शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांनी कामगारांकडे व्यक्ती म्हणून पाहण्यास शिकविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 21:45 IST

भांडवलदारांकडून कामगार वर्गाचे नेहमीच शोषण करण्यात आले. कामगारांसंदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विशेष आपुलकी होती. ‘थिअरी आॅफ वेल्फेअर’च्या माध्यमातून त्यांनी कामगारांच्या कल्याणाचे विचार मांडले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाबासाहेबांनी कामगारांकडे व्यक्ती म्हणून पाहण्यास शिकविले, असे प्रतिपादन मुंबई येथील लेखक व विचारवंत सुधाकर गायकवाड यांनी केले.

ठळक मुद्देसुधाकर गायकवाड : डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भांडवलदारांकडून कामगार वर्गाचे नेहमीच शोषण करण्यात आले. कामगारांसंदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विशेष आपुलकी होती. ‘थिअरी आॅफ वेल्फेअर’च्या माध्यमातून त्यांनी कामगारांच्या कल्याणाचे विचार मांडले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाबासाहेबांनी कामगारांकडे व्यक्ती म्हणून पाहण्यास शिकविले, असे प्रतिपादन मुंबई येथील लेखक व विचारवंत सुधाकर गायकवाड यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी बीजभाषणादरम्यान ते बोलत होते.विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगार कल्याण व नवीन आर्थिक धोरण या विषयावर या दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू हरीभाऊ केदार हे मुख्य अतिथी होते तर अध्यक्ष म्हणून कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, सन्माननीय अतिथी म्हणून कुलसचिव डॉ.पूरण मेश्राम तसेच विभागप्रमुख डॉ. प्रदीप आगलावे हे उपस्थित होते. औद्योगिक क्रांतीनंतर कामगार कल्याणाची संकल्पना समोर आली. कामगारांना स्वातंत्र्य हवे, असे बाबासाहेब नेहमी म्हणायचे. मात्र असे म्हणत असताना त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांची सांगड घातली होती. त्यांनी सकारात्मक व नकारात्मक स्वातंत्र्य या संकल्पनादेखील मांडल्या होत्या. पाश्चिमात्य संशोधकांनी याच संकल्पना अनेक वर्षांनंतर जगासमोर आणल्या. कामगारांचे लोककल्याण कायद्यातून शक्य आहे. कामगारांना स्वातंत्र्य मिळत असताना त्यांना सन्मानाने जगण्याचीदेखील संधी मिळाली पाहिजे. तसेच त्यांच्या क्षमतांचा विकास झाला पाहिजे, असे बाबासाहेबांचे ठाम मत होते. भांडवलदार असेपर्यंत कामगार कल्याण योजना आवश्यकच आहेत, असे सुधाकर गायकवाड म्हणाले.कामगार क्षेत्रासंदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मौलिक होते. त्यांचे विचार बोलून दाखविण्यापेक्षा ते कृतीत उतरविणे जास्त आवश्यक आहे. सामाजिक परिवर्तनात कामगार पुढाकार घेऊ शकतात, असे बाबासाहेबांना वाटायचे. सद्यस्थितीत केंद्र सरकारचे धोरण कामगारविरोधी आहे. अशा स्थितीत बाबासाहेबांचे विचार अमलात आणण्याची आवश्यकता आहे, असे मत हरीभाऊ केदार यांनी व्यक्त केले. कुलगुरू डॉ.काणे यांनीदेखील अध्यक्षीय भाषणातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या तारखेतदेखील कामगार कल्याणासाठी किती मौलिक आहेत, यावर प्रकाश टाकला. डॉ. प्रदीप आगलावे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.रमेश शंभरकर यांनी संचालन केले तर डॉ.पूरण मेश्राम यांनी आभार मानले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ