शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बंदी, सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:42 IST

Nagpur : पाचशे रुपयांचा स्टॅम्पपेपर ठरतोय डोकेदुखी

लोकमत न्यूज नेटवर्ककाटोल : सरकारी आणि खासगी कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावण्याऱ्या स्टॅम्पबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १०० आणि २०० रुपयांच्या स्टॅम्पवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता किमान ५०० रुपयांच्या स्टॅम्पवरच नोटरी, खरेदी, हक्क किंवा प्रतिज्ञापत्र दिले जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना आता मोठा फटका बसत असल्याचे वास्तव आहे.

राज्य सरकारने महसूलात वाढ व्हावी यासाठी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर बंद करण्याची भूमिका घेतली आहे. या ऐवजी ५०० चा स्टॅम्प पेपर वापरण्याची घोषणा केली आहे. २०२४ च्या शेवटी हा निर्णय घेण्यात आला असला तरी याचे पडसाद आता उमटू लागले आहेत.

तहसील किंवा महसूल कार्यालयात फक्त १०० आणि २०० रुपयांमध्ये वैयक्तिक कारणांसह बँक आणि विविध कामे होत होती. परंतु, आता यासाठी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना बँकेच्या छोट्या-मोठ्या कामाचे करारनामे असो किंवा ठेवीचे करारनामे असो किंवा इतर कामाकरिता ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर घ्यावा लागतो आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे शैक्षणिक कामाकरिता शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर ऐवजी १०० रुपयांचे तिकीट लावून साध्या कागदावर ज्याप्रमाणे कागदपत्राची कामे पूर्ण केली जात आहे, अशीच सूट कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसह इतर कामाकरिता देण्यात येण्याची मागणी केली जात आहे.

"आजवर अनेकदा बँकेच्या माध्यमातून कर्ज घेतले. कर्ज घेताना स्टॅम्प पेपरवर काही लेखी पडताळणी देऊन आम्हाला कर्ज प्राप्त झाले. परंतु, आता या कर्जाकरिता काही करारनामे करण्याकरिता शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर घेण्याकरिता गेले असता तो कुठेही मिळून आला नाही. आता पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर तोच करारनामा करून देण्याची वेळ आली आहे."- सरला बोरकर, रा. सिंदी शेतकरी.

टॅग्स :nagpurनागपूर