शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

कचरा संकलन कंपन्यांची मुजोरी; सामान्य नागरिकांचे तर सोडा पण नगरसेवकांचाही फोन उचलत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 1:12 PM

Nagpur News एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी मुजोर झाले आहेत. ते सामान्य नागरिकांचे तर सोडा पण नगरसेवकांचाही फोन उचलत नाही, अशी तक्रार विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी केली.

ठळक मुद्देविरोधी पक्षनेत्यांनी नोंदविला आक्षेपचौकशी समितीने कंपनी प्रमुखांचे मत मागितले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपा प्रशासनाने शहरातील कचरा संकलन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी कंपनीकडे सोपविली आहे. परंतु कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी मुजोर झाले आहेत. ते सामान्य नागरिकांचे तर सोडा पण नगरसेवकांचाही फोन उचलत नाही, अशी तक्रार विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी केली.

कचरा संकलन कंपन्यांच्या कामकाजाबाबत असलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. मंगळवारी या समितीपुढे तानाजी वनवे यांनी आपले मत मांडले. वस्त्यांमध्ये सहा ते सात दिवसानंतर कचरा गाड्या येतात. नागरिक नगरसेवकांकडे तक्रार करतात. पण नगरसेवकांच्या फोनला कंपनीचे अधिकारी प्रतिसाद देत नाही. कंपनीमध्ये नोकरी लावण्यासाठी कंपनी व्यवस्थापकांकडून भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप वनवे यांनी केला. यासंदर्भात कंपनी प्रमुखांचे मत मागविण्याचे निर्देश अविनाश ठाकरे यांनी दिले.

समिती सदस्य वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती महेश महाजन, नगरसेवक नितीन साठवणे, सदस्य अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे,उपायुक्त राजेश भगत, नोडल अधिकारी स्वच्छता डॉ. गजेंद्र महल्ले, निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांच्यासह दहाही झोनचे अधिकारी आणि दोन्ही कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

९ जुलै रोजी झालेल्या बैठकीमध्ये आमदार प्रवीण दटके आणि विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी कंपनीच्या कार्यप्रणालीबाबत आपले मत मांडण्यांसदर्भात समितीकडे पत्र सादर केले होते. त्यानुसार मंगळवारी वनवे हे प्रत्यक्षात उपस्थित झाले तर आमदार प्रवीण दटके लेखी स्वरूपात आपले मत नोंदविणार आहेत.

कचऱ्याच्या ट्रकमध्ये माती

बसपा गटनेता जितेंद्र घोडेस्वार यांच्याद्वारे दाखल व्हिडिओमध्ये ट्रकमध्ये माती मिश्रीत कचरा असल्याचे गेल्या बैठकीत निदर्शनास आले. या प्रकरणी संबंधित ट्रक चालक व मालक यांचे बयाण नोंदविण्यात आले. त्या सर्व बयाणांचे कंपनीच्या प्रतिनिधीकडून वाचन करण्यात आले.

पुरावे समितीपुढे ठेवा

दोन्ही कंपन्यांच्या कर्मचारी भरतीमधील भ्रष्टाचारासंदर्भात विरोधी पक्षनेत्यांकडे कुठलेही पुरावे असल्यास त्यांनी ते समितीपुढे ठेवण्याची सूचना केली. विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या अभिप्रायामध्ये मांडलेले मुद्दे गंभीर आहेत. याबाबत चौकशी होणे आवश्यक असल्याने संबंधित कंपनी प्रमुखांचे अभिप्राय नोंदविण्याचे निर्देश अविनाश ठाकरे यांनी दिले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न