शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

समाजविघातक वर्तन टाळा; संघाचे आप्तस्वकीयांना खडे बोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 10:02 IST

सामाजिक मुद्यांवर हिंसक वातावरण निर्माण होण्याच्या घटना मागील काही कालावधीत देशामध्ये दिसून आल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत अशा घटनांवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्देडाव्यांवरदेखील प्रहार

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामाजिक मुद्यांवर हिंसक वातावरण निर्माण होण्याच्या घटना मागील काही कालावधीत देशामध्ये दिसून आल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत अशा घटनांवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. समाजमनाला ठेच पोहोचविणारे किंवा त्यांच्या भावना दुखविणारे वर्तन टाळले पाहिजे, असे खडेबोल सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी संघ परिवारातील संघटनांना सुनावले आहेत. प्रामुख्याने त्यांचा रोख त्रिपुरा येथील लेनिन पुतळा वाद तसेच भाजपसह विविध संघटनांच्या नेत्यांकडून विविध मुद्यांवर वेळोवेळी येणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांवर होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवारपासून उपराजधानीत सुुरुवात झाली. सभेच्या सुरुवातीलाच सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी राष्ट्रीय पातळीवरील स्थितीवर भाष्य करत या मुद्यांवर आपली भूमिका मांडली. आपल्या समाजात आपापसातील संघर्ष व त्यातून होणाऱ्या हिंसक घटना ही चिंतेची बाब आहे. अशा घटनांमध्ये होणाऱ्या हिंसेमध्ये सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होते. ही निंदनीय बाब आहे. समाजमनाला दुखविणाऱ्या काही घटना समाजात घडतात. अशा घटनानंतर सामूहिक पद्धतीने संतप्त प्रतिक्रिया येते. परंतु कुठल्याही कारणाने, व्यवहाराने जनभावना दुखावल्या जाणार नाहीत व समाजाच्या सन्मानाला ठेच पोहोचणार नाही, याची काळजी विविध संंबंधित पक्ष व संघटनांनी घेतली पाहिजे. अशा प्रसंगी धार्मिक, सामाजिक व राजकीय नेतृत्वाने सकारात्मक पुढाकार घेतला पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले.न्याय व सुरक्षा व्यवस्थेवरील विश्वास टिकविण्याची गरजसर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी सार्वजनिकपणे न्यायपालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते. सोबतच देशाच्या सुरक्षा यंत्रणांवरदेखील ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून टीका झाली. या मुद्यावरदेखील सरकार्यवाहांनी भाष्य केले. न्यायव्यवस्था व सुरक्षाव्यवस्था यांच्यावर नागरिकांचा विश्वास आहे. या व्यवस्थांप्रति असलेला सन्मान व विश्वासाला धक्का लागणार नाही, यावर चिंतन व्हायला हवे. संविधानात प्रत्येकाला आपला पक्ष मांडण्याचा अधिकार आहे. परंतु तसे करताना मर्यादांचे पालन व्हायला हवे, असे ते म्हणाले.

समाजात द्वेषभावना पसरविणारे सक्रिययावेळी भय्याजी जोशी यांनी डाव्या विचारसरणीवरदेखील अप्रत्यक्षरीत्या टीका केली. गेल्या काही काळापासून देशात द्वेषभावना पसरविणारे तत्त्व सक्रिय झाले आहेत. सामाजिक वातावरण गढूळ करणाऱ्यांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. भूतकाळातून शिकवण घेऊन वर्तमानातील समस्यांवर सामोपचाराने तोडगा काढला गेला पाहिजे. विशेषत: समाजाला तोडण्याचे व द्वेषभावना पसरविण्याचे काम करणाऱ्यांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे, असे जोशी यांनी सभेला सांगितले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMahalमहाल