शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

वर्धा -बल्लारपूर मार्गावरील ट्रॅकची गिट्टी वाहून गेली; रेल्वे वाहतूक विस्कळीत

By नरेश डोंगरे | Updated: July 18, 2023 22:51 IST

निझामुद्दीन हैदराबाद एक्सप्रेससह अनेक गाड्या अडल्या

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मुसळधार पावसामुळे वर्धा - बल्लारपूर रेल्वे मार्गावरच्या नागरी - चिकणी दरम्यानच्या रुळावरची गिट्टी वाहून गेली. त्यामुळे रेल्वेची डाऊन लाईन पुरती प्रभावित झाली आहे. ही रेल्वेलाईन धोकादायक स्थितीत आल्याचे लक्षात येताच काही गाड्या नजिकच्या स्थानकांवर थांबवून रेल्वे प्रशासनाने या मार्गावरची रेल्वे वाहतूक आज रात्री बंद केली.

विदर्भातील अनेक भागात आज सकाळपासून जोरदार पाऊस झाला. अजूनही अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक भागातील शेतात, रेल्वेलाईन नजिकच्या नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे वर्धा - बल्लारपूर रेल्वे मार्गावर नागरी - चिकणी रेल्वेस्थानका दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवरची गिट्टी पुरती वाहून गेली. परिणामी ट्रॅक उघडा पडला. हा प्रकार मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या. रेल्वे कर्मचाऱ्यांची मोठी तुकडी घटनास्थळी पाठवून ट्रॅक पुर्ववत करण्याचे काम सुरू करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून ट्रेन नंबर १२७२२ निझामुद्दीन हैदराबाद एक्सप्रेस नागरी रेल्वे स्थानकांवर रोखण्यात आली. तर, ०३२५३ पाटणा सिकंदराबाद एक्सप्रेसला वाघोली विभागात रोखण्यात आले. या मार्गाने धावणाऱ्या अन्य रेल्वेगाड्यांनाही या घडामोडीची सूचना देण्यात आली. परिणामी अनेक गाड्यांचा वेग आपसूकच मंदावला आहे.डाऊन लाईन बंद, अप लाईन सुरू

खबरदारीचा उपाय म्हणून वर्धा बल्लारपूर रेल्वे मार्गावरची डाऊनलाईन रात्री ९ वाजतापासून बंद करण्यात आली. मात्र, अपलाईन सुरळीत असल्याने या मार्गावरची वाहतूक जैसे- थे ठेवण्यात आली. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या ट्रॅकवर लक्ष ठेवून आहेत. सुरळीत व्हायला किती वेळ लागेल, हे स्पष्ट नाही. मात्र, पाण्याचा जोर ओसरताच ही लाईन पुर्ववत करून वाहतूक सुरू केली जाणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

छोट्या स्थानकांवर मोठी गैरसोय

निझामुद्दीन हैदराबाद ही गाडी नागरी तर पाटणा सिकंदराबाद एक्सप्रेस वाघोली स्थानकाजवळ थांबविण्यात आली आहे. ही दोन्ही रेल्वेस्थानकं छोटी आहेत. तर लांब पल्ल्याच्या या दोन्ही गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणांवर प्रवासी आहेत. छोट्या स्थानकांवर खाण्या-पिण्याचे स्टॉल मर्यादित असतात. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर