शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीच्या ३२ टक्के प्रकरणांत दोषारोपपत्रांची प्रतीक्षा; शिक्षेचे प्रमाण कसे वाढणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 08:00 IST

Nagpur News ५७ महिन्यांतील ३२ टक्के प्रकरणांमध्ये अद्यापही दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे २०२२ मधील एकाही प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नाही.

ठळक मुद्दे५७ महिन्यांत लाचखोरीचे ४४१ गुन्हे दाखल

योगेश पांडे

नागपूर : लाचखोरांवर नियंत्रण यावे यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे विविध मोहिमा राबविण्यात येतात. मात्र मागील तीन वर्षांपासून कारवाईचा वेग मंदावला असून दोषारोपपत्र सादर करण्यात देखील विलंब होत आहे. ५७ महिन्यांतील ३२ टक्के प्रकरणांमध्ये अद्यापही दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे २०२२ मधील एकाही प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नाही. अशा स्थितीत लाचखोरांच्या शिक्षेचे प्रमाण कसे वाढणार असा सवाल उपस्थित होत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या आकडेवारीनुसार २०१८ सालापासून सप्टेंबर २०२२ पर्यंत ४४१ सापळे रचण्यात आले व एकूण ४७१ गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल झाल्यानंतर विभागातर्फे सखोल चौकशी करून दोषारोपपत्र सादर करण्यात येते. मात्र ढिसाळ कारभारामुळे दोषारोपपत्र सादर करण्यास विलंब लागत असल्याचे चित्र आहे. ५७ महिन्यांच्या कालावधीत ३१८ दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. एकूण दाखल गुन्ह्यांच्या तुलनेत याची टक्केवारी ६७.५० टक्के इतकीच आहे.

केवळ ३२ जणांना शिक्षा

२०१८ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल तसेच अगोदरच्या प्रलंबित प्रकरणांची न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी पूर्ण झालेल्या प्रकरणांत ३२ आरोपींना शिक्षा सुनाविण्यात आली. तर एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली. दोषारोपपत्र दाखल करण्यास उशीर होत असल्याने अनेक प्रकरणे फायलींतच असून ती न्यायालयापर्यंत कधी जातील असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अशी आहे आकडेवारी

वर्ष - सापळे - दाखल गुन्हे - दोषारोपपत्र दाखल - शिक्षा

२०१८ - १२१ - १३६ - ११९ - १३

२०१९ - १११ - ११५ - ९९ - ९

२०२० - ७२ - ८३ - ६३ - २

२०२१ - ७२ - ७२ - ३७ - ५

२०२२ (सप्टेंबरपर्यंत) - ६५ - ६५ - ० - ३

२०२२ मध्ये एकही दोषारोपपत्र दाखल नाही

२०१८ ते सप्टेंबर २०२२ च्या आकडेवारीकडे नजर टाकली असता या कालावधीत अनेक प्रकरणांत दोषारोपपत्र दाखल झालेच नाही. २०२२ मध्ये तर ६५ सापळे रचण्यात आले व तेवढेच गुन्हे देखील नोंदविण्यात आले. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीनुसार एकाही प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. अनेक प्रकरणांत वर्ग १ किंवा वर्ग २ चे अधिकारी असतात. त्यांच्यावर कारवाईसाठी संबंधित विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. त्या प्रक्रियेत अनेक महिन्यांचा वेळ निघून जातो. त्यामुळे दोषारोपपत्र दाखल होण्यास उशीर होतो.

लाच मागतोय, करा तक्रार

जर कुठल्याही कामात अडवणूक करून सरकारी कर्मचारी, अधिकारी स्वत: किंवा इतरांमार्फत लाचेची मागणी करत असेल तर त्याला धडा शिकविल्या जाऊ शकतो. नागरिकांसाठी विभागाने १०६४ ही हेल्पलाईन सुरू केली असून एसीबी महाराष्ट्र.नेट या मोबाइल ॲपवर देखील तक्रार करता येते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी