शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नवीन झाडे लावा, जगवा तरच तोडण्याची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 21:13 IST

विकासाच्या नावाखाली शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. याला वेळीच निर्बंध न घातल्यास नागपूर शहराची ‘ग्रीन सिटी’ म्हणून असलेली ओळख भविष्यात पुसली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. विकास तर हवाच पण पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षसंवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत वृक्ष तोडण्याची परवानगी देण्यापूर्वी संबंधित विकासकाने एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावून त्यांचे व्यवस्थित संगोपन करावयाचे आहे. नवीन झाडे मोठी होत असल्याची खात्री पटल्यानंतरच वृक्ष तोडण्याची परवानगी देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या प्रक्रि येची कठोर अंमलबजावणी व्हावी, यात पारदर्शकता यावी, यासाठी उद्यान विभागातर्फे ‘ट्री-अ‍ॅप’ लाँच केला जाणार आहे.

ठळक मुद्देवृक्षसंवर्धनासाठी मनपाचा ‘ट्री-अ‍ॅप’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकासाच्या नावाखाली शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. याला वेळीच निर्बंध न घातल्यास नागपूर शहराची ‘ग्रीन सिटी’ म्हणून असलेली ओळख भविष्यात पुसली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. विकास तर हवाच पण पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षसंवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत वृक्ष तोडण्याची परवानगी देण्यापूर्वी संबंधित विकासकाने एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावून त्यांचे व्यवस्थित संगोपन करावयाचे आहे. नवीन झाडे मोठी होत असल्याची खात्री पटल्यानंतरच वृक्ष तोडण्याची परवानगी देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या प्रक्रि येची कठोर अंमलबजावणी व्हावी, यात पारदर्शकता यावी, यासाठी उद्यान विभागातर्फे ‘ट्री-अ‍ॅप’ लाँच केला जाणार आहे.अ‍ॅपच्या माध्यमातूनच झाडे तोडण्यासाठी अर्ज करावा लागेल. अर्जधारकाने नवीन झाडे लावल्यानंतर व तीन महिन्यांची झाल्यानंतर झाडे तोडण्याला परवानगी दिली जाईल. मात्र संबंधित विकासकाला झाडांचे संगोपन करणे बंधनकारक राहील. लावलेली झाडे जिवंत आहेत की नाहीत, याची शहानिशा अ‍ॅपच्या माध्यमातून केली जाईल. दर तीन महिन्यांनी लावलेल्या झाडांचा आढावा घेतला जाईल. परवानगी देण्यापूर्वी अर्जधारकाला कोड क्रमांक दिला जाईल. त्यानुसार पाठविलेल्या माहितीची पडताळणी केली जाणार आहे. झाडांचे व्यवस्थित संगोपन होत असल्याची खात्री पटल्यानंतरच परवानगी दिली जाणार असल्याची माहिती उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.संगोपन न केल्यास नोटीसपरवानगी घेताना विकासकाला लावलेल्या झाडांचे संगोपन करणे बंधनकारक राहील. संगोपन व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विकासकाला नोटीस बजावली जाईल. दर तीन महिन्यांनी लावलेल्या झाडांचे फोटो अ‍ॅपवर डाऊ नलोड करावे लागेल. पाठविलेल्या फोटोनुसार झाडांचे संगोपन होत आहे की नाही, याची उद्यान विभागातर्फे प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.झाडे न जगल्यास अनामत रक्कम जप्तझाडे तोडण्याची परवानगी घेताना प्रत्येक झाडासाठी ५,५०० रुपये अनामत रक्कम जमा करावयाची आहे. बांधकामासाठी झाडे तोडण्याशिवाय पर्याय नाही. याची खात्री पटण्यासाठी बांधकाम मंजुरीचा नकाशा सादर करावा लागणार आहे. त्यानंतर झाडे लावून ती तीन महिन्यांची झाल्यानंतर परवानगी दिली जाईल. त्यानंतर झाडांचे संगोपन न केल्यास अनामत रक्कम जप्त केली जाईल.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाenvironmentवातावरण