शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

आवक वाढली, भाज्या उतरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 02:06 IST

पावसामुळे भाज्यांची आवक दुप्पट आहे. बहुतांश भाज्यांच्या भावात घसरण झाली आहे.

भाव घसरल्याने शेतकरी हताश : पावसामुळे आवक वाढणार नागपूर : पावसामुळे भाज्यांची आवक दुप्पट आहे. बहुतांश भाज्यांच्या भावात घसरण झाली आहे. भाव कमी झाल्यामुळे शेतकरी हताश असून पावसामुळे भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे. सणासुदीत गृहिणींना भाज्या किफायत भावात मिळतील. सध्या ग्राहक कमी आहे, पण किरकोळमध्ये भाज्या महागच आहेत. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आवक वाढेल, परिणामी भाव कमी होतील, अशी माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी भाज्यांची लागवड केली आहे. आॅगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात भाज्या मोठ्या प्रमाणात बाजारात येतील. सरकारच्या निर्णयाचा परिणाम शेतकऱ्यांना भाजीपाला खुल्या बाजारात विकण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर विविध बाजारात शेतकरी भाज्यांची विक्री करीत आहे. मंगळवारी, सक्करदरा, वर्धा रोड, वाडी या भागात शेतकरी स्वत: भाज्या विकत आहेत. शेतकऱ्यांना भाव तर ग्राहकांना ताज्या भाज्या मिळत आहेत. कॉटन मार्केट चिल्लर आणि ठोक व्यवसायासाठी प्रचलित असल्यामुळे शेतकऱ्यांकडून आवक वाढली आहे. या बाजारात भाज्या विकण्यास शेतकऱ्यांना मनाई नाही. फुलकोबी ६०, हिरवी मिरची १०० रु. स्थानिक शेतकऱ्यांकडून फुलकोबीची आवक कमी झाल्यामुळे भाव वधारले आहेत. किरकोळमध्ये ६० रुपये किलो विक्री सुरू आहे. सध्या औरंगाबाद येथून आवक आहे. शेतकऱ्यांकडून फुलकोबी, पालक, चवळी भाजी, टमाटर आणि वांगे विक्रीस येत आहेत. वांगे आणि टमाटरचे भाव कमी झाले आहे. ठोक बाजारात १५ रुपये तर किरकोळमध्ये ३० रुपये भाव आहे. सध्या हिरवी मिरची पंजाबचा काही भाग आणि रायपूर व जगदलपूर येथून येत आहे. रविवारी ठोक बाजारात ६५ ते ७५ रुपये तर किरकोळमध्ये १०० रुपयांत विक्री झाल्याचे महाजन यांनी सांगितले. ठोकमध्ये सांबार १० रुपये किलो! पावसानंतर जूनच्या अखेरीस सांबारची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. छिंदवाडा,नांदेड, नाशिक येथून प्रचंड आवक आहे. तीन दिवसांपूर्वी १२ ते १३ ट्रक सांबार विक्रीविना पडून होता. सध्या संगमनेर, जयपूर (राजस्थान), मदनपल्ली (आंध्र प्रदेश) येथून टमाटर नागपुरात विक्रीसाठी येत आहेत. किरकोळमध्ये टमाटर ३० रुपये किलो आहेत. सिमला मिरची दुर्ग व भिलाई, भेंडी गोंदिया, कारले काटोल येथून, चवळी व गवार शेंगा नागपूर जिल्हा, पत्ताकोबी मुलताई या भागातून विक्रीस येत आहे. कांदे स्वस्त, बटाटे महाग मुबलक साठा आणि ग्राहकांकडून उठाव नसल्यामुळे कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. कळमन्यात दर्जानुसार भाव ५ ते ८ रुपये असून किरकोळमध्ये १५ रुपयांत विक्री सुरू आहे. गेल्यावर्षी कांदे महाग झाल्यानंतर सर्वच राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड झाली. गुजरात, बिहार, बंगाल, ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेशात या राज्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. यंदा कांद्याचे भाव वाढणार नाहीत. सध्या कळमन्यात अकोला, अमरावती येथून पांढरे तर बुलडाणा येथून लाल कांदे विक्रीस येत आहेत. आठवड्यात सरासरी २५ ट्रकची (प्रति ट्रक १० ते १२ टन) आवक आहे. शनिवारी ५० ट्रक आले. २५ ते ३० ट्रक विक्री झाली तर २० ट्रक कांदा बाजारात पडून होता. आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यात लाल कांदे निघाले आहेत. कळमन्यात एक महिन्यात विक्रीला येतील, अशी माहिती आलू-कांदे आडतिया असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी लोकमतला सांगितले. बटाटे महागच यंदा बटाट्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे तीन महिन्यापासून बटाटे महाग झाले आहेत. कळमन्यात आवक कमी आहे. दर्जानुसार १६ ते १८ रुपये किलो भाव असून किरकोळमध्ये ३० रुपये किलो भावात विक्री होत आहे. गेल्यावर्षी जास्त उत्पादनामुळे बटाट्याला भाव कमी मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड कमी केली. कानपूर, अलाहाबाद, आग्रा येथून आवक आहे. दररोज १० ते १२ ट्रक विक्रीस येत आहेत. बंगळुरू येथे बटाट्याचे पीक निघाले आहे. कळमन्यात येण्यास दीड महिना लागेल. काही भागात नवीन बटाटे दिवाळीनंतर बाजारात येतील, असे वसानी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)