शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

मनपा निवडणुकांच्या तोंडावर गटबाजी टाळा

By admin | Updated: October 14, 2016 03:20 IST

पक्षांतर्गत दुफळी ही शहर राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी नवीन बाब नाही. मात्र मनपा निवडणुकांच्या तोंडावर गटबाजी दिसून येऊ नये

राष्ट्रवादीच्या नेत्यांना निर्देश : अंतर्गत वाद चव्हाट्यावर नकोयोगेश पांडे  नागपूरपक्षांतर्गत दुफळी ही शहर राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी नवीन बाब नाही. मात्र मनपा निवडणुकांच्या तोंडावर गटबाजी दिसून येऊ नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश पक्षनेत्यांना प्रदेश पातळीवरून देण्यात आले आहेत. याअगोदर कितीही वाद झाले असले तरी आता निवडणुकांपर्यंत तरी अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर न आणता एकीने काम करण्याच्या सूचना प्रदेश कार्यकारिणीच्या नेत्यांकडून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.पक्षाच्या स्थापनेला १७ वर्षे झाली असली तरी अद्यापही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा नागपूर शहरात हवा तसा प्रभाव दिसून येत नाही. सातत्याने कॉंग्रेससोबत आघाडी केल्यामुळे कार्यकर्त्यांना संधीच मिळाली नाही व त्यामुळे पक्ष वाढला नाही, अशी पक्ष पदाधिकाऱ्यांची भावना आहे. मात्र पक्षात त्याहून मोठी समस्या म्हणजे नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. शहराध्यक्ष अनिल देशमुख व माजी शहराध्यक्ष अजय पाटील यांच्या गटातील वाद अनेकदा समोर आला आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला याचा चांगलाच फटका बसला होता. अगदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरदेखील या गटबाजीचे प्रदर्शन झाले. जर विदर्भात पक्षाचा जम वाढवायचा असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत चांगली कामगिरी व्हायलाच हवी, यादृष्टीने पक्षश्रेष्ठींकडून रणनीती तयार करण्यात येत आहे. मात्र नागपूर महानगरपालिका निवडणुकांत अंतर्गत वादाचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच याबाबत पुढाकार घेतला आहे. स्थानिक पक्ष पदाधिकाऱ्यांची त्यांनी काही दिवसांअगोदर बैठक घेतली. कुठल्याही परिस्थितीत निवडणुकांपर्यंत अंतर्गत वाद बाहेर आणू नका, असे स्पष्ट निर्देशच त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या विभागीय कार्यकर्ता मेळाव्याअगोदरदेखील गटातटाचे राजकारण स्पष्ट दिसून आले होते.भूतकाळ विसरून भविष्यकाळाकडे पाहायासंदर्भात सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारची बैठक झाली असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. निवडणुकांना सामोरे जाण्याअगोदर पक्षात एकी दिसली पाहिजे ही खरी बाब आहे. नागपुरात नेत्यांमध्ये अगोदर काही गैरसमज होते. पण आता ते दूर झाले आहेत. निवडणुका लक्षात घेता सर्वांना वाद विसरून एकदिलाने काम करण्याबाबत सांगण्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.