शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

आवक वाढली, भाज्या उतरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 02:06 IST

पावसामुळे भाज्यांची आवक दुप्पट आहे. बहुतांश भाज्यांच्या भावात घसरण झाली आहे.

भाव घसरल्याने शेतकरी हताश : पावसामुळे आवक वाढणार नागपूर : पावसामुळे भाज्यांची आवक दुप्पट आहे. बहुतांश भाज्यांच्या भावात घसरण झाली आहे. भाव कमी झाल्यामुळे शेतकरी हताश असून पावसामुळे भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे. सणासुदीत गृहिणींना भाज्या किफायत भावात मिळतील. सध्या ग्राहक कमी आहे, पण किरकोळमध्ये भाज्या महागच आहेत. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आवक वाढेल, परिणामी भाव कमी होतील, अशी माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी भाज्यांची लागवड केली आहे. आॅगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात भाज्या मोठ्या प्रमाणात बाजारात येतील. सरकारच्या निर्णयाचा परिणाम शेतकऱ्यांना भाजीपाला खुल्या बाजारात विकण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर विविध बाजारात शेतकरी भाज्यांची विक्री करीत आहे. मंगळवारी, सक्करदरा, वर्धा रोड, वाडी या भागात शेतकरी स्वत: भाज्या विकत आहेत. शेतकऱ्यांना भाव तर ग्राहकांना ताज्या भाज्या मिळत आहेत. कॉटन मार्केट चिल्लर आणि ठोक व्यवसायासाठी प्रचलित असल्यामुळे शेतकऱ्यांकडून आवक वाढली आहे. या बाजारात भाज्या विकण्यास शेतकऱ्यांना मनाई नाही. फुलकोबी ६०, हिरवी मिरची १०० रु. स्थानिक शेतकऱ्यांकडून फुलकोबीची आवक कमी झाल्यामुळे भाव वधारले आहेत. किरकोळमध्ये ६० रुपये किलो विक्री सुरू आहे. सध्या औरंगाबाद येथून आवक आहे. शेतकऱ्यांकडून फुलकोबी, पालक, चवळी भाजी, टमाटर आणि वांगे विक्रीस येत आहेत. वांगे आणि टमाटरचे भाव कमी झाले आहे. ठोक बाजारात १५ रुपये तर किरकोळमध्ये ३० रुपये भाव आहे. सध्या हिरवी मिरची पंजाबचा काही भाग आणि रायपूर व जगदलपूर येथून येत आहे. रविवारी ठोक बाजारात ६५ ते ७५ रुपये तर किरकोळमध्ये १०० रुपयांत विक्री झाल्याचे महाजन यांनी सांगितले. ठोकमध्ये सांबार १० रुपये किलो! पावसानंतर जूनच्या अखेरीस सांबारची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. छिंदवाडा,नांदेड, नाशिक येथून प्रचंड आवक आहे. तीन दिवसांपूर्वी १२ ते १३ ट्रक सांबार विक्रीविना पडून होता. सध्या संगमनेर, जयपूर (राजस्थान), मदनपल्ली (आंध्र प्रदेश) येथून टमाटर नागपुरात विक्रीसाठी येत आहेत. किरकोळमध्ये टमाटर ३० रुपये किलो आहेत. सिमला मिरची दुर्ग व भिलाई, भेंडी गोंदिया, कारले काटोल येथून, चवळी व गवार शेंगा नागपूर जिल्हा, पत्ताकोबी मुलताई या भागातून विक्रीस येत आहे. कांदे स्वस्त, बटाटे महाग मुबलक साठा आणि ग्राहकांकडून उठाव नसल्यामुळे कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. कळमन्यात दर्जानुसार भाव ५ ते ८ रुपये असून किरकोळमध्ये १५ रुपयांत विक्री सुरू आहे. गेल्यावर्षी कांदे महाग झाल्यानंतर सर्वच राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड झाली. गुजरात, बिहार, बंगाल, ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेशात या राज्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. यंदा कांद्याचे भाव वाढणार नाहीत. सध्या कळमन्यात अकोला, अमरावती येथून पांढरे तर बुलडाणा येथून लाल कांदे विक्रीस येत आहेत. आठवड्यात सरासरी २५ ट्रकची (प्रति ट्रक १० ते १२ टन) आवक आहे. शनिवारी ५० ट्रक आले. २५ ते ३० ट्रक विक्री झाली तर २० ट्रक कांदा बाजारात पडून होता. आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यात लाल कांदे निघाले आहेत. कळमन्यात एक महिन्यात विक्रीला येतील, अशी माहिती आलू-कांदे आडतिया असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी लोकमतला सांगितले. बटाटे महागच यंदा बटाट्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे तीन महिन्यापासून बटाटे महाग झाले आहेत. कळमन्यात आवक कमी आहे. दर्जानुसार १६ ते १८ रुपये किलो भाव असून किरकोळमध्ये ३० रुपये किलो भावात विक्री होत आहे. गेल्यावर्षी जास्त उत्पादनामुळे बटाट्याला भाव कमी मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड कमी केली. कानपूर, अलाहाबाद, आग्रा येथून आवक आहे. दररोज १० ते १२ ट्रक विक्रीस येत आहेत. बंगळुरू येथे बटाट्याचे पीक निघाले आहे. कळमन्यात येण्यास दीड महिना लागेल. काही भागात नवीन बटाटे दिवाळीनंतर बाजारात येतील, असे वसानी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)