शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

पक्ष कमकुवत करणारे नकोच : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:29 IST

आता २०१४ सारखी परिस्थिती राहिलेली नाही. केंद्र व राज्य सरकारविषयी लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. मात्र लोकांच्या समस्या समजून त्या सोडविण्यासाठी त्यांच्यापर्यत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाण्याची गरज आहे. ही परीक्षेची वेळ आहे. पक्षाचा विजय होईल या ध्येयाने कामाला लागण्याची गरज आहे. पक्षाला कमकुवत करणाऱ्यांची नाही तर विजय देणाºयांची गरज आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देदेवडिया भवनात घेतली शहर काँग्रेसची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आता २०१४ सारखी परिस्थिती राहिलेली नाही. केंद्र व राज्य सरकारविषयी लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. मात्र लोकांच्या समस्या समजून त्या सोडविण्यासाठी त्यांच्यापर्यत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाण्याची गरज आहे. ही परीक्षेची वेळ आहे. पक्षाचा विजय होईल या ध्येयाने कामाला लागण्याची गरज आहे. पक्षाला कमकुवत करणाऱ्यांची नाही तर विजय देणाऱ्यांची गरज आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी देवडिया काँग्रेस भवन येथे गुरुवारी शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक घेतली. तीत कामगार नेते आ.भाई जगताप, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह अनंतराव घारड, अ‍ॅड.अभिजित वंजारी, अभिजित सपकाळ, अतुल कोटेचा, अतुल लोंढे, उमाकांत अग्निहोत्री, रामगोविंद खोब्रागडे, शेख हुसैन, नरेश गावंडे, प्रा. दिनेश बानाबाकोडे, दीपक वानखेडे, विवेक निकोसे, प्रज्ञा बडवाईक, राजू व्यास, जयंत लुटे, संदेश सिंगलकर, बडोपंत टेंभुर्णे, अ‍ॅड.अक्षय समर्थ, मालिनी खोब्रागडे, वीणा बेलगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा विकास होत असल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्षात औद्योगिक विकासात पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता १३ व्या क्रमांकावर गेला आहे. नोटबंदीमुळे गुंतवणूक कमी झाली. व्यापाऱ्यांना प्रचंड प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. झारखंड सारखे राज्य पुढे गेले. आता कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असे यांनाच विचारण्याची वेळ आली आहे. यावेळी चव्हाण यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणेही ऐकून घेतले.आ. भाई जगताप यांनी शहर कॉग्रेसच्या तीन वर्षांच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर शहर अध्यक्ष व शहर पदाधिकारी यांची प्रशंसा केली. असेच काम झाले तर आगामी निवडणूकांमध्ये कॉग्रेस यशाचे शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. अ‍ॅड. रेखा बाराहाते, दर्शनी धवड, राजेश कुंभलकर, किशोर गीद, राजू व्यास यांनी संघटन बळकटीसाठी शहर काँग्रेसची भूमिका मांडली. संचालन सरचिटणीस डॉ. गजराज हटेवार यांनी तर आभार प्रदर्शन वीणा बेलगे यांनी केले.यशवंत बाजीराव काँग्रेसमध्येयावेळी भाजपाचे माजी आमदार यशवंत बाजीराव यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.मी काम करणाऱ्याच्या पाठिशीप्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, कुणी किती काम केले याचे मूल्यांकन होत आहे. आता बूथवर किती मिळाली हे शोधणारे अ‍ॅपही आले आहे. नागपूरमध्ये दोन मोठे मोर्चे यशस्वीपणे काढण्यात आले. मला सर्व माहीत आहे. माझे काम आवडो ना आवडो, परंतु जो करतो त्याच्या पाठिशी मी खंबीरपणे उभा आहे, असे सांगत त्यांनी ठाकरे यांच्या कामाला पावती दिली.ठाकरेंनी मांडला लेखाजोखायावेळी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आगामी लोकसभा -विधानसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. शहर कॉग्रेस कमेटी पूर्णपणे क्रियाशील असून बूथ कमिटी,बूथ अध्यक्ष बनविण्याचे काम ब्लॉक अध्यक्षांमार्फत तसेच शहर कॉग्रेसचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने लवकरच पूर्ण करुन एक मजबूत संघटन या शहरात तयार केले जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षातील कार्याचा आढावा त्यांनी पुस्तक स्वरुपात प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे सादर केला.

 

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण