शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
3
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
4
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
5
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
6
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
7
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
8
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
9
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
10
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
11
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
12
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
13
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
14
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
15
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
16
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
17
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
18
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
19
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
20
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)

संकुचित विचारसरणीमुळे ज्योतिषशास्त्राला कमीपणा आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:55 IST

ज्योतिषशास्त्राला एका चौकटीत बंदिस्त करण्यात आले आहे. संकुचित विचारसरणीमुळे या शास्त्राला कमीपणा आला आहे, असे मत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ.उमा वैद्य यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्योतिषशास्त्र हे अभ्यासाचे शास्त्र आहे. परंतु अनेकांना या शास्त्राचे महत्त्व व स्वरुपच कळालेले नाही. नोकरी, लग्न, अपत्यप्राप्ती याच गोष्टीसाठी लोक याचा उपयोग करताना दिसून येतात. ज्योतिषशास्त्राला एका चौकटीत बंदिस्त करण्यात आले आहे. संकुचित विचारसरणीमुळे या शास्त्राला कमीपणा आला आहे, असे मत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ.उमा वैद्य यांनी व्यक्त केले. राष्ट्रसेविका समितीच्या प्रथम प्रचारिका सिंधुताई फाटक यांच्या स्मरणार्थ संघमित्रा प्रतिष्ठानतर्फे सिंधू सन्मान प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.धंतोली येथील अहल्या मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, संघमित्रा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुप्रिया काळे या उपस्थित होत्या. विविध क्षेत्रात लक्षणीय प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांना सिंधू सन्मान प्रदान करण्यात येतो. बेकरीच्या व्यवसायातून स्वत:ची ओळख निर्माण करणाºया नाशिकच्या ८४ वर्षीय गंगुताई धामणकर, नागपूरच्या पंचांग अभ्यासिका विद्याताई राजंदेकर, कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात करोडपती बनणाºया पहिल्या महिला बबिता ताडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आजकालचे पुरस्कार चंगळवादाकडे झुकलेले दिसून येतात. चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक करताना खरोखर समाधान देणारे पुरस्कार फार थोडके राहिले आहेत. ज्योतिषशास्त्र हे योग्य पद्धतीने अभ्यासायचे शास्त्र आहे. ते कळले नाही म्हणून टीका करणे योग्य नाही. एखाद्याने हे शास्त्र शिकले तर आता त्याचे नवीन दुकान सुरू होईल, अशी भाषा वापरली जाते. या शास्त्राचे महत्त्व कळाले नसल्यानेच अशा प्रतिक्रिया येतात, असे डॉ.उमा वैद्य म्हणाल्या. यावेळी तिन्ही पुरस्कार विजेत्यांच्या प्रकट मुलाखतीदेखील घेण्यात आल्या. मेधा नांदेडकर, सीमा देशपांडे, आदिती देशमुख यांनी या मुलाखती घेतल्या. आयुष्यात अनेक संकट आली. परंतु साखर नाही म्हणून गूळ वापरण्यासारखा प्रकार आम्ही कधीच केला नाही, असे प्रतिपादन गंगुताई धामणकर यांनी केले. पंचांग हे कुणीही अभ्यासू शकते. कुठलेही काम करण्याची शुभ वेळ हे थोतांड नसून त्यामागे शास्त्र असल्याचे मत विद्या राजंदेकर यांनी व्यक्त केले. निराश झाल्यावर परिस्थितीला दोष न देता त्यावर मात करण्यासाठी जिद्द दाखविली पाहिजे, असे आवाहन बबिता ताडे यांनी केले.

 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषnagpurनागपूर