शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला आणखी एक धक्का; आदिवासी नेते नामदेव उसेंडी यांचा भाजपमध्ये प्रवेश

By योगेश पांडे | Updated: March 26, 2024 21:15 IST

मंगळवारी नागपूर पत्रकार क्लबमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मानव विकास निर्देशांकात मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा विकास करणे हे आपले ध्येय आहे.

नागपूर : उमरेडचे आमदार राजू पारवे यांच्यानंतर कॉंग्रेसला विदर्भात आणखी एक धक्का बसला आहे. माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मंगळवारी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत आदिवासी काँग्रेसच्या २२ जिल्ह्यांतील अध्यक्षांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला असल्याचा त्यांनी दावा केला.

मंगळवारी नागपूर पत्रकार क्लबमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मानव विकास निर्देशांकात मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा विकास करणे हे आपले ध्येय आहे. कॉंग्रेसच्या माध्यमातून आदिवासींना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. गडचिरोलीतील स्थानिक उमेदवार म्हणून कॉंग्रेसकडे तिकीट मागितले होते. मात्र स्थानिक व राज्य पातळीवरील कॉंग्रेस नेतृत्वाने षडयंत्र करून बाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिली. कॉंग्रेसमध्ये आदिवासी समाजाचे ऐकले जात नाही. त्यामुळे मी पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे. भाजप सत्तेत असून जिल्हाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असे डॉ.उसेंडी यांनी सांगितले. कुठलीही उमेदवारी किंवा पदाची आकांक्षा घेऊन भाजपमध्ये आलेलो नाही असा दावादेखील डॉ.उसेंडी यांनी केला.

काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये येत आहेत आणि येत राहतील. उसेंडी यांना भाजपमध्ये पूर्ण सन्मान मिळेल काँग्रेस नेते राहुल गांधी नेहमीच ओबीसी व आदिवासी समाजाचा अपमान करतात. ते कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.आम्ही संन्यासी नाही, सर्वांचेच स्वागत करूअन्य पक्षांच्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाबाबत बावनकुळे यांना विचारणा केली असता आम्ही संन्यासी नाही असे त्यांनी वक्तव्य केले. उसेंडी हे एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत. पक्षात कोणी आले तर त्यांचे आम्ही स्वागतच करू. आम्ही संन्यासी नाही, देशाच्या विकासासाठी राजकारण करत आहोत असे ते म्हणाले. भाजपचे कार्यकर्ते बाहेरच्या नेत्यांच्या येण्याने नाराज असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, भाजपमध्ये कोणताही कार्यकर्ता नाराज नाही. पक्षात सर्वांना सन्मान व सोबत घेऊन चालण्याची भावना आहे असे ते म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे कॉंग्रेस नेते पक्ष सोडत आहेत. पटोले यांनी अशोक चव्हाण, राजू पारवे, डॉ. उसेंडी यांचा आदर केला असता तर त्यांनी काँग्रेस सोडली नसती, असा चिमटा त्यांनी काढला.

 

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूरBJPभाजपा