शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

नागपुरात आता लग्नात ‘बँड बाजा’ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 19:52 IST

लग्न समारंभ आणि वरातीत आता बँड बाजालाही परवानगी मिळाली आहे. बँडचा व्यवसाय करणाऱ्यांवर कोरोनामुळे मोठे संकट ओढवले आहे. त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. ती लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी बँड पथकाच्या संचालकांच्या शिष्टमंडळाला सशर्त परवानगी दिली आहे.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांचा निर्णय : बँड पार्टीवाल्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्न समारंभ आणि वरातीत आता बँड बाजालाही परवानगी मिळाली आहे. बँडचा व्यवसाय करणाऱ्यांवर कोरोनामुळे मोठे संकट ओढवले आहे. त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. ती लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी बँड पथकाच्या संचालकांच्या शिष्टमंडळाला सशर्त परवानगी दिली आहे.कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक व्यवसायाचे मोठे नुकसान झालेले आहे. यात बँडवाल्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, मार्च ते जून या चार महिन्यात लग्न समारंभाचा धुमधडाका असतो. या चार महिन्याच्या कमाईवर अनेक वाजंत्र्यांचा वर्षभराच्या कुटुंबाचा खर्च चालतो. चारपैकी तीन महिने निघून गेल्यामुळे या व्यवसायात असलेल्यांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे. अलीकडे लग्न समारंभाला सशर्त परवानगी मिळाली आहे. मात्र, ब्रँड बाजाला स्थान नव्हते. त्यामुळे नागपुरातील बँड पार्टीच्या संचालकांनी प्रशांत खंडारे यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेऊन त्यांना आपली व्यथा सांगितली. आम्हालाही परवानगी मिळावी, अशी विनंती त्यांनी आयुक्तांकडे केली. त्यांचा विचार करून आयुक्तांनी त्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. त्यामुळे आता नागपूर शहरात तीन महिन्यानंतर ‘बँड बाजा बारात’ पाहायला मिळणार आहे. बँडवाल्यांचं आर्थिक संकट पाहून नागपूर पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी हा दिलासाजनक निर्णय घेतला आहे.लग्नाला आणि त्यात बँडवाल्यांना परवानगी दिली असली तरी त्यांना काही निर्बंधही घालण्यात आले आहेत. लग्नात केवळ ५० पाहुण्यांना आमंत्रित करता येणार आहे. तसेच लग्नाच्या ठिकाणी बँडवाल्यांनादेखील फिजिकल डिस्टन्सिंंग आणि स्वच्छतेच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. वर किंवा वधू पित्याला लग्नासाठी समारंभात बँडवाल्यांना याच अटीवर बोलावता येणार आहे.अनेक कुटुंबाचा ताळेबंद विस्कळीतलॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यापासून बँडवाल्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या बँड वाजविणाऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभं राहिलं आहे. ते लक्षात घेता ५० पाहुण्यांच्या अटीचं पालन करीत वधू किंवा वर पित्याला लग्न समारंभात बँड पथकाला बोलावता येणार आहे.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालय