शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

नागपुरात कृषी विद्यापीठाच्या परिसरात शेतकऱ्यांनी पेटविले धान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 21:50 IST

जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचे धरणातील पाणी न मिळाल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातूनही कसेबसे शेतकऱ्यांच्या हातात पीक आले असताना शासनाने धानाचे भाव पाडल्याने शेतकरी पुरता खचलेला आहे. आपल्या व्यथा शासनापुढे मांडण्यासाठी रामटेक व पारशिवनी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या परिसरात धान जाळले. काही शेतकऱ्यांनी तर आपल्या शेतात धान जाळले.

ठळक मुद्देपडलेल्या भावामुळे शेतकरी चिंतेत : खर्चही निघाला नसल्याची ओरड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचे धरणातील पाणी न मिळाल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातूनही कसेबसे शेतकऱ्यांच्या हातात पीक आले असताना शासनाने धानाचे भाव पाडल्याने शेतकरी पुरता खचलेला आहे. आपल्या व्यथा शासनापुढे मांडण्यासाठी रामटेक व पारशिवनी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या परिसरात धान जाळले. काही शेतकऱ्यांनी तर आपल्या शेतात धान जाळले.सहा वर्षाआधी ३८०० रुपये विकलेल्या धानाला आज ३००० ते ३२०० भावाने शेतकऱ्यांना विकावे लागत आहे. त्यामुळे लागलेली लागत सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळे हतबल आणि संतप्त झालेल्या टेकाडी येथील भगवानदास यादव या शेतकऱ्याने आपल्या शेतात धान पिक पेटवून सरकारचा विरोधात संताप नोंदविला आहे. सरकारने शेतकऱ्यांना मोठमोठे आश्वासन दिले आणि सत्ता मिळवली. आता मात्र सर्व काही फोल ठरत आहे. शेतकरी नेते संजय सत्यकार यांनी जिल्ह्यातील धानपट्ट्यात सरकार विरोधात आंदोलन सुरू केले आहे. सरकारला शेतकऱ्यांची थोडी तरी फिकर असेल तर लवकरत लवकर झालेल्या नुकसानीची भरपाई जाहीर करावी व धानाच्या पडलेल्या भावाबद्दल भूमिका ठरवावी, अन्यथा आता शेतकरी शांत बसणार नाही आता थेट मुख्यमंत्राच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नागपुरात पोहचून गुरुवारी काही शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या परिसरात धान जाळून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन