शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

लाचखोरीच्या ३२ टक्के प्रकरणांत दोषारोपपत्रांची प्रतीक्षा; शिक्षेचे प्रमाण कसे वाढणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 08:00 IST

Nagpur News ५७ महिन्यांतील ३२ टक्के प्रकरणांमध्ये अद्यापही दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे २०२२ मधील एकाही प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नाही.

ठळक मुद्दे५७ महिन्यांत लाचखोरीचे ४४१ गुन्हे दाखल

योगेश पांडे

नागपूर : लाचखोरांवर नियंत्रण यावे यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे विविध मोहिमा राबविण्यात येतात. मात्र मागील तीन वर्षांपासून कारवाईचा वेग मंदावला असून दोषारोपपत्र सादर करण्यात देखील विलंब होत आहे. ५७ महिन्यांतील ३२ टक्के प्रकरणांमध्ये अद्यापही दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे २०२२ मधील एकाही प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नाही. अशा स्थितीत लाचखोरांच्या शिक्षेचे प्रमाण कसे वाढणार असा सवाल उपस्थित होत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या आकडेवारीनुसार २०१८ सालापासून सप्टेंबर २०२२ पर्यंत ४४१ सापळे रचण्यात आले व एकूण ४७१ गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल झाल्यानंतर विभागातर्फे सखोल चौकशी करून दोषारोपपत्र सादर करण्यात येते. मात्र ढिसाळ कारभारामुळे दोषारोपपत्र सादर करण्यास विलंब लागत असल्याचे चित्र आहे. ५७ महिन्यांच्या कालावधीत ३१८ दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. एकूण दाखल गुन्ह्यांच्या तुलनेत याची टक्केवारी ६७.५० टक्के इतकीच आहे.

केवळ ३२ जणांना शिक्षा

२०१८ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल तसेच अगोदरच्या प्रलंबित प्रकरणांची न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी पूर्ण झालेल्या प्रकरणांत ३२ आरोपींना शिक्षा सुनाविण्यात आली. तर एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली. दोषारोपपत्र दाखल करण्यास उशीर होत असल्याने अनेक प्रकरणे फायलींतच असून ती न्यायालयापर्यंत कधी जातील असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अशी आहे आकडेवारी

वर्ष - सापळे - दाखल गुन्हे - दोषारोपपत्र दाखल - शिक्षा

२०१८ - १२१ - १३६ - ११९ - १३

२०१९ - १११ - ११५ - ९९ - ९

२०२० - ७२ - ८३ - ६३ - २

२०२१ - ७२ - ७२ - ३७ - ५

२०२२ (सप्टेंबरपर्यंत) - ६५ - ६५ - ० - ३

२०२२ मध्ये एकही दोषारोपपत्र दाखल नाही

२०१८ ते सप्टेंबर २०२२ च्या आकडेवारीकडे नजर टाकली असता या कालावधीत अनेक प्रकरणांत दोषारोपपत्र दाखल झालेच नाही. २०२२ मध्ये तर ६५ सापळे रचण्यात आले व तेवढेच गुन्हे देखील नोंदविण्यात आले. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीनुसार एकाही प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. अनेक प्रकरणांत वर्ग १ किंवा वर्ग २ चे अधिकारी असतात. त्यांच्यावर कारवाईसाठी संबंधित विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. त्या प्रक्रियेत अनेक महिन्यांचा वेळ निघून जातो. त्यामुळे दोषारोपपत्र दाखल होण्यास उशीर होतो.

लाच मागतोय, करा तक्रार

जर कुठल्याही कामात अडवणूक करून सरकारी कर्मचारी, अधिकारी स्वत: किंवा इतरांमार्फत लाचेची मागणी करत असेल तर त्याला धडा शिकविल्या जाऊ शकतो. नागरिकांसाठी विभागाने १०६४ ही हेल्पलाईन सुरू केली असून एसीबी महाराष्ट्र.नेट या मोबाइल ॲपवर देखील तक्रार करता येते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी