शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya Verdict : नागपूर रेल्वेस्थानकावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 20:00 IST

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकावर शनिवारी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. दिवसभर रेल्वेस्थानकावर ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांची बॉम्ब शोधक व नाशक पथकाद्वारे तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देरेल्वेगाड्यांची तपासणी : बंदुकधारी पोलीस तैनात, बॉम्ब शोधक व नाशक पथकाद्वारे तपासणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकावर शनिवारी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. दिवसभर रेल्वेस्थानकावर ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांची बॉम्ब शोधक व नाशक पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. याशिवाय आऊटरकडील भागातही लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले.शनिवारी अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील समजल्या जाणाऱ्या नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागपूर रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान जागोजागी तैनात करण्यात आले. मुख्य प्रवेशद्वारावर बंदुकधारी पोलीस तैनात करण्यात आले. प्रत्येक प्लॅटफार्मवर लोहमार्ग पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान नजर ठेऊन होते. रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांनी रात्री रेल्वेस्थानकावर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकारी, जवानांना सूचना दिल्या. संशयित प्रवाशांची हँड मेटल डिटेक्टर तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. संत्रा मार्केटकडील भागातही पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. रेल्वेस्थानकाच्या आऊटरकडील भागातही पोलिसांची नेमणूक करण्यात आली. मुंबई एण्ड, दिल्ली लाईन आणि इमामवाडा परिसरातील रेल्वे रुळावर पोलीस तैनात करण्यात आले. रेल्वेस्थानकावर येणाऱ्या रेल्वेगाड्यांची कसून तपासणी करण्यात आली. रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांच्या साहित्याची बॅग स्कॅनर मशीनद्वारे तपासणी करूनच त्यांना आत सोडण्यात आले. याशिवाय अजनी, इतवारी रेल्वेस्थानकावरही रेल्वे सुरक्षा दल तसेच लोहमार्ग पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली.प्रवाशांनी रद्द केले तिकीटशनिवारी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रवास करण्याचे टाळले. त्यामुळे प्रवाशांनी आरक्षण कार्यालय गाठून प्रवासाचे तिकीट रद्द केले. दिवाळीनंतर रेल्वेगाड्यातील प्रवाशांची संख्या कमी होत आहे. वेटिंगची स्थिती पूर्वपदावर येत आहेत. यातच शनिवारी निकाल लागणार असल्यामुळे बहुतांश प्रवाशांनी आपला प्रवासाचा बेत रद्द केला. प्रवाशांनी आपले कन्फर्म असलेले तिकीट रद्द केल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.तीन दिवस कडेकोट बंदोबस्त राहणार‘सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी, जवानांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी आरपीएफचे जवान परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. आणखी तीन दिवस नागपूर रेल्वेस्थानकावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येईल.’भवानी शंकर नाथ, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरAyodhyaअयोध्याPoliceपोलिस