शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बंदी, सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:42 IST

Nagpur : पाचशे रुपयांचा स्टॅम्पपेपर ठरतोय डोकेदुखी

लोकमत न्यूज नेटवर्ककाटोल : सरकारी आणि खासगी कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावण्याऱ्या स्टॅम्पबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १०० आणि २०० रुपयांच्या स्टॅम्पवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता किमान ५०० रुपयांच्या स्टॅम्पवरच नोटरी, खरेदी, हक्क किंवा प्रतिज्ञापत्र दिले जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना आता मोठा फटका बसत असल्याचे वास्तव आहे.

राज्य सरकारने महसूलात वाढ व्हावी यासाठी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर बंद करण्याची भूमिका घेतली आहे. या ऐवजी ५०० चा स्टॅम्प पेपर वापरण्याची घोषणा केली आहे. २०२४ च्या शेवटी हा निर्णय घेण्यात आला असला तरी याचे पडसाद आता उमटू लागले आहेत.

तहसील किंवा महसूल कार्यालयात फक्त १०० आणि २०० रुपयांमध्ये वैयक्तिक कारणांसह बँक आणि विविध कामे होत होती. परंतु, आता यासाठी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना बँकेच्या छोट्या-मोठ्या कामाचे करारनामे असो किंवा ठेवीचे करारनामे असो किंवा इतर कामाकरिता ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर घ्यावा लागतो आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे शैक्षणिक कामाकरिता शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर ऐवजी १०० रुपयांचे तिकीट लावून साध्या कागदावर ज्याप्रमाणे कागदपत्राची कामे पूर्ण केली जात आहे, अशीच सूट कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसह इतर कामाकरिता देण्यात येण्याची मागणी केली जात आहे.

"आजवर अनेकदा बँकेच्या माध्यमातून कर्ज घेतले. कर्ज घेताना स्टॅम्प पेपरवर काही लेखी पडताळणी देऊन आम्हाला कर्ज प्राप्त झाले. परंतु, आता या कर्जाकरिता काही करारनामे करण्याकरिता शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर घेण्याकरिता गेले असता तो कुठेही मिळून आला नाही. आता पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर तोच करारनामा करून देण्याची वेळ आली आहे."- सरला बोरकर, रा. सिंदी शेतकरी.

टॅग्स :nagpurनागपूर