शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

४१ अंशासह अकाेला देशात सर्वाधिक तापलेले

By निशांत वानखेडे | Published: March 26, 2024 7:45 PM

विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात दिवसाचा पारा ४० अंशाच्या पार गेला असून ४१.५ अंश कमाल तापमानासह अकाेला हे देशातील सर्वाधित तापलेले शहर ठरले आहे.

नागपूर : गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विदर्भाला सूर्याचा प्रकाेप सहन करावा लागेल, असा अंदाज दिसून येत आहे. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात दिवसाचा पारा ४० अंशाच्या पार गेला असून ४१.५ अंश कमाल तापमानासह अकाेला हे देशातील सर्वाधित तापलेले शहर ठरले आहे.

ढगाळ वातावरण हटल्यानंतर विदर्भाचे तापमान दिवसागणिक वाढत चालले आहे. अंश-अंशाची भर पडत विदर्भातील जिल्हे पुन्हा तापमानाची उच्चांकी गाठायला सज्ज आहेत. गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या बहुतेक दिवसात अकाेला, चंद्रपूर, वर्धा, नागपूर ही शहरे तापमानवाढीच्या जागतिक क्रमावारीत हाेते. यंदाही तिच स्थिती दिसून येत आहे. अकाेला देशात सर्वात तापदायक ठरले तर त्याखालाेखाल वाशिमचाही पारा ४१.४ अंशावर पाेहचला आहे. याशिवाय अमरावती, बुलढाणा, ब्रम्हपुरी, बुलढाणा, यवतमाळ या शहरांनी ४० अंशाचा आकडा पार केला आहे. आश्चर्य म्हणजे सध्यातरी चंद्रपूरचा पारा सरासरीखाली म्हणजे ३८.६ अंशावर आहे. ३८ अंशासह गाेंदियासुद्धा सरासरीच्या खाली आहे.

तापमान वाढल्याने उन्हाच्या झळा प्रचंड वाढल्या आहेत. दुसरीकडे नागपूरमध्ये दिवसाचा पारा अंशत: वाढत ३९ अंशावर गेला आहे. दिवसभर आकाश काहीसे ढगांनी झाकले हाेते पण सूर्याचा ताप अधिक तीव्र असल्याने उकाड्याची जाणीव तीव्र हाेत आहे.

पाच दिवसात २ ते ४ अंशाने वाढेल

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या पाच दिवसात विदर्भासह मध्य भारतात कमाल तापमान २ ते ४ अंशाने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्याचा व अधिक सतर्क राहण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTemperatureतापमान