शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

रामजन्मभूमीच्या लढ्यात रा.स्व. संघाचा मौलिक सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 10:57 IST

श्रीराम मंदिरासंदर्भात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत १९५९ साली अधिकृत प्रस्ताव मांडण्यात आला होता हे विशेष.

ठळक मुद्दे१९५९ साली मांडला होता प्रस्ताव कायदेशीर लढ्यासोबत लोकचळवळीत योगदान

योगेश पांडेनागपूर :  देशभरातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्वातंत्र्यानंतर या लढ्याला संघाने हरतऱ्हेने पाठबळ दिले व विविध पातळ्यांवर मौलिक सहभाग दर्शविला. मंदिरासंदर्भात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत १९५९ साली अधिकृत प्रस्ताव मांडण्यात आला होता हे विशेष.५ ऑगस्ट रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. संघाची मंदिराच्या लढ्यात मौलिक भूमिका राहिली. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या कार्यकाळात १९५९ मध्ये सर्वात अगोदर देशातील मंदिरांवर झालेले आक्रमण यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला होता. उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांचे समाजात सहिष्णूता कायम ठेवत पुनर्निर्माण व्हावे अशी भूमिका यात संघाने मांडली होती. मात्र त्यावेळी अयोध्येतील राममंदिरापेक्षा काशी विश्वनाथ मंदिरावर जास्त भर होता.

त्यानंतर सुमारे दोन दशके संघातर्फे कुठलाही अधिकृत प्रस्ताव मांडण्यात आला नाही. मात्र विश्व हिंदू परिषद व इतर संघटनांच्या माध्यमातून मंदिराच्या मुद्यावर समाजात चर्चा कायम ठेवली होती. याशिवाय वेळोवेळी तत्कालीन सरसंघचालक व सरकार्यवाहांनी सार्वजनिक मंचांवरुन राम मंदिरासंदर्भातील मुद्दा जनतेसमोर मांडला होता.१९८६ वर्ष ठरले निर्णायक१९८३ सालापासून संघ तसेच इतर संघटनांनी देशभरात वातावरणनिर्मितीला सुरुवात केली. १९८६ साली संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत ३७ वर्षानंतर अयोध्येच्या राममंदिराला कुलूपातून मुक्ती मिळाल्यानंतर अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. शासनाने नवनिर्मित रामजन्मभूमी न्यासला मंदिराची जागा विकासासाठी द्यावी ही मागणी त्यावेळी करण्यात आली. १९८७ साली भव्य राममंदिर निर्मितीसाठी आवाहन करण्यात आले. १९९० साली विहिंपच्या मंदिर निर्मितीच्या संकल्पाला संघाने पाठिंबा दिला.अयोध्येवर संमत अधिकृत प्रस्ताव१९५९ : अखिल भारतीय प्रतिनिधी सभा१९८६ : अखिल भारतीय प्रतिनिधी सभा१९८७ : अखिल भारतीय प्रतिनिधी सभा१९८९ : अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळ१९९० : अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळ१९९१ : अखिल भारतीय प्रतिनिधी सभा१९९२ : अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळ१९९४ : अखिल भारतीय प्रतिनिधी सभा२००१ : अखिल भारतीय प्रतिनिधी सभा२००३ : अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळ२०२० : अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळ१९९१ ला घेतला आक्रमक पवित्रा१९९१ साली झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत अयोध्येतील हिंसाचारावरुन संघाने आक्रमक पवित्रा घेतला. राम-ज्योति-यात्रा, अयोध्येतील पंचकोसी आणि चौदहकोसी यात्रा तसेच संतांच्या धर्म सभांवर लावण्यात आलेले प्रतिबंध, चार लाखांहून अधिक रामभक्तांना झालेली अटक, शिलान्यास स्थळी लावण्यात आलेल्या छत्रीला न्यायालयीन आदेशांचा अवमान करत हटविणे, लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेला थांबविणे याचा संघाने निषेध करत चौकशीची मागणी केली होती.राममंदिरासाठी कायद्याची भूमिका२०१८ साली झालेल्या विजयादशमी उत्सवाच्या उद्बोधनात सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी राममंदिरासाठी केंद्र शासनाने कायदा करावा, अशी भूमिका मांडली. रामजन्मभूमीच्या वाद वाढण्यासाठी राजकीय पक्षच जबाबदार असल्याची टीकादेखील त्यांनी केली होती.

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर