न नकोच

काका, मामा, पुतणी, मावसबहीण यांच्यातील विवाह, मावस किंवा चुलत भाऊ बहिणीमधील विवाह किंवा मामाची मुलगी व आत्याच्या मुलामधील विवाह. याशिवाय थेट रक्ताचे नाते असलेल्यांमध्ये विवाह झाल्यास त्याला वैद्यकीय भाषेत ‘कॉनसॅनग्यूनस मॅरेज’ असे म्हणतात. नात्यात झालेल्या लग्नातून होणाऱ्या अपत्यामध्ये गतिमंदतेसह इतर आजारांचा धोका असतो.

-या आजारांचा धोका

:: नात्यात लग्न केल्याने प्रजननशक्तीवर परिणाम होऊ शकतो.

:: गर्भपाताचे प्रमाण वाढू शकते.

:: ‘स्टील बर्थ’ म्हणजे गर्भात बाळाचा मृत्यू होऊ शकतो.

:: इतर मुलांच्या तुलनेत मुलाचा बुद्ध्यांक कमी होऊ शकतो.

:: परंतु ज्यांचे नात्यात लग्न झालेले आहे त्यांनी घाबरून जाऊ नये. जेनिटिक कौन्सिलर किंवा आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांना या विषयी माहिती द्यावी. आनुवंशिक आजार टाळण्यासाठी काळजी घ्यावी.

-‘थॅलेसेमिया’चाही धोका

दोन ‘थॅलेसेमिया मायनर’ पीडित स्त्री-पुरुष यांच्यापासून जन्म घेणारे अपत्ये अत्यंत घातक थॅलेसेमिया पीडित होऊ शकते. ज्यामुळे जीवहानी होण्याची भीती असते. याकरिता प्रत्येक व्यक्तीने विवाहपूर्व किंवा ज्या विवाहित स्त्री-पुरुष अपत्यासाठी इच्छुक आहेत, अशा व्यक्तींना ‘थॅलेसेमिया मायनर’ची रक्त चाचणी करणे अत्यंत आवश्यक आहे. ‘थॅलेसेमिया मेजर’ या रोगाने पीडित मुले शरीरात रक्त कमी असल्या कारणाने पिवळी पडतात. भूक, वजन आणि शारीरिक हालचाल कमी असल्याने शारीरिक विकासही कमी होतो. शरीरात रक्ताची कमतरता असल्याने अशा रुग्णांना वेळोवेळी रक्त पुरवठा करण्याची गरज भासते. या रोगाचा उपचार खूप कठीण आणि खर्चिक आहे.

- नात्यात लग्न टाळलेलेच बरे

जवळच्या नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांना होणाऱ्या अपत्यात आनुवंशिक आजाराचे प्रमाण जास्त असते. यात रक्तविकारांसह मेंदू व मांसपेशी संदर्भातील आजार होण्याचा धोका असतो. विशेषत: सिकलसेल व थॅलेसेमिया आजाराचा धोका वाढतो. यामुळे शक्यतो जवळच्या नात्यात लग्न टाळलेलेच बरे. लग्न झाले असले तर अपत्य होण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

-डॉ. दीप्ती चांद, प्रमुख मेडिसिन विभाग, मेयो

टॅग्स :Healthआरोग्यmarriageलग्न