शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

‘सफरचंद’ महत्त्वाचे नाही, ते टाळकं ‘न्यूटन’चे होते हे महत्त्वाचे : सतीश फडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:14 IST

असे राजरोस अनेकांच्या डोक्यावर किंवा डोळ्यापुढे कित्येक सफरचंद पडले असतील. मात्र, ते का पडले? याचा विचार कोणी केला नाही. ते सफरचंद कुणाच्या डोक्यावर किंवा डोळ्यापुढे पडले, त्याचे डोके, बुद्धी महत्त्वाची आहे. ते टाळकं न्युटनचे होते म्हणून म्हणून काही तरी गडबड आहे.. असा प्रकाश त्याच्या डोक्यात आला आणि तो ती गडबड काय, याचा शोध घेण्यासाठी देहभान विसरला म्हणून गुरुत्त्वाकर्षण असा काही प्रकार असतो, हे जगताला कळले. आता तो शोध कुणी लावला? यापेक्षाही तो शोध महत्त्वाचा, हे जाणून घ्या... असे प्रतिपादन प्रख्यात व्याख्याते सतीश फडके यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देस्व. प्रकाश साठे स्मृती व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : असे राजरोस अनेकांच्या डोक्यावर किंवा डोळ्यापुढे कित्येक सफरचंद पडले असतील. मात्र, ते का पडले? याचा विचार कोणी केला नाही. ते सफरचंद कुणाच्या डोक्यावर किंवा डोळ्यापुढे पडले, त्याचे डोके, बुद्धी महत्त्वाची आहे. ते टाळकं न्युटनचे होते म्हणून म्हणून काही तरी गडबड आहे.. असा प्रकाश त्याच्या डोक्यात आला आणि तो ती गडबड काय, याचा शोध घेण्यासाठी देहभान विसरला म्हणून गुरुत्त्वाकर्षण असा काही प्रकार असतो, हे जगताला कळले. आता तो शोध कुणी लावला? यापेक्षाही तो शोध महत्त्वाचा, हे जाणून घ्या... असे प्रतिपादन प्रख्यात व्याख्याते सतीश फडके यांनी आज येथे केले.स्व. प्रकाश साठे स्मृतीप्रित्यर्थ डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात द्विदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात सोमवारी सतीश फडके ‘सोशल मिडियाच्या जगात ज्ञानेश्वर की आईन्स्टाईन’ या विषयावर बोलत होते.ज्ञानेश्वर आणि आईन्स्टाईन, या दोन भिन्न व्यक्ती एक संकल्पना आहेत आणि या दोन्ही संकल्पनांमध्ये अवघा देश विभागला गेला आहे. अध्यात्म आणि विज्ञान असे दोन विभाग त्यांचे असून, या दोघांनाही त्यांच्या साम्राज्याशी काही घेणे देणे नाही. मात्र, विज्ञान की अध्यात्म.. असे श्रेष्ठत्त्व ठरविण्यासाठी त्यांचे सैन्यच आपापसात भिडले आहेत. विज्ञान जे दिसेल त्यावर विश्वास ठेवतो. तर, अध्यात्म विश्वास ठेऊन बघण्यास सांगतो. आता गॅलिलिओ, न्यूटन, आईन्स्टाईन यांनी अध्यात्माचीच पायरी चढत संशोधन केले. त्यांना आढळलेल्या गोष्टींवर ‘असे होऊ शकते’ असा विश्वास ठेवला आणि मगच, संशोधनातून त्यांनी त्या गोष्टींची सिद्धता केली. गॅलिलिओ ने चंद्रग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते यातून पृथ्वी गोल असल्याचे सिद्ध केले. तर, राईट बंधूंनी पक्षी उडू शकतो तर आपण का नाही, असा विश्वास ठेवत उड्डाण केले. तसे पाहता, हा शोधांचा विषय नाही तर बुद्धीचा विषय आहे.कोणतीही सिद्धता करण्यासाठी झपाटलेपणा महत्त्वाचा असतो. तंत्रज्ञान नित्य विकसित होत असताना, आपली मानसिकताही तेवढ्याच पटीने विकसित नको का व्हायला? असा सवाल उपस्थित करत सतीश फडके यांनी अध्यात्म आणि विज्ञानाचा कानोसा घेत.. प्रगती आणि बौद्धीकर विकासाशी द्वारे कशी उघडता येतील.. याची उत्तरे दिली. प्रास्ताविक सुबोध साठे यांनी केले. संचालन आसावरी यांनी केले. तत्पूर्वी डॉ. अविनाश देशमुख यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी, अरुंधती साठे उपस्थित होत्या.

टॅग्स :scienceविज्ञानnagpurनागपूर