शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

पक्ष कमकुवत करणारे नकोच : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:29 IST

आता २०१४ सारखी परिस्थिती राहिलेली नाही. केंद्र व राज्य सरकारविषयी लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. मात्र लोकांच्या समस्या समजून त्या सोडविण्यासाठी त्यांच्यापर्यत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाण्याची गरज आहे. ही परीक्षेची वेळ आहे. पक्षाचा विजय होईल या ध्येयाने कामाला लागण्याची गरज आहे. पक्षाला कमकुवत करणाऱ्यांची नाही तर विजय देणाºयांची गरज आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देदेवडिया भवनात घेतली शहर काँग्रेसची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आता २०१४ सारखी परिस्थिती राहिलेली नाही. केंद्र व राज्य सरकारविषयी लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. मात्र लोकांच्या समस्या समजून त्या सोडविण्यासाठी त्यांच्यापर्यत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाण्याची गरज आहे. ही परीक्षेची वेळ आहे. पक्षाचा विजय होईल या ध्येयाने कामाला लागण्याची गरज आहे. पक्षाला कमकुवत करणाऱ्यांची नाही तर विजय देणाऱ्यांची गरज आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी देवडिया काँग्रेस भवन येथे गुरुवारी शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक घेतली. तीत कामगार नेते आ.भाई जगताप, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह अनंतराव घारड, अ‍ॅड.अभिजित वंजारी, अभिजित सपकाळ, अतुल कोटेचा, अतुल लोंढे, उमाकांत अग्निहोत्री, रामगोविंद खोब्रागडे, शेख हुसैन, नरेश गावंडे, प्रा. दिनेश बानाबाकोडे, दीपक वानखेडे, विवेक निकोसे, प्रज्ञा बडवाईक, राजू व्यास, जयंत लुटे, संदेश सिंगलकर, बडोपंत टेंभुर्णे, अ‍ॅड.अक्षय समर्थ, मालिनी खोब्रागडे, वीणा बेलगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा विकास होत असल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्षात औद्योगिक विकासात पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता १३ व्या क्रमांकावर गेला आहे. नोटबंदीमुळे गुंतवणूक कमी झाली. व्यापाऱ्यांना प्रचंड प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. झारखंड सारखे राज्य पुढे गेले. आता कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असे यांनाच विचारण्याची वेळ आली आहे. यावेळी चव्हाण यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणेही ऐकून घेतले.आ. भाई जगताप यांनी शहर कॉग्रेसच्या तीन वर्षांच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर शहर अध्यक्ष व शहर पदाधिकारी यांची प्रशंसा केली. असेच काम झाले तर आगामी निवडणूकांमध्ये कॉग्रेस यशाचे शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. अ‍ॅड. रेखा बाराहाते, दर्शनी धवड, राजेश कुंभलकर, किशोर गीद, राजू व्यास यांनी संघटन बळकटीसाठी शहर काँग्रेसची भूमिका मांडली. संचालन सरचिटणीस डॉ. गजराज हटेवार यांनी तर आभार प्रदर्शन वीणा बेलगे यांनी केले.यशवंत बाजीराव काँग्रेसमध्येयावेळी भाजपाचे माजी आमदार यशवंत बाजीराव यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.मी काम करणाऱ्याच्या पाठिशीप्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, कुणी किती काम केले याचे मूल्यांकन होत आहे. आता बूथवर किती मिळाली हे शोधणारे अ‍ॅपही आले आहे. नागपूरमध्ये दोन मोठे मोर्चे यशस्वीपणे काढण्यात आले. मला सर्व माहीत आहे. माझे काम आवडो ना आवडो, परंतु जो करतो त्याच्या पाठिशी मी खंबीरपणे उभा आहे, असे सांगत त्यांनी ठाकरे यांच्या कामाला पावती दिली.ठाकरेंनी मांडला लेखाजोखायावेळी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आगामी लोकसभा -विधानसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. शहर कॉग्रेस कमेटी पूर्णपणे क्रियाशील असून बूथ कमिटी,बूथ अध्यक्ष बनविण्याचे काम ब्लॉक अध्यक्षांमार्फत तसेच शहर कॉग्रेसचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने लवकरच पूर्ण करुन एक मजबूत संघटन या शहरात तयार केले जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षातील कार्याचा आढावा त्यांनी पुस्तक स्वरुपात प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे सादर केला.

 

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण