शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

कन्हारगाव अभयारण्याच्या घोषणेमुळे व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षेच्या आशा बळावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:07 IST

नागपूर : अलीकडेच घोषित झालेल्या कन्हारगाव अभयारण्याच्या घोषणेमुळे व्याघ्र भ्रमणमार्गाच्या सुरक्षेसंदर्भातील आशा बळावल्या आहेत. यासोबतच राज्यात नव्याने १० राखीव ...

नागपूर : अलीकडेच घोषित झालेल्या कन्हारगाव अभयारण्याच्या घोषणेमुळे व्याघ्र भ्रमणमार्गाच्या सुरक्षेसंदर्भातील आशा बळावल्या आहेत. यासोबतच राज्यात नव्याने १० राखीव संवर्धन वनक्षेत्र जाहीर झाले आहेत. यामुळे राज्यातील आणि राज्य सीमामधून जाणारे टिपेश्वर अभयारण्य, तेलंगणातील कावल अभयारण्य, छत्तीसगड राज्यातील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प हे भ्रमणमार्ग सुरक्षित होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वाघांचे भ्रमणमार्ग हा विषय आधीपासूनच वन्यजीवप्रेमींमध्ये चर्चेचा आहे. मराठवाडा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील पैनगंगा अभयारण्य, यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य या सर्व वनांना जोडणारे व्याघ्र भ्रमणमार्ग संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. वाघ हजारो किलोमीटरचा प्रवास करतात, हे यापूर्वीच्या अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे. कन्हारगाव अभयारण्य हे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या दक्षिणेकडे असून महाराष्ट्र, तेलंगणा व छत्तीसगड राज्याच्या सीमांमधील जंगलांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल ठरणार आहे. कन्हारगाव अभयारण्याच्या पश्चिमेकडे यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य असा भ्रमणमार्ग आहे, तर तेलंगणा राज्यातील कावल अभयारण्य असा भ्रमणमार्गसुद्धा आहे. कन्हारगावच्या दक्षिणेकडील छत्तीसगड राज्यातील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प असासुद्धा महत्त्वपूर्ण भ्रमणमार्ग आहे. या नव्या अभयारण्यामुळे यवतमाळ, कारंजा, अकोला-बुलडाणा जिल्ह्यातील जंगलामार्गे अजिंठा ते गौताळा अभयारण्यापर्यंत वाघांचा प्रवास होऊ शकेल. तसेच ज्ञानगंगा अभयारण्यातील वाघ आदिलाबादकडून माहूर, पुसद मार्गे हिंगोली जिल्ह्यातून पुढे जाऊ शकतील व पैनगंगा अभयारण्य मराठवाड्याला लागून असल्याने वाघांचा संचार विनाअडथळ्याने होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

डिसेंबर महिन्यात झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्यास मान्यता मिळाली होती. याच बैठकीत कोल्हापूर ते कर्नाटकपर्यंतचा वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी पश्चिम घाटात आठ तर विदर्भात दोन अशी १० राखीव संवर्धन वनक्षेत्राची घोषणाही शासनाने याच बैठकीत केली होती.

...

राज्यात विदर्भात सर्वाधिक वाघ

राज्यात असलेल्या ३१२ वाघांपैकी जवळपास ३०० वाघ एकट्या विदर्भात आहेत. वाघांची संख्या वाढल्याने त्यांचे भ्रमणमार्ग विस्तारण्याची गरज आहे. यापूर्वी अस्तित्वात असलेल्या मार्गावरील अडथळे दूर करण्यासोबतच नव्या मार्गांसाठी वाव मिळवून देणेही वनविभागापुढील महत्त्वाची जबाबदारी आहे. नवे अभयारण्य आणि घोषित झालेल्या राखीव संवर्धन वनक्षेत्रामुळे ही अडचण दूर होण्याची शक्यता आहे.

...कोट

वाघांचे सुरक्षित स्थलांतर होणे आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास जपणे, हा यामागील हेतू आहे. मागील १०-१२ वर्षांपासून सातत्याने याकडे लक्ष वेधले जात होते. मुख्यमंत्र्यांंनी पुढाकार घेऊन यात लक्ष घातल्याने हे शक्य होणार आहे. या निर्णयामुळे वाघांच्या भ्रमणमार्गाचे संरक्षण होईल.

- यादवराव तरटे पाटील, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ

...