शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

स्वयंरोजगारासाठी बँकांनी कर्ज पुरवठा करावा : चंद्र्शेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:46 PM

नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेअंतर्गतच्या प्रस्तावांना बँकांनी सुलभपणे कर्ज पुरवठा करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्र्शेखर बावनकुळे यांनी बुधवारी बँकेच्या प्रतिनिधींना दिलेत. ज्या बँका कर्ज पुरवठा करण्यास टाळाटाळ करतील अशा बँकांतील खाते बंद करावे, असे निर्देशही मुख्याधिकाऱ्यांना दिलेत.

ठळक मुद्देनगरपालिका क्षेत्रात हॉकर्स झोनची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेअंतर्गतच्या प्रस्तावांना बँकांनी सुलभपणे कर्ज पुरवठा करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्र्शेखर बावनकुळे यांनी बुधवारी बँकेच्या प्रतिनिधींना दिलेत. ज्या बँका कर्ज पुरवठा करण्यास टाळाटाळ करतील अशा बँकांतील खाते बंद करावे, असे निर्देशही मुख्याधिकाऱ्यांना दिलेत.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीस आ.मल्लिकार्जुन रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, नगररचना सह संचालक आढारी, सहायक संचालक सुजाता कडू आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील नगर परिषदांनी विविध व्यावसायिकांसाठी हॉकर्स झोन तयार करावे, तसेच सर्व फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करुन त्यांच्या व्यवसायानुसार जागा द्यावी, तसेच ओळखपत्र देऊन नियमित व्यवस्थे संबंधीचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, स्वयंरोजगाराअंतर्गत प्रस्ताव तयार करून ते बँकाकडे पाठवावे व या प्रस्तावांचा नियमित आढावा घेऊन बँकांनी सुध्दा या प्रस्तावांना निर्धारित वेळेत मान्यता द्यावी, असे निर्देशही यावेळी दिले.नगर परिषद व नगरपंचायत यांनी प्रारुप विकास आराखडा तयार करण्याला प्राधान्य द्यावे व विकास आराखडा तयार झाल्यावर त्याला अंतिम मान्यता मिळण्याच्या दृष्टीने मुख्याधिकारी यांनी पाठपुरावा करावा. ज्या नगरपालिकांचे पारुप विकास आराखडा मंजूर होणार नाही त्यांना निधीच उपलब्ध होणार नाही. स्वयंरोजगार व बचतगटांना १० हजार रुपयापर्यंत फिरता निधी उपलब्ध करून द्यावा, असेही यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.पाणी टंचाई आराखड्याची अंमलबजावणी कराजिल्ह्यात पाणीटंंचाई आराखड्यानुसार निश्चित केलेली कामे कालबध्द कार्यक्रमानुसार पूर्ण करावीत. पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या संंभाव्य गावामध्ये आराखड्यानुसार उपाययोजना केल्यानंतर ज्या गावांचा समावेश नियमित आराखड्यात नाही अशा गावांना जिल्हा खनिज विकास निधीमधून आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पाणीपुरवठ्यासाठी जिल्ह्याला शासनाने २०० कोटी रुपये उपलब्ध करुन दिले असून अपूर्ण व आराखड्यातील कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. टंचाई निवारणासाठी आवश्यक उपाययोजना करताना आराखड्यात नसलेल्या गावांचे प्रस्ताव मंगळवारपर्यंत सादर करावे, असे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिलेत.खनिज विकास निधीचा आढावाखनिज विकास निधीमधून १४८ कोटींचे कामे मंजूर करण्यात आली आहेत. खनिज विकास निधीमधील प्रत्येक कामाचे छायाचित्र तसेच व्हिडीओ शुटिंग करुन सादर केल्याशिवाय अंतिम निधी वितरित करु नये यासाठी १० ते १५ टक्के निधी राखून ठेवावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजनांची अंमलबाजवणी करताना ज्या नगरपालिका व नगरपंचायती नदीच्या काठावर आहेत, तसेच शहरातील पाण्यामुळे नदीचे पाणी दूषित होऊ शकते अशा नगर परिषदांनी सिवरेज ट्रीटमेंट प्रक्रिया प्रकल्प प्राधान्याने सुरू करावा. त्यासाठी प्रस्ताव तयार करुन खनिज विकास निधीअंतर्गत आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. खनिज विकास निधीमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय १० कोटी रुपयाचा, अशा ६० कोटी रुपयाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.

 

 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेbankबँक