शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

Coronavirus in Nagpur; लसीकरणानंतरही ॲन्टिबाॅडी टेस्ट आवश्यक आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 08:36 IST

Coronavirus in Nagpur antibody test ॲन्टिबाॅडी टेस्टचे आयजीएम व आयजीजी असे दाेन प्रकार आहेत. या सर्व बाबींवर लाेकमतने तज्ज्ञ डाॅक्टरांशी चर्चा करून ॲन्टिबाॅडी टेस्टबाबत सविस्तर माहिती घेतली.

ठळक मुद्देरक्तातील स्पाइक एस प्राेटीन आरबीडीने समजते ॲन्टिबाॅडीची शक्ती

मेहा शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : काेराेना विषाणूचे संक्रमण वेगाने पसरण्याचे प्रमुख कारण म्हणजे लक्षण नसलेले रुग्ण हाेत. हे खरे सुपरस्प्रेडर आहेत. अनेकदा पाॅझिटिव्ह असल्याचे त्यांना समजतच नाही आणि ते संसर्ग वाढवत असतात. अनेकदा त्यांची आरटी-पीसीआर टेस्टही निगेटिव्ह असते. अशावेळी एकमेव पर्याय म्हणजे ॲन्टिबाॅडी टेस्ट करणे हाच आहे. ॲन्टिबाॅडी टेस्टचे आयजीएम व आयजीजी असे दाेन प्रकार आहेत. या सर्व बाबींवर लाेकमतने तज्ज्ञ डाॅक्टरांशी चर्चा करून ॲन्टिबाॅडी टेस्टबाबत सविस्तर माहिती घेतली.

काॅर्डियाेलाॅजिस्ट डाॅ. एच.एम. मार्डीकर यांच्या मते हर्ड इम्युनिटीबाबत विचार करताना आयजीजी प्रकारची ॲन्टिबाॅडी टेस्ट करण्यात येते. ॲन्टिबाॅडी टेस्टमध्ये न्युक्लिओकॅप्सिड आणि आरबीडी ॲन्टिबाॅडीची तपासणी केली जाते. मात्र काेणती टेस्ट करण्यास सांगणे, ही बाब डाॅक्टरांवर अवलंबून आहे. कुणी कम्बाइन आरबीडी व न्युक्लिओकॅप्सिड तर कुणी केवळ आरबीडी टेस्ट करण्याचा सल्ला देतात. दाेन्ही चाचण्या विषाणूपासून सुरक्षा देण्यास उपयाेगी आहेत.

ॲन्टिबाॅडी टेस्ट आणि लसीकरणानंतर करण्यात येणाऱ्या टेस्टबाबत काॅर्डियाेलाॅजिस्ट डाॅ. जसपाल अर्नेजा यांनी सांगितले. ॲन्टिबाॅडी म्हणजे ब्लड प्राेटीन असतात जे आपल्याला सुरक्षा प्रदान करतात. विषाणूचे संक्रमण झाल्यानंतर माणसाची राेग प्रतिकारशक्ती ॲन्टिबाॅडीची निर्मिती करते. आपल्या शरीरात जेवढ्या अधिक प्रमाणात ॲन्टिबाॅडी असतील तेवढे आपण वारंवार हाेणाऱ्या संक्रमणापासून वाचू शकताे. लसीमुळे आपल्या शरीरात ॲन्टिबाॅडी तयार हाेतात, ज्यामुळे संक्रमण राेखले जाऊ शकते. आयजीजी ॲन्टिबाॅडी काेराेना संक्रमण झाल्यानंतर किंवा लसीकरणाच्या दाेन आठवड्यानंतर शरीरात दिसून येते, जी अनेक महिने कायम राहते. साधारणपणे आयजीजी आणि आयजीएमची नियमित ॲन्टिबाॅडी टेस्ट करवली जाते. मात्र लसीकरणानंतर ॲन्टिबाॅडी टेस्ट करणे आवश्यक नसल्याचे मत डाॅ. अर्नेजा यांनी व्यक्त केले.

कन्सल्टंट इंटेन्सिविस्ट डाॅ. उत्कर्ष शाह यांनी सांगितले, टाेटल आणि क्वांटिटेटिव्ह हे दाेन प्रकारचे काेविड बाॅडी एकूणच ॲन्टिबाॅडीची गणना करतात. यामुळे शरीरात ॲन्टिबाॅडी आहेत की नाही, याची माहिती मिळते. उल्लेखनीय म्हणजे निगेटिव्ह टेस्ट आल्यानंतरही काेराेनाचे संक्रमण झाले नसल्याचे ठामपणे सांगता येत नाही. क्वांटिटेटिव्ह ॲन्टिबाॅडी प्रकारात टिटरे स्पाइक एस प्राेटीन आरबीडीच्या आधारावर ॲन्टिबाॅडीची गणना केली जाते. याचा स्तर लसीकरणानंतर किंवा काेराेना संक्रमणानंतर वाढते. यामध्ये आयजीएम व आयजीजी या दाेन्हींचा समावेश आहे. यामध्ये रक्तातील ॲन्टिबाॅडीची अचूक माहिती मिळते. मात्र काेराेना संक्रमणादरम्यान घेतलेल्या रक्त नमुन्यांच्या तपासणीचा रिपाेर्ट निगेटिव्ह येण्याची शक्यता असते. त्यामुळे ही टेस्ट ॲक्यूट इन्फेक्शनच्या प्रकरणात करणे याेग्य नाही. उल्लेखनीय म्हणजे ॲक्यूट इन्फेक्शनची माहिती करण्यास दाेन्ही टेस्ट उपयाेगी नाही. ॲन्टिबाॅडी टिटरेचा काेणता स्तर सुरक्षित आहे, याबाबतचा डेटा अद्याप समाेर आलेला नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस