शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरेंसह चौघांना भारतरत्न द्या : प्रवीण तोगडिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 20:59 IST

रामजन्मभूमी आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल, महंत रामचंद्रदास आणि गोरखपूर पीठाचे महंत अवैद्यनाथ यांचे मौलिक योगदान होते. केंद्र शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केली.

ठळक मुद्देदेशाची अर्थव्यवस्था ‘ऑक्सिजन’वर

नागपूर : रामजन्मभूमी आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल, महंत रामचंद्रदास आणि गोरखपूर पीठाचे महंत अवैद्यनाथ यांचे मौलिक योगदान होते. या चौघांनीही या आंदोलनाला नेतृत्व दिले व त्यांच्या कार्यासाठी केंद्र शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केली. नागपुरात पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बुधवारी बोलत होते.यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केला जावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे (एएचपी) अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केली. ते बुधवारी नागपुरातील प्रेसक्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत अयोध्येत राममंदिराच्या निर्मिर्तीसाठी १५ सदस्यीय ट्रस्टची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर तोगडिया यांनी पत्रपरिषदेत भाष्य केले. गुजरातच्या सोमनाथ मंदिरासाठी झालेल्या आंदोलनात हमीर सिंह गोहिल यांचे योगदान होते. सोमनाथ मंदिरात जाणारे भाविक देवदर्शनापूर्वी गोहिल यांच्या स्मारकाचे दर्शन घेतात. त्याचप्रमाणे अयोध्येत राम मंदिर बनावे यासाठी आयुष्याची आहुती देणाऱ्या रामभक्तांचे अयोध्येत स्मारक बनविण्यात यावे, असे तोगडिया म्हणाले. पत्रपरिषदेला किशोर दिकोंडवार, अनुप जयस्वाल, तेजेंदरसिंह ठाकूर, हेमंत त्रिवेदी प्रामुख्याने उपस्थित होते.केंद्र सरकारच्या अपयशामुळे महिला अत्याचार वाढलेयावेळी तोगडिया यांनी महाराष्ट्रातील हिंगणघाट तसेच औरंगाबाद येथे महिलांना जाळण्याच्या घटनांवरून केंद्रावर टीकास्त्र सोडले. केंद्र सरकारच्या अपयशामुळे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. अशी प्रकरणे ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालवून १०० दिवसांत निकाल जाहीर झाला पाहिजे. शिवाय दोषसिद्धीचा दरदेखील वाढविण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. देशाची अर्थव्यवस्थादेखील ‘आॅक्सिजन’वर आहे व देशाची सूत्रे योग्य व्यक्तीच्या हाती असती तर ही वेळ आली नसती, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरदेखील टीका केली.देशातील मुस्लिम करत आहेत भाजपचे ‘मार्केटिंग’‘सीएए’ व ‘एनआरसी’च्या मुद्द्यावरून शाहीनबाग येथे मुस्लिम आंदोलन करत आहेत. प्रत्यक्षात भाजपमध्ये आता हिंदूंना प्रभावित करण्याची क्षमता राहिलेली नाही. त्यामुळे या हिंदूंना जागृत करून भाजपचे ‘मार्केटिंग’ करण्याचे काम शाहीनबागसारख्या आंदोलनातून होत आहे. याबदल्यात देशात ‘एनआरसी’ लागू करण्याची केंद्राची कुठलीही योजना नाही, असे मंत्र्यांनी सांगितले आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या घरी यासंदर्भात सर्व रूपरेषा तयार झाली, असा दावा डॉ. तोगडिया यांनी केला.भाजपाने हिंदुत्वाचे नुकसान केलेमहाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांनंतर शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद द्यायला काहीच हरकत नव्हती. शिवसेनेने प्रत्येक वेळी भाजपला साथ दिली होती. भाजपने आडमुठेपणाची भूमिका घेत हिंदुत्वाचे नुकसान केले आहे. दुसरीकडे संघ परिवारानेदेखील विश्व हिंदू परिषदेचे मोठे नुकसान केले असून यामुळे हिंदू चळवळीला मोठा धक्का बसला आहे, असेदेखील डॉ. तोगडिया म्हणाले.

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे