शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अटेंडन्सनी फिरवली रेल्वे कोचकडे पाठ; रेल्वे व्यवस्थापकांकडे गाऱ्हाणे

By नरेश डोंगरे | Updated: August 24, 2023 20:49 IST

नियमित पगार नाही, दैनिक भत्ताही बंद

नागपूर : दिवसरात्र काम करतो. रेल्वेकडून मात्र नियमित पगार मिळत नाही अन् दैनिक भत्ताही बंद करण्यात आला. त्यामुळे आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न रेल्वेतील कोच अटेंडन्सनी आज अधिकाऱ्यांना केला. मुस्कुटदाबी होत असल्याच्या भावनेमुळे गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या कोच अटेंडन्सनी काम बंद केले. त्यामुळे त्यांच्यावरील दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, आज ही मंडळी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक कार्यालयात आली आणि त्यांनी अधिकाऱ्यांसमोर आपले गाऱ्हाणे मांडले.

नागपूर मुंबई दुरंतो एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, अमृतसर एक्सप्रेस, गरिबरथ एक्सप्रेस, जयपूर एक्सप्रेस या गाड्यांच्या एसी कोच मध्ये दिल्लीच्या एका कंपनीने कोच अटेंडन्सन नियुक्त केले आहेत. या कंपनीने त्यांची जबाबदारी भुसावळच्या एका व्यक्तीकडे सोपवली आहे. त्याने जितेंद्र चंदेल आणि पूरण सिंह नामक व्यक्तींना व्यवस्थापक म्हणून नागपुरात नेमले आहे. त्यांच्या निर्देशानुसार १०० पेक्षा जास्त कोच अटेंडन्स रेल्वे गाड्यांमध्ये काम करतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना नियमित पगार दिला जात नाही.

पगाराच्या नावाखाली मिळणाऱ्या १२ हजार रुपयांतून उशी, ब्लांकेट किंवा चादर कमी आढळल्यास त्यांचे पैसे कापले जातात. आधी प्रवास भत्ता दिला जायचा. आता तोसुद्धा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही घर कसे चालवायचे, जगायचे कसे,असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या स्थितीमुळेच आम्ही काम बंद आंदोलन करीत असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. कोणतीही कपात न करता पूर्ण पगार द्यावा आणि प्रवास भत्ता देण्यात यावा. जोपर्यंत हे मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही कामावर परतणार नाही, असेही ते म्हणाले.

... म्हणून पगार देण्यास अडचणया संबंधाने व्यवस्थापक जितेंद्र चंदेल यांनी बाजू मांडताना रेल्वेकडून वेळेवर आमची बिलं मिळत नसल्याने पगार देण्यास अडचण होत असल्याचे म्हटले. आर्थिक कोंडीमुळे प्रवास भत्ता बंद करण्यात आला असून चादर, ब्लँकेट, उशा गायब होत असल्यामुळे कंपनीला दर महिन्याला १६ ते १७ लाख रुपये पेनॉल्टी द्यावी लागते. मात्र, जुलैपर्यंतचा हिशेब करून सर्व कोच अटेंडन्सना शुक्रवारी २५ ऑगस्टला पगार देण्यात येईल, असेही चंदेल यांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वे