शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

सरकारी अधिकाऱ्यांमध्ये जातीवरून भेदभाव करतो अ‍ॅट्रॉसिटी कायदा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 1:00 AM

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावरून देशभरातील वातावरण तापलेले असताना या कायद्यातल्या कलम ४(१) मधील तरतुदीच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. संबंधित तरतूद सरकारी अधिकाऱ्यांमध्ये जातीवरून भेदभाव करते. त्यामुळे ती तरतूद घटनाबाह्य ठरवून रद्द करण्यात यावी अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवादग्रस्त तरतुदीला आव्हान : घटनाबाह्य घोषित करण्याची विनंती

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावरून देशभरातील वातावरण तापलेले असताना या कायद्यातल्या कलम ४(१) मधील तरतुदीच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. संबंधित तरतूद सरकारी अधिकाऱ्यांमध्ये जातीवरून भेदभाव करते. त्यामुळे ती तरतूद घटनाबाह्य ठरवून रद्द करण्यात यावी अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.गोंदिया जिल्ह्यातील सचिन सोनवणे, प्रेमेश्वर सोनवणे व भाऊराव सोनवणे यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील कलम ४(१) मध्ये, अनुसूचित जाती/जमातीबाहेरच्या सरकारी अधिकाऱ्यांना, हा कायदा व त्याअंतर्गत लागू नियमांनुसार कर्तव्य बजावण्यात जाणीवपूर्वक निष्काळजीपणा केल्यास, ६ महिने ते १ वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा सुनावण्याची तरतूद आहे. ही तरतूद २६ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आली आहे. ही तरतूद घटनाबाह्य असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.राज्यघटनेतील अनुच्छेद १४ मध्ये सर्वांना समानतेचा अधिकार देण्यात आला आहे. अनुच्छेद १५ अनुसार धर्म, पंथ, जात, लिंग व जन्मस्थळावरून कुणामध्येही भेदभाव करता येत नाही. राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये हा देश धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, नागरी सेवा नियम कर्मचाऱ्यांमध्ये जात व धर्मावरून भेदभाव करीत नाही. असे असताना कलम ४(१) मध्ये अनुसूचित जाती/जमातीमधील व इतर जातीमधील अधिकाऱ्यांत भेदभाव करणारी तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद दुर्भावना मनात ठेवून कार्य करणाºया व प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये काहीच फरक करीत नाही. ही तरतूद अनुसूचित जाती/जमातीच्या अधिकाऱ्यांना विशेषाधिकार देणारी आहे. अनुसूचित जाती/जमातीच्या अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केला तरी, त्यांना शिक्षा होणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर कायद्याचा वचक राहणार नाही. या सर्व बाबी लक्षात घेता कलम ४(१) मधील तरतूद रद्द करण्यात यावी असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.राज्य सरकारला नोटीसउच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व मुरलीधर गिरटकर यांनी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राज्य सरकारला नोटीस बजावून यावर २३ जुलैपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. रजनीश व्यास यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा