शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

काँग्रेसला आणखी एक धक्का; आदिवासी नेते नामदेव उसेंडी यांचा भाजपमध्ये प्रवेश

By योगेश पांडे | Updated: March 26, 2024 21:15 IST

मंगळवारी नागपूर पत्रकार क्लबमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मानव विकास निर्देशांकात मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा विकास करणे हे आपले ध्येय आहे.

नागपूर : उमरेडचे आमदार राजू पारवे यांच्यानंतर कॉंग्रेसला विदर्भात आणखी एक धक्का बसला आहे. माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मंगळवारी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत आदिवासी काँग्रेसच्या २२ जिल्ह्यांतील अध्यक्षांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला असल्याचा त्यांनी दावा केला.

मंगळवारी नागपूर पत्रकार क्लबमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मानव विकास निर्देशांकात मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा विकास करणे हे आपले ध्येय आहे. कॉंग्रेसच्या माध्यमातून आदिवासींना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. गडचिरोलीतील स्थानिक उमेदवार म्हणून कॉंग्रेसकडे तिकीट मागितले होते. मात्र स्थानिक व राज्य पातळीवरील कॉंग्रेस नेतृत्वाने षडयंत्र करून बाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिली. कॉंग्रेसमध्ये आदिवासी समाजाचे ऐकले जात नाही. त्यामुळे मी पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे. भाजप सत्तेत असून जिल्हाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असे डॉ.उसेंडी यांनी सांगितले. कुठलीही उमेदवारी किंवा पदाची आकांक्षा घेऊन भाजपमध्ये आलेलो नाही असा दावादेखील डॉ.उसेंडी यांनी केला.

काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये येत आहेत आणि येत राहतील. उसेंडी यांना भाजपमध्ये पूर्ण सन्मान मिळेल काँग्रेस नेते राहुल गांधी नेहमीच ओबीसी व आदिवासी समाजाचा अपमान करतात. ते कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.आम्ही संन्यासी नाही, सर्वांचेच स्वागत करूअन्य पक्षांच्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाबाबत बावनकुळे यांना विचारणा केली असता आम्ही संन्यासी नाही असे त्यांनी वक्तव्य केले. उसेंडी हे एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत. पक्षात कोणी आले तर त्यांचे आम्ही स्वागतच करू. आम्ही संन्यासी नाही, देशाच्या विकासासाठी राजकारण करत आहोत असे ते म्हणाले. भाजपचे कार्यकर्ते बाहेरच्या नेत्यांच्या येण्याने नाराज असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, भाजपमध्ये कोणताही कार्यकर्ता नाराज नाही. पक्षात सर्वांना सन्मान व सोबत घेऊन चालण्याची भावना आहे असे ते म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे कॉंग्रेस नेते पक्ष सोडत आहेत. पटोले यांनी अशोक चव्हाण, राजू पारवे, डॉ. उसेंडी यांचा आदर केला असता तर त्यांनी काँग्रेस सोडली नसती, असा चिमटा त्यांनी काढला.

 

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूरBJPभाजपा