शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

२०१९ ची लढाई पुन्हा मुद्यांवर होणार : रामदेवबाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 18:34 IST

आगामी २०१९ ची लोकसभा निवडणूक ही पुन्हा एकदा मुद्यांवर आधारित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितले आहे की, ते त्यांनी केलेल्या कामांचा हिशोब सादर करतील. तर विरोधकही आपले मुद्दे लावून धरतील. आता देशाचे हृदय कोण जिंकेल हे येणारी वेळच ठरवेल, असे योगगुरू रामदेवबाबा यांनी येथे सांगितले. रामदेवबाबा हे शनिवारी काही कामानिमित्त शहरात आले होते. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.

ठळक मुद्देदेशाचे हृदय कोण जिंकेल हे वेळ ठरवेल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी २०१९ ची लोकसभा निवडणूक ही पुन्हा एकदा मुद्यांवर आधारित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितले आहे की, ते त्यांनी केलेल्या कामांचा हिशोब सादर करतील. तर विरोधकही आपले मुद्दे लावून धरतील. आता देशाचे हृदय कोण जिंकेल हे येणारी वेळच ठरवेल, असे योगगुरू रामदेवबाबा यांनी येथे सांगितले.रामदेवबाबा हे शनिवारी काही कामानिमित्त शहरात आले होते. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.काळा पैसा, भ्रष्टाचार आणि व्यवस्था परिवर्तन हे तीन मुद्दे महत्त्वाचे होते. काळा पैसा देशातील व्यवस्थेत किंवा विदेशातील बँकेत असो. त्यासाठी सरकारने काही कामे निश्चित केली. विदेशातील बँकेत काळा पैसा आहे, तो अजूनही मोठा प्रश्न आहे. भ्रष्टाचार अजूनही देशावरील जखम आहे. यासाठी खालून वरपर्यंत काम करण्याची गरज आहे. व्यवस्था परिवर्तनासाठी खूप मोठे काम करण्याची गरज आहे. मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीऐवजी या देशातील शिक्षण पद्धत आणून पुन्हा या देशाला वैभव प्राप्त करावे.पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने रोजगाराचे आकडे सादर केले, त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता रामदेवबाबा म्हणाले, राजकारणात आकड्यांचाही वेगळाच प्रकारचा खेळ असतो. त्यात मला पडायचे नाही. परंतु इतके निश्चित सर्वांनाच या दिशेने एक प्रामाणिक प्रयत्न करायला हवे. कारण देशात बेरोजगारी, गरिबी, भूक, असमानता मोठे मुद्दे आहेत. सामाजिक न्याय, आर्थिक न्यायासाठी व रोजगारासाठी, शेतकऱ्यांसाठी सर्वांनाच प्रयत्न करायला हवे, आम्हीही करीत आहोत. आम्ही एका महिन्यात ११ हजार लोकांना नोकरी दिली. अजून दोन-तीन महिन्यात देणार असून डिसेंबरपर्यंत २० हजार लोकांना नोकरी देणार. येणाºया दिवसात पाच लाख लोकांना रोजगार देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. हे काम आम्ही देशसेवेचे व्रत म्हणून करतोय, असेही रामदेवबाबा यांनी सांगितले.मतभेद असावे मनभेद असू नयेविश्वासमतावरील भाषणानंतर राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी यांची गळा भेट घेतली, त्यावरून देशात गदरोळ माजला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता रामदेवबाबा म्हणाले, सरकारकडे विश्वासमतापेक्षा अधिक नंबर अगोदरच होते. त्यामुळे जिंकणे निश्चित होतेच. मात्र सत्तापक्ष व विरोधी पक्षात या माध्यमातून मुद्यांवर आधारित चर्चा घडून आली. ती लोकशाही परंपरेसाठी चांगले आहे. राजकीय पक्षांमध्ये मुद्यांवर आधारित, विचार, धोरणे, सिद्धांतांवर आधारित विरोध व समर्थन असणे आवश्यक आहे. पण मनात वैमनस्य असू नये. मतभेद असावे पण मनभेद असून नये. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे. राहुल गांधी यांनी सभागृहात डोळा मारण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मात्र त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.

 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाPoliticsराजकारण