शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बँक, इन्शुरन्सच्या लॉकडाऊनमुळे कोट्यवधींच्या व्यवसायावर 'निर्बंध'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 13:02 IST

हजारो बँक कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवून निषेध नोंदविला आणि देशाची अर्थव्यवस्था संकटात आणणाऱ्या धोरणाविरुद्ध कर्मचाऱ्यांनी नारेबाजी केली. बँकांनी २८ आणि २९ मार्चला संप पुकारला आहे.

ठळक मुद्देबँकांच्या संपामुळे सहा हजार कोटींचा व्यवसाय ठप्पजनरल इन्शुरन्सच्या कर्मचाऱ्यांचाही संताप

नागपूर : सरकारच्या कर्मचारीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ संपूर्ण भारतात एआयबीईए, एआयबीओए आणि बीईएफआयच्या बॅनरखाली हजारो बँक कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवून निषेध नोंदविला आणि देशाची अर्थव्यवस्था संकटात आणणाऱ्या धोरणाविरुद्ध कर्मचाऱ्यांनी नारेबाजी केली. बँकांनी २८ आणि २९ मार्चला संप पुकारला आहे.

खासगीकरण हा सरकारचा मुख्य अजेंडा असून, त्यात बँकिंगसह अर्थव्यवस्थेच्या मुख्य क्षेत्राचा समावेश आहे. सरकारने सध्याचे कामगार कायदे आणि संहिता रद्द करून त्याचे विलीनीकरण चार श्रम कायद्यामध्ये केले आहे. त्यापैकी बरेच कायदे कामगारविरोधी आहे. प्रदर्शनाचे नेतृत्व ईएमबीईएचे चंडिल अय्यर, अशोक अतकरे यांनी केले.

ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोभाटे यांच्या नेतृत्वात ५०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. बोभाटे म्हणाले, बँकिंग क्षेत्राची सार्वजनिक क्षेत्रातील स्थिती कमकुवत करण्याच्या दिशेने सरकारच्या बहुआयामी निर्णयाविरुद्ध बँक कर्मचाऱ्यांची चळवळ तीन दशकांहून अधिक काळ जोरदारपणे लढत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना मोठ्या प्रमाणात एनपीएचा सामना करावा लागत असून, त्यामध्ये कॉर्पोरेट्सचा मोठा वाटा आहे.

भागभांडवल शेअर बाजारात विकू नका !

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशभरातील दहा प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी सार्वत्रिक संपामुळे, भारतीय आयुर्विमा महामंडळातील सेवा विस्कळीत व कामकाज ठप्प झाल्यामुळे हा संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा अखिल भारतीय विमा कर्मचारी असोसिएशनचे पश्चिम क्षेत्रीय अध्यक्ष अनिल ढोकपांडे यांनी सोमवारी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या मुख्यालयासमोरील द्वारसभेत केला.

या प्रसंगी आयुर्विमा कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने करीत सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा तीव्र निषेध केला. संपामुळे रोखीच्या व्यवहारासह सर्व सेवा ठप्प झाल्याने विभागीय कार्यालयात व शाखा कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे भागभांडवल शेअर बाजारात विकू नका, सार्वजनिक क्षेत्र मजबूत करा, राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करा, मालकहिताचे व कामगारविरोधी कायदे रद्द करा, रोजगाराचे कंत्राटीकरण त्वरित थांबवा, कामगारांनी प्रदीर्घ संघर्षातून मिळविलेले अधिकार संपुष्टात आणणारे चार लेबर कोड बिल आणि एलआयसीमध्ये त्वरित नोकरभरती सुरू करा, आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरिता व जनतेच्या हिताचे रक्षण करण्याकरिता विमा कामगारांनी हा संप पुकारल्याची माहिती कामगार नेते अनिल ढोकपांडे यांनी दिली.

इन्शुरन्सचे उपक्रम खासगी क्षेत्राच्या घशात कशाला?

सार्वजनिक विमा कंपनीमध्ये कार्यरत जनरल इन्शुरन्स एम्प्लॉईज ऑल इंडिया असोसिएशन ॲण्ड ऑल इंडिया जनरल इन्शुरन्स पेन्शनर्स असोसिएशन अंतर्गत वर्ग-३ आणि वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी शंकरनगर चौकातील युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यामुळे कार्यालयातील कामकाज ठप्प होते.

श्रम कायद्यात करण्यात येणाऱ्या बदलांचे समर्थन करताना त्यांनी दोन दिवसाच्या संपाचे समर्थन केले. पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष कुळकर्णी यांनी सरकार सार्वजनिक क्षेत्राला संपुष्टात आणत असल्याचा आरोप केला. कर्मचाऱ्यांनी संविधान चौकातील प्रदर्शनात भाग घेतला. संचालन रोहित शिवहरे यांनी केले. आयोजनात विमा कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.

टॅग्स :StrikeसंपbankबँकelectricityवीजEmployeeकर्मचारी