शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

एपीजे...अ मॅन आॅफ प्रिन्सिपल्स

By admin | Updated: July 28, 2015 03:35 IST

ज्ञान ही त्यांची साधना होती अन् विद्यार्थी त्यांच्या विचारांचे साधक. मिळालेले काही ठेवू नये, सतत देतच राहावे हा जीवनाचा

योगेश पांडे ल्ल नागपूरज्ञान ही त्यांची साधना होती अन् विद्यार्थी त्यांच्या विचारांचे साधक. मिळालेले काही ठेवू नये, सतत देतच राहावे हा जीवनाचा मंत्र असल्याने मुक्तहस्ते ज्ञान वाटायचे. ना कसला गर्व, ना कुठला मोठेपणा. शाळकरी विद्यार्थी असो, संशोधन करणारे प्राध्यापक किंवा अगदी साठी ओलांडलेले ज्येष्ठ नागरिक. प्रत्येकासाठी त्यांच्याजवळ मौलिक विचार होते. उपराजधानीत ते अनेकदा आले, मार्गदर्शन केले अन् प्रत्येक वेळी एकच दृश्य दिसले. ‘ते आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले’!माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून आत्मविश्वासाचे अन् स्वप्नांचे ‘विंग्ज’ दिले अन् त्यांच्यात काही तरी वेगळे करून दाखविण्याची ‘फायर’ जागविली. विशेष म्हणजे आयुष्यात यश मिळविण्यासोबतच आपल्या तत्त्वांवर चालणेदेखील तितकेच आवश्यक असते हे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले होते. ‘एपीजे’ अचानक सर्वांमधून निघून गेले असले तरी विचाररूपाने ते उपराजधानीतील लक्षावधी हृदयांमध्ये अमर झाले.मी कशासाठी आठवणीत राहील?डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी कलाम यांनी ओजस्वी वक्तृत्वाने उपस्थितांवर ज्ञानवर्षाव केला होता. कलाम यांचा विद्यार्थ्यांना सवाल होता, ‘मी कशासाठी आठवणीत राहील?’ यातील ‘मी’ हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी होता. काम प्रत्येक जणच करतो, प्रामाणिकपणे प्रयत्नदेखील अनेकजण करतात. परंतु एखादे काम करताना पूर्णपणे झोकून दिले तरच त्यातून चिरकाळ सोबत राहणारे समाधान मिळते, असे ते म्हणाले होते.डॉ.कलामांनी मराठीत दिलेल्या शुभेच्छाराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऐतिहासिक शंभराव्या दीक्षांत समारंभाला डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणाला सुरुवात करण्याच्या वेळी डॉ. कलाम यांनी उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला होता. ‘नागपूर विद्यापीठातील सर्वच विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो,' असे चक्क मराठीत म्हणून त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या होत्या. मराठी भाषा मला आवडते व मी ती बोलण्याचा प्रयत्न करतो, असेदेखील त्यांनी सांगितले होते. ‘मंगळयान’ यशाचे ‘सेलिब्रेशन’२६ सप्टेंबर २०१४ रोजी ‘व्हीएनआयटी’चा तांत्रिक महोत्सव ‘अ‍ॅक्सिस’ला डॉ.कलाम यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत ‘मंगळयान’ मोहिमेच्या यशाचे ‘सेलिब्रेशन’ केले होते. विद्यार्थ्यांसोबत त्यांनी या विषयावर संवाद साधला होता व मार्गदर्शन केले होते. २४ सप्टेंबर रोजी ‘मंगळयान’ प्रत्यक्ष मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचले व या क्षणाचा मी साक्षीदार आहे याचा मला अभिमान वाटतो.यशाजे यश जगातील काही मोजक्या देशांनी मिळविले आहे, त्या पंक्तीत आता भारतदेखील समाविष्ट झाला आहे. ‘मंगळयान’ मोहिमेच्या सफलतेमुळे भारत ‘नंबर १’ झाला आहे. हे स्थान टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यांचीच आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करा, हार मानू नका असे ते म्हणाले होते.