दीक्षाभूमीला ‘ब’वर्ग दर्जा - राज्य सरकारचा निर्णय :
By Admin | Updated: August 24, 2015 02:23 IST2015-08-24T02:23:25+5:302015-08-24T02:23:25+5:30
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेल्या दीक्षाभूमीला राज्य सरकारने ‘ब’वर्ग तीर्थक्षेत्र / पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे.

दीक्षाभूमीला ‘ब’वर्ग दर्जा - राज्य सरकारचा निर्णय :
आंबेडकरी अनुयायांकडून स्वागत
नागपूर : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेल्या दीक्षाभूमीला राज्य सरकारने ‘ब’वर्ग तीर्थक्षेत्र / पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. या संबंधीचा शासकीय आदेश १४ आॅगस्ट रोजी पर्यंटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने जारी केला आहे. यामुळे आंबेडकरी अनुयायांनी लावून धरलेली मागणी पूर्ण झाली आहे.
दीक्षाभूमीचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे. दीक्षाभूमीवर दरवर्षी लाखो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटक व आंबेडकरी अनुयायी येतात. दीक्षाभूमीचा समावेश ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र किंवा पर्यटन स्थळात करा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यासाठी राज्य सरकारला निवेदने देण्यात आली. आंबेडकरी व्यासपीठ, सभा, बैठकांमध्येही तशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारने दीक्षाभूमीला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र / पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. सोबतच सध्यस्थितीत कुठल्याही स्थळाला ‘अ’ वर्ग दर्जा घोषित करण्याची तरतूद नाही, असेही स्पष्ट केले आहे. आंबेडकरी अनुयायांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)