शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
2
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
3
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
4
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
5
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
6
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
7
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
8
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
9
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
10
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
11
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
12
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
13
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
14
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
15
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
16
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
17
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
18
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
19
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
20
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 

शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बंदी, सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:42 IST

Nagpur : पाचशे रुपयांचा स्टॅम्पपेपर ठरतोय डोकेदुखी

लोकमत न्यूज नेटवर्ककाटोल : सरकारी आणि खासगी कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावण्याऱ्या स्टॅम्पबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १०० आणि २०० रुपयांच्या स्टॅम्पवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता किमान ५०० रुपयांच्या स्टॅम्पवरच नोटरी, खरेदी, हक्क किंवा प्रतिज्ञापत्र दिले जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना आता मोठा फटका बसत असल्याचे वास्तव आहे.

राज्य सरकारने महसूलात वाढ व्हावी यासाठी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर बंद करण्याची भूमिका घेतली आहे. या ऐवजी ५०० चा स्टॅम्प पेपर वापरण्याची घोषणा केली आहे. २०२४ च्या शेवटी हा निर्णय घेण्यात आला असला तरी याचे पडसाद आता उमटू लागले आहेत.

तहसील किंवा महसूल कार्यालयात फक्त १०० आणि २०० रुपयांमध्ये वैयक्तिक कारणांसह बँक आणि विविध कामे होत होती. परंतु, आता यासाठी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना बँकेच्या छोट्या-मोठ्या कामाचे करारनामे असो किंवा ठेवीचे करारनामे असो किंवा इतर कामाकरिता ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर घ्यावा लागतो आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे शैक्षणिक कामाकरिता शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर ऐवजी १०० रुपयांचे तिकीट लावून साध्या कागदावर ज्याप्रमाणे कागदपत्राची कामे पूर्ण केली जात आहे, अशीच सूट कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसह इतर कामाकरिता देण्यात येण्याची मागणी केली जात आहे.

"आजवर अनेकदा बँकेच्या माध्यमातून कर्ज घेतले. कर्ज घेताना स्टॅम्प पेपरवर काही लेखी पडताळणी देऊन आम्हाला कर्ज प्राप्त झाले. परंतु, आता या कर्जाकरिता काही करारनामे करण्याकरिता शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर घेण्याकरिता गेले असता तो कुठेही मिळून आला नाही. आता पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर तोच करारनामा करून देण्याची वेळ आली आहे."- सरला बोरकर, रा. सिंदी शेतकरी.

टॅग्स :nagpurनागपूर