शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

वर्धा -बल्लारपूर मार्गावरील ट्रॅकची गिट्टी वाहून गेली; रेल्वे वाहतूक विस्कळीत

By नरेश डोंगरे | Updated: July 18, 2023 22:51 IST

निझामुद्दीन हैदराबाद एक्सप्रेससह अनेक गाड्या अडल्या

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मुसळधार पावसामुळे वर्धा - बल्लारपूर रेल्वे मार्गावरच्या नागरी - चिकणी दरम्यानच्या रुळावरची गिट्टी वाहून गेली. त्यामुळे रेल्वेची डाऊन लाईन पुरती प्रभावित झाली आहे. ही रेल्वेलाईन धोकादायक स्थितीत आल्याचे लक्षात येताच काही गाड्या नजिकच्या स्थानकांवर थांबवून रेल्वे प्रशासनाने या मार्गावरची रेल्वे वाहतूक आज रात्री बंद केली.

विदर्भातील अनेक भागात आज सकाळपासून जोरदार पाऊस झाला. अजूनही अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक भागातील शेतात, रेल्वेलाईन नजिकच्या नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे वर्धा - बल्लारपूर रेल्वे मार्गावर नागरी - चिकणी रेल्वेस्थानका दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवरची गिट्टी पुरती वाहून गेली. परिणामी ट्रॅक उघडा पडला. हा प्रकार मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या. रेल्वे कर्मचाऱ्यांची मोठी तुकडी घटनास्थळी पाठवून ट्रॅक पुर्ववत करण्याचे काम सुरू करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून ट्रेन नंबर १२७२२ निझामुद्दीन हैदराबाद एक्सप्रेस नागरी रेल्वे स्थानकांवर रोखण्यात आली. तर, ०३२५३ पाटणा सिकंदराबाद एक्सप्रेसला वाघोली विभागात रोखण्यात आले. या मार्गाने धावणाऱ्या अन्य रेल्वेगाड्यांनाही या घडामोडीची सूचना देण्यात आली. परिणामी अनेक गाड्यांचा वेग आपसूकच मंदावला आहे.डाऊन लाईन बंद, अप लाईन सुरू

खबरदारीचा उपाय म्हणून वर्धा बल्लारपूर रेल्वे मार्गावरची डाऊनलाईन रात्री ९ वाजतापासून बंद करण्यात आली. मात्र, अपलाईन सुरळीत असल्याने या मार्गावरची वाहतूक जैसे- थे ठेवण्यात आली. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या ट्रॅकवर लक्ष ठेवून आहेत. सुरळीत व्हायला किती वेळ लागेल, हे स्पष्ट नाही. मात्र, पाण्याचा जोर ओसरताच ही लाईन पुर्ववत करून वाहतूक सुरू केली जाणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

छोट्या स्थानकांवर मोठी गैरसोय

निझामुद्दीन हैदराबाद ही गाडी नागरी तर पाटणा सिकंदराबाद एक्सप्रेस वाघोली स्थानकाजवळ थांबविण्यात आली आहे. ही दोन्ही रेल्वेस्थानकं छोटी आहेत. तर लांब पल्ल्याच्या या दोन्ही गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणांवर प्रवासी आहेत. छोट्या स्थानकांवर खाण्या-पिण्याचे स्टॉल मर्यादित असतात. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर