शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या उत्तरपत्रिकांचे अद्याप मूल्यांकन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 13:43 IST

कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा फटका राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालालाही बसणार आहे. अद्याप उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांना निकालासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आशिष दुबेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा फटका राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालालाही बसणार आहे. अद्याप उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांना निकालासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.अद्यापही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका कस्टडी, पोलीस कस्टडी आणि मूल्यांकनकर्त्यांकडेच पडून आहेत. या सर्व उत्तरपत्रिकांचे अद्याप मूल्यांकनही झालेले नाही किंवा पुढील प्रक्रियाही झालेली नाही. मात्र उत्तरपत्रिकांचे मूल्यांंकन सुरू असल्याचा दावा बोर्डाने केला आहे. शिक्षकांना उत्तरपत्रिका घरी नेऊन तपासण्याची परवानगी दिली आहे.प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की, गेल्या दीड महिन्यात बोर्डाच्या विभागीय कार्यालयाने उत्तरपत्रिकांची काहीच दखल घेतली नव्हती. २० एप्रिलला विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी सर्व कस्टोडियनला एक पत्र पाठविले. त्यात, इतिहास व नागरिक शास्त्र विषयासह अन्य विषयांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका नियमितपणे पोस्ट आॅफिसला पाठवाव्यात. जेणेकरून त्या मूल्यांकनासाठी संबंधित शाळेपर्यंत पोहचविता येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन लागू होण्यापूर्वीच दहावीच्या बहुतेक विषयांचे पेपर झाले होते. त्यांच्या उत्तरपत्रिका संबंधित शाळांकडे मूल्यांकनासाठी पाठविल्या होत्या. त्या अद्यापही मूल्यांकनकर्त्यांकडेच पडून आहेत. दुसऱ्या मूल्यांकनकर्त्यांकडे त्या पाठविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे निकालाची अनिश्चितता कायम आहे.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार काही विषयांच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वारित उत्तरपत्रिका तशाच कस्टडीत किंवा पोलीस कस्टडीत पडून आहेत. बोर्डाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी हा मुद्दा गंभीरपणे का घेतला नाही, हा खरा प्रश्न आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान उत्तरपत्रिका सहजपणे पोस्ट आॅफिसपर्यंत पोहचविता आल्या असत्या. मूल्यांकनकर्त्यांना त्या घरी नेण्याची परवानगीही देता आली असती. दहावीचे बहुतेक सर्वच पेपर झाले आहेत. लॉकडाऊनमुळे भूगोल विषयाचा पेपर होऊ शकला नाही. त्यानंतर तो रद्द करण्यात आला. विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही मूल्यांकनात ढिलेपणा करण्यामागचे कारण अनाकलनीय आहे. बोर्डाचे विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांच्याशी या संदर्भात संपर्क केला, मात्र होऊ शकला नाही.जूनमध्ये निकाल अशक्यचराज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचे निकाल साधारणत: जून महिन्यात जाहीर होतात. मात्र यंदा उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन न झाल्याने निकाल कधी लागतील, याबद्दल शंका आहे. सूत्रांच्या मते, एकट्या नागपूर विभागात दहावीची परीक्षा देणाºयांची संख्या १ लाख ८० हजारावर आहे. एवढ्या मोठ्या संख्येतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणे आणि प्रक्रिया पूर्ण करून निकाल जूनमध्ये जाहीर करणे अशक्य आहे. सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण होत नाही तोवर निकाल कधी लागतील, हे सांगणे कठीण आहे. 

 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल