शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
2
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
3
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
4
जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “रोहित पवारांमुळे पक्षाबाहेर...”
5
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
6
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
7
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
8
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
9
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
10
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
11
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
12
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
13
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
14
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
15
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
16
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
17
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
18
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
19
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
20
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका

बाबासाहेबांचे क्रांती विज्ञान समाजात पेरा : ताराचंद खांडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 1:37 AM

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतावाद जागतिक पातळीवर पोहोचविला. महाडचा सत्याग्रह, संविधान निर्मिती आणि धम्मदीक्षेचे क्रांतिशास्त्र हे सर्व मानव कल्याणासाठी होते. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या या विचारांचे क्रांतिविज्ञान समाजात पेरा, असे आवाहन प्रसिद्ध विचारवंत ताराचंद खांडेकर यांनी केले.

ठळक मुद्दे संविधान मुव्हमेंटचा वर्धापन दिन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतावाद जागतिक पातळीवर पोहोचविला. महाडचा सत्याग्रह, संविधान निर्मिती आणि धम्मदीक्षेचे क्रांतिशास्त्र हे सर्व मानव कल्याणासाठी होते. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या या विचारांचे क्रांतिविज्ञान समाजात पेरा, असे आवाहन प्रसिद्ध विचारवंत ताराचंद खांडेकर यांनी केले. रिपब्लिकन मुव्हमेंट या साप्ताहिकाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित दिवसभराच्या वैचारिक मंथन कार्यक्रमाचे समारोप करताना ते बोलत होते. उर्वेला कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांनी ‘गेल्या साठ वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीला आम्ही कोणत्या स्तरावर घेऊन आलो आहोत आणि आमची जबाबदारी काय याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी खंत व्यक्त केली. पहिल्या सत्रात पुण्याचे धर्मराज निमसरकार, का. रा. वालदेकर, बुलडाण्याचे सुरेश साबळे, उस्मानाबादच्या अस्मिता मेश्राम, डॉ. सविता कांबळे, धम्मचारी पद्मबोधी यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. धम्मचारी पद्मबोधी यांनी ‘आंबेडकरी चळवळ म्हणजे नेमके काय, आंबेडकरी चळवळीचे धयेय काय, आणि ते गाठण्यासाठी साधने कोणती, असे प्रश्न उभे करीत ध्येय स्पष्ट नसेल तर आंदोलन भरकटत जाते, आंदोलन दिशाहीन होते, याकडे लक्ष वेधले. यावेळी ज्येष्ठ चित्रकार अरुण मोटघरे, प्राचार्य भाऊ वासनिक, डॉ. राजाभाऊ टाकसाळे, अशोक सरस्वती, संजय शेंडे, प्रा. रमेश राठोड, पल्लवी जीवनतारे, अनिकेत कुत्तरमारे, सिद्धांत पाटील, शितल गडलिंग, आणि प्रशांत बेले यांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक संपादक नरेश वाहणे यांनी केले. संचालन कवी संजय गोडघाटे व शीतल गडलिंग यांनी केले. विलास भोंगाडे यांनी आभार मानले.बॉक्स..लोकशाही वाचवणे ही काळाची गरजदेशात अराजकतेचे वातावरण आहे. धर्मसत्तेचा सरकारवर अंकुश आल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. तेव्हा लोकशाही वाचवणे ही काळाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कवी इ.मो.नारनवरे यांनी यावेळी दुसऱ्या सत्रातील मुक्तचर्चेत व्यक्त केले. आर्किटेक्ट नरेंद्र शेलार यांनी प्राक्कथन केले. अस्मिता मेश्राम, सुरेश साबळे, विजय बौद्ध, पल्लवी जिवनतारे, मयूर रंगारी, प्रशांत बेले, अशोक सरस्वती, अशोक मस्के, सुधीर भगत, हरीश नागदेवे, सिद्धांत पाटील, भीमराव गणवीर आदींनी भाग घेतला.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरConstitution Dayसंविधान दिन