शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

अविनाश पोळ : प्रयास - सेवांकुरतर्फे प्रगट मुलाखत

By admin | Updated: July 14, 2014 02:59 IST

दंतरोगतज्ज्ञ म्हणून काम करताना लोकांच्या समस्या

लोकांना लोकांसाठीच कामालालावले अन् गावे सुधारलीत नागपूर : दंतरोगतज्ज्ञ म्हणून काम करताना लोकांच्या समस्या जाणून घेता आल्या. यातून ग्रामीण भागातल्या लोकांचे जीवन समजून घेता आले, त्यांचे राहणीमान आणि अपुऱ्या सोयी, स्वच्छतेचा अभाव यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होतो. याची जाणीव झाली. आपण किमान यात काय योगदान देऊ शकतो या भावनेने मला ग्रासले आणि प्रत्येक रुग्णाची परिस्थिती आणि त्याच्या घरातल्या सोयीसुविधांचा अभ्यास केला. यात प्रत्येकाला मी घरात शौचालय आहे का? हा प्रश्न करायचो आणि उत्तर नाहीच असायचे. एका मुद्यावर काम करायला मी प्रारंभ केला. आरोग्य राखायचे असेल तर शौचालय बांधा. लोकांना ते पटले आणि आज सातारा, कोल्हापूर परिसरातील गावात पाच हजारांपेक्षा जास्त शौचालये निर्माण झाली. लोकांना लोकांसाठीच कामाला लावून यातूनच गावात सुधारणा घडत आहेत, असे मत डॉ. अविनाश पोळ यांनी व्यक्त केले. प्रयास - सेवांकुरतर्फे सातारा येथील प्रसिद्ध दंतरोगतज्ज्ञ आणि समाजसेवक डॉ. अविनाश पोळ यांची प्रकट मुलाखत ‘ आम्ही घडलो, तुम्ही बी घडना’ या अंतर्गत आज बी. आर. ए. मुंडले एज्युकेशन सोसायटीच्या प्लॅटिनम ज्युबिली सभागृह, दक्षिण अंबाझरी मार्ग येथे आयोजित करण्यात आली. ही मुलाखत प्रयासचे डॉ. अविनाश सावजी यांनी घेतली. याप्रसंगी आपला प्रवास उलगडताना पोळ बोलत होते. मी स्वत: खूप काम केले, असे मी म्हणणार नाही. मी लोकांना मात्र काम करण्यासाठी प्रवृत्त केले आणि त्या कामातून त्यांनाच कसा लाभ मिळणार आहे, हे पटवून दिले. हे समुपदेशन मला करता आले, ते लोकांना पटले त्यामुळे गावांमध्ये आजही सुधारणा होते आहे. लोकांनी शौचालये बांधल्यावर त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाली. कारण शौचालये नसल्याने घाण पसरायची, वातावरण आणि पाणी प्रदूषित व्हायचे, त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर व्हायचा. सध्या हा विषय लोकांना पटलेला आहे, त्यामुळे कुणाकडे शौचालय नसेल तर लोकच त्याला समजावून सांगतात. हे काम करीत असतानाच गावांमध्ये पाण्याची टंचाई असल्याची बाब लक्षात आली. या विषयाचा अभ्यास केला आणि पाणी साठविण्यासाठी काय करता येईल याचा विचार केला. ही टंचाई का निर्माण होते आणि पूर्वी पाणी कसे साठवून ठेवले जायचे, याचाही अभ्यास करत राहिलो. काही भागात फिरल्यावर अनेक पेशवेकालीन बंधारे पडित असल्याचे लक्षात आले. हे बंधारे पुन्हा सुस्थितीत आणले तर पाण्याची कमतरता दूर करता येईल, हा विश्वास वाटला. प्रयत्न करावा म्हणून कामाला लागलो आणि त्यात यश आले. येथे श्रमाची गरज होती, थोडी पैशांचीही गरज होती. त्यासाठी श्रमदानाला ग्रामस्थांनाच लावले. एक बंधारा कोल्हापुरी पद्धतीने पूर्ण केला आणि पाण्याची साठवणूक व्हायला लागल्यावर लोक आनंदी झाले. याच पद्धतीने जुने बंधारे पुन्हा दुरुस्त करून त्यांना चांगल्या स्थितीत आणले आणि काही नवे बंधारे बांधण्याचे काम केले. यात ग्रामपंचायतीचा सहभाग घेतला. कामे होत गेली आता अनेक गावातला पाण्याचा प्रश्नही मिटतो आहे. केवळ योजना करून अशी कामे होत नाहीत. त्यासाठी लोकांचा सहभाग घेणे आणि इच्छाशक्ती महत्त्वाची असते. आपण जरा डोळसपणे आजूबाजूला पाहिले तर समस्या सुटू शकतात, सोडविता येऊ शकतात, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)उपस्थितांनी व्यक्त केले कुतूहल याप्रसंगी पोळ यांनी पॉवर पार्इंट सादरीकरण केले. गावात पाणीच नाही अशावेळी जलसंधारण आणि साठवणूक कशी केली याचे प्रात्यक्षिक त्यांनी एलसीडीद्वारे दाखविल्यावर लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले. हा प्रयोग यशस्वी झाल्याचे कळल्यावर अनेकांनी त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. विदर्भातल्या गावांसाठीही काही करा, अशीही मागणी झाली. श्रोत्यांच्या अनेक प्रश्नांना डॉ. पोळ यांनी मनमोकळी उत्तरे दिली.