शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

विधान परिषदेवरील नियुक्त्या घटनाबाह्यच

By admin | Updated: June 12, 2014 01:06 IST

एकूणच समाजात अविवेकी, धर्मद्वेषी, असहिष्णू, सांप्रदायिक व अत्याचारी शक्तींनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. पुण्यातील अभियंत्याची हत्या, दाभोलकरांचा खुनी न गवसणे, दलितांवरील अत्याचार,

नागपूर : एकूणच समाजात अविवेकी, धर्मद्वेषी, असहिष्णू, सांप्रदायिक व अत्याचारी शक्तींनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. पुण्यातील अभियंत्याची हत्या, दाभोलकरांचा खुनी न गवसणे, दलितांवरील अत्याचार, स्त्रियांवरील बलात्कार अशा घटनांत सातत्याने वाढ होते आहे. यामागे समतेच्या अधिष्ठानावर कारभार न चालणे आणि समाजातली सांस्कृतिक जाण कमी होणे आहे. यामुळेच असांस्कृतिक वातावरण निर्मिती झाली आहे आणि हिंसक वृत्ती निर्माण होते आहे. या मुद्यांकडे लक्ष दिले जावे आणि समाजातील प्रतिभावंतांची मते लक्षात घ्यावी म्हणून घटनेने विधान परिषदेवर प्रतिभावंत, तज्ज्ञांची नियुक्ती करण्याचे अधिकार राज्यपालांना दिले आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून या जागांवर राजकीय नेत्यांचीच वर्णी लागते आहे. यंदाही विधान परिषदेवर करण्यात आलेल्या नियुक्त्या या घटनाबाह्य असून यासंदर्भात अनेकदा निवेदन दिल्यावरही शासनाने घटनाबाह्य नियुक्त्या करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. ही घटनेचा अवमान करणारी बाब असून याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने घेतला आहे. आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शासनाने धर्म, संप्रदाय, संस्कृती यातील विवेक, सहिष्णुता आणि प्रागतिक मूल्यांशी संपर्कच तोडला आहे. राज्याच्या निर्मितीपासून विधान परिषदेवर आतापर्यंत राज्यपालांच्या अधिकारातील १२ नियुक्त्या राज्यघटनेचा भंग करूनच करण्यात आल्या आहेत. घटनेत समाज, साहित्य, संस्कृती, शिक्षण, सहकार या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांसाठी राखीव जागांवर राजकारण्यांनीच डाव साधला. यामुळे या क्षेत्रातील नियुक्त्यांच्या संदर्भाच मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. या बाबीकडे मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान यांचे लक्ष आघाडीने वेधले आहे. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात आघाडीच्यावतीने न्यायालयाच जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आघाडीचे संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी दिली आहे. या बैठकीला विलास भोंगाडे, किशोर दिवेकर, डॉ. चंद्रभान भोयर, रवींद्र फडणवीस, विलास जांभुळकर, प्रकाश दुलेवाले, शरद ठाकरे, ज्ञानेश्वर वांढरे, अरुण वनकर, अरुण लाटकर, योगेश ठाकरे, परसराम राऊत, अ‍ॅड. अविनाश काळे आदी अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)