शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

लाचखोरीच्या ३२ टक्के प्रकरणांत दोषारोपपत्रांची प्रतीक्षा; शिक्षेचे प्रमाण कसे वाढणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 08:00 IST

Nagpur News ५७ महिन्यांतील ३२ टक्के प्रकरणांमध्ये अद्यापही दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे २०२२ मधील एकाही प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नाही.

ठळक मुद्दे५७ महिन्यांत लाचखोरीचे ४४१ गुन्हे दाखल

योगेश पांडे

नागपूर : लाचखोरांवर नियंत्रण यावे यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे विविध मोहिमा राबविण्यात येतात. मात्र मागील तीन वर्षांपासून कारवाईचा वेग मंदावला असून दोषारोपपत्र सादर करण्यात देखील विलंब होत आहे. ५७ महिन्यांतील ३२ टक्के प्रकरणांमध्ये अद्यापही दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे २०२२ मधील एकाही प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नाही. अशा स्थितीत लाचखोरांच्या शिक्षेचे प्रमाण कसे वाढणार असा सवाल उपस्थित होत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या आकडेवारीनुसार २०१८ सालापासून सप्टेंबर २०२२ पर्यंत ४४१ सापळे रचण्यात आले व एकूण ४७१ गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल झाल्यानंतर विभागातर्फे सखोल चौकशी करून दोषारोपपत्र सादर करण्यात येते. मात्र ढिसाळ कारभारामुळे दोषारोपपत्र सादर करण्यास विलंब लागत असल्याचे चित्र आहे. ५७ महिन्यांच्या कालावधीत ३१८ दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. एकूण दाखल गुन्ह्यांच्या तुलनेत याची टक्केवारी ६७.५० टक्के इतकीच आहे.

केवळ ३२ जणांना शिक्षा

२०१८ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल तसेच अगोदरच्या प्रलंबित प्रकरणांची न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी पूर्ण झालेल्या प्रकरणांत ३२ आरोपींना शिक्षा सुनाविण्यात आली. तर एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली. दोषारोपपत्र दाखल करण्यास उशीर होत असल्याने अनेक प्रकरणे फायलींतच असून ती न्यायालयापर्यंत कधी जातील असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अशी आहे आकडेवारी

वर्ष - सापळे - दाखल गुन्हे - दोषारोपपत्र दाखल - शिक्षा

२०१८ - १२१ - १३६ - ११९ - १३

२०१९ - १११ - ११५ - ९९ - ९

२०२० - ७२ - ८३ - ६३ - २

२०२१ - ७२ - ७२ - ३७ - ५

२०२२ (सप्टेंबरपर्यंत) - ६५ - ६५ - ० - ३

२०२२ मध्ये एकही दोषारोपपत्र दाखल नाही

२०१८ ते सप्टेंबर २०२२ च्या आकडेवारीकडे नजर टाकली असता या कालावधीत अनेक प्रकरणांत दोषारोपपत्र दाखल झालेच नाही. २०२२ मध्ये तर ६५ सापळे रचण्यात आले व तेवढेच गुन्हे देखील नोंदविण्यात आले. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीनुसार एकाही प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. अनेक प्रकरणांत वर्ग १ किंवा वर्ग २ चे अधिकारी असतात. त्यांच्यावर कारवाईसाठी संबंधित विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. त्या प्रक्रियेत अनेक महिन्यांचा वेळ निघून जातो. त्यामुळे दोषारोपपत्र दाखल होण्यास उशीर होतो.

लाच मागतोय, करा तक्रार

जर कुठल्याही कामात अडवणूक करून सरकारी कर्मचारी, अधिकारी स्वत: किंवा इतरांमार्फत लाचेची मागणी करत असेल तर त्याला धडा शिकविल्या जाऊ शकतो. नागरिकांसाठी विभागाने १०६४ ही हेल्पलाईन सुरू केली असून एसीबी महाराष्ट्र.नेट या मोबाइल ॲपवर देखील तक्रार करता येते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी