नागपूर : जे सरकार कर्जमाफीच्या तारखेपासून पळत होते ते सरकार आता तारखेवर आणून ठेवले. यावर आम्ही वॉच ठेवणार. यात कट कारस्थान झाले तर कुणालाही सोडणार नाही, असा इशारा प्रहारचे नेते माजी आ. बच्चू कडू यांनी दिला. कर्जमाफीबाबत गुरुवारी रात्री सरकारशी चर्चा केल्यानंतर बच्चू कडू यांच्यासह माजी आ. वामनराव चटप, रविकांत तुपकर आदी शेतकरी नेत्यांचे शिष्टमंडळ नागपुरात परतले.
आंदोलन काळात सामान्य नागरिकांना त्रास झाला त्यांची माफी मागतो. समस्या निर्माण करणारे आंदोलन सुरू ठेवणार नाही, अशी ग्वाही शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. अशी महिती प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी दिली.
दगाफटका झाल्यास...
हा आंदोलनाचा विजयच आहे. दगाफटका झाला तर बच्च कडू फाशीवर जाईल. कर्जमाफीचा हप्ता बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही. मेंढपाळ, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आदी विषयांवर चर्चा राहिली आहे. त्यासाठी आठ दिवसांत पुन्हा बैठक होणार आहे, असेही कडू यांनी स्पष्ट केले.
Web Summary : Bachchu Kadu claims victory in cornering the government on loan waivers. He warns of further action if promises aren't kept, stating the movement continues until funds are disbursed. Further meetings are planned to discuss pending issues.
Web Summary : बच्चू कडू ने कर्ज माफी पर सरकार को घेरने में जीत का दावा किया। उन्होंने वादा पूरा न होने पर आगे की कार्रवाई की चेतावनी दी, कहा कि जब तक पैसा नहीं मिलता आंदोलन जारी रहेगा। लंबित मुद्दों पर आगे बैठकें होंगी।