शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सावधान! परत येतोय स्क्रब टायफस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 12:01 IST

Health Scrub typhus या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने व तो लांबत असल्याने स्क्रब टायफस या आजाराचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठळक मुद्देमेडिकलमध्ये सहा रुग्णांची नोंद २०१८ मध्ये २९ जणांचा घेतला होता बळी

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाची दहशत कमी होत नाही तोच स्क्रब टायफसने डोके वर काढले आहे. सध्या सहा रुग्ण मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत. २०१८ मध्ये या आजाराचे १५५ रुग्ण आढळून आले होते. तर २९ रुग्णांचा जीव गेला होता. या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने व तो लांबत असल्याने या आजाराचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.'चिगर माइट्स'मधील 'ओरिएन्शिया सुसुगामुशी' जंतू मानवी शरीरात प्रवेश केल्याने 'स्क्रब टायफस' होतो. हे 'माईट्स' उंदराच्या शरीरावर चिकटून राहतात, त्याच्या रक्तावर वाढतात. पावसाळ्याच्या दिवसात उंदराच्या बिळात पाणी शिरले की ते बिळाबाहेर येतात. त्यांच्या शरीरावरील 'माइट्स' हे उंच गवत, शेतात, झाडी-झुडपात पसरतात. या जीवाणूच्या संपर्कात जी व्यक्ती येते त्याच्या त्वचेवर चिकटून बसतात. मानवी शरीरातील पेशींना ते द्रवरूपात रूपांतर करून ओढून घेतात. त्यांच्यातील 'ओरिएन्शिया सुसुगामुशी' जंतू मानवी शरीरात प्रवेश करतात. चावण्याच्या ठिकाणी दुखत नाही. यामुळे काही चावल्याचे भान राहत नाही. चावलेल्या ठिकाणी व्रण येतो. ज्याला 'इशर' म्हणतात. हा 'इशर' या आजाराची ओळख आहे. परंतु सर्वांमध्ये 'इशर' दिसूनच येईल, असे नाही. या आजारावर औषधी नाही. यामुळे तातडीने निदान होऊन उपचार घेणे आवश्यक असते.५० टक्के रुग्णांना मृत्यूचा धोकास्क्रब टायफसच्या ५० टक्के रुग्णांना यकृतासह न्युमोनियाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. शिवाय, कावीळ व श्वसनाचा त्रास होण्याचा धोका असतो. साधारण २५ टक्के रुग्णांना मेंदूचा आजार होतो. अनेकांच्या रक्तातील प्लेटलेट्स आणि पांढऱ्या पेशी कमी होतात. योग्य उपचार मिळाले नाही, तर ५० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो.ही आहेत लक्षणेया आजारात सुरुवातीला ताप, कोरडा खोकला, डोकेदुखी, हातपाय दुखणे, मळमळ, उलट्या, चालताना तोल जाणे, लालसर पुरळ येणे आणि इतर तापाच्या रोगासारखी लक्षणे आढळतात. परंतु ४० टक्के लोकांमध्ये ही लक्षणे दिसतीलच असे नाही. यामुळे रुग्ण गंभीर होण्यापूर्वीच ही लक्षणे दिसणाऱ्या रुग्णाला 'डॉक्सिसायक्लिन' किंवा 'टिट्रासायक्लीन' गोळ्या दिल्या जातात.रुग्णांची प्रकृती स्थिरसध्या रुग्णालयात 'स्क्रब टायफस'चे सहा रुग्ण उपचार घेत असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. स्क्रब टायफसचे लवकर निदान व उपचार मिळाल्यास मृत्यूचा धोका कमी होतो.-डॉ. राजेश गोसावीप्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग, मेडिकल

टॅग्स :Healthआरोग्य