शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

समाजविघातक वर्तन टाळा; संघाचे आप्तस्वकीयांना खडे बोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 10:02 IST

सामाजिक मुद्यांवर हिंसक वातावरण निर्माण होण्याच्या घटना मागील काही कालावधीत देशामध्ये दिसून आल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत अशा घटनांवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्देडाव्यांवरदेखील प्रहार

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामाजिक मुद्यांवर हिंसक वातावरण निर्माण होण्याच्या घटना मागील काही कालावधीत देशामध्ये दिसून आल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत अशा घटनांवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. समाजमनाला ठेच पोहोचविणारे किंवा त्यांच्या भावना दुखविणारे वर्तन टाळले पाहिजे, असे खडेबोल सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी संघ परिवारातील संघटनांना सुनावले आहेत. प्रामुख्याने त्यांचा रोख त्रिपुरा येथील लेनिन पुतळा वाद तसेच भाजपसह विविध संघटनांच्या नेत्यांकडून विविध मुद्यांवर वेळोवेळी येणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांवर होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवारपासून उपराजधानीत सुुरुवात झाली. सभेच्या सुरुवातीलाच सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी राष्ट्रीय पातळीवरील स्थितीवर भाष्य करत या मुद्यांवर आपली भूमिका मांडली. आपल्या समाजात आपापसातील संघर्ष व त्यातून होणाऱ्या हिंसक घटना ही चिंतेची बाब आहे. अशा घटनांमध्ये होणाऱ्या हिंसेमध्ये सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होते. ही निंदनीय बाब आहे. समाजमनाला दुखविणाऱ्या काही घटना समाजात घडतात. अशा घटनानंतर सामूहिक पद्धतीने संतप्त प्रतिक्रिया येते. परंतु कुठल्याही कारणाने, व्यवहाराने जनभावना दुखावल्या जाणार नाहीत व समाजाच्या सन्मानाला ठेच पोहोचणार नाही, याची काळजी विविध संंबंधित पक्ष व संघटनांनी घेतली पाहिजे. अशा प्रसंगी धार्मिक, सामाजिक व राजकीय नेतृत्वाने सकारात्मक पुढाकार घेतला पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले.न्याय व सुरक्षा व्यवस्थेवरील विश्वास टिकविण्याची गरजसर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी सार्वजनिकपणे न्यायपालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते. सोबतच देशाच्या सुरक्षा यंत्रणांवरदेखील ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून टीका झाली. या मुद्यावरदेखील सरकार्यवाहांनी भाष्य केले. न्यायव्यवस्था व सुरक्षाव्यवस्था यांच्यावर नागरिकांचा विश्वास आहे. या व्यवस्थांप्रति असलेला सन्मान व विश्वासाला धक्का लागणार नाही, यावर चिंतन व्हायला हवे. संविधानात प्रत्येकाला आपला पक्ष मांडण्याचा अधिकार आहे. परंतु तसे करताना मर्यादांचे पालन व्हायला हवे, असे ते म्हणाले.

समाजात द्वेषभावना पसरविणारे सक्रिययावेळी भय्याजी जोशी यांनी डाव्या विचारसरणीवरदेखील अप्रत्यक्षरीत्या टीका केली. गेल्या काही काळापासून देशात द्वेषभावना पसरविणारे तत्त्व सक्रिय झाले आहेत. सामाजिक वातावरण गढूळ करणाऱ्यांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. भूतकाळातून शिकवण घेऊन वर्तमानातील समस्यांवर सामोपचाराने तोडगा काढला गेला पाहिजे. विशेषत: समाजाला तोडण्याचे व द्वेषभावना पसरविण्याचे काम करणाऱ्यांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे, असे जोशी यांनी सभेला सांगितले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMahalमहाल