शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

कन्हारगाव अभयारण्याच्या घोषणेमुळे व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षेच्या आशा बळावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:07 IST

नागपूर : अलीकडेच घोषित झालेल्या कन्हारगाव अभयारण्याच्या घोषणेमुळे व्याघ्र भ्रमणमार्गाच्या सुरक्षेसंदर्भातील आशा बळावल्या आहेत. यासोबतच राज्यात नव्याने १० राखीव ...

नागपूर : अलीकडेच घोषित झालेल्या कन्हारगाव अभयारण्याच्या घोषणेमुळे व्याघ्र भ्रमणमार्गाच्या सुरक्षेसंदर्भातील आशा बळावल्या आहेत. यासोबतच राज्यात नव्याने १० राखीव संवर्धन वनक्षेत्र जाहीर झाले आहेत. यामुळे राज्यातील आणि राज्य सीमामधून जाणारे टिपेश्वर अभयारण्य, तेलंगणातील कावल अभयारण्य, छत्तीसगड राज्यातील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प हे भ्रमणमार्ग सुरक्षित होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वाघांचे भ्रमणमार्ग हा विषय आधीपासूनच वन्यजीवप्रेमींमध्ये चर्चेचा आहे. मराठवाडा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील पैनगंगा अभयारण्य, यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य या सर्व वनांना जोडणारे व्याघ्र भ्रमणमार्ग संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. वाघ हजारो किलोमीटरचा प्रवास करतात, हे यापूर्वीच्या अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे. कन्हारगाव अभयारण्य हे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या दक्षिणेकडे असून महाराष्ट्र, तेलंगणा व छत्तीसगड राज्याच्या सीमांमधील जंगलांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल ठरणार आहे. कन्हारगाव अभयारण्याच्या पश्चिमेकडे यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य असा भ्रमणमार्ग आहे, तर तेलंगणा राज्यातील कावल अभयारण्य असा भ्रमणमार्गसुद्धा आहे. कन्हारगावच्या दक्षिणेकडील छत्तीसगड राज्यातील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प असासुद्धा महत्त्वपूर्ण भ्रमणमार्ग आहे. या नव्या अभयारण्यामुळे यवतमाळ, कारंजा, अकोला-बुलडाणा जिल्ह्यातील जंगलामार्गे अजिंठा ते गौताळा अभयारण्यापर्यंत वाघांचा प्रवास होऊ शकेल. तसेच ज्ञानगंगा अभयारण्यातील वाघ आदिलाबादकडून माहूर, पुसद मार्गे हिंगोली जिल्ह्यातून पुढे जाऊ शकतील व पैनगंगा अभयारण्य मराठवाड्याला लागून असल्याने वाघांचा संचार विनाअडथळ्याने होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

डिसेंबर महिन्यात झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्यास मान्यता मिळाली होती. याच बैठकीत कोल्हापूर ते कर्नाटकपर्यंतचा वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी पश्चिम घाटात आठ तर विदर्भात दोन अशी १० राखीव संवर्धन वनक्षेत्राची घोषणाही शासनाने याच बैठकीत केली होती.

...

राज्यात विदर्भात सर्वाधिक वाघ

राज्यात असलेल्या ३१२ वाघांपैकी जवळपास ३०० वाघ एकट्या विदर्भात आहेत. वाघांची संख्या वाढल्याने त्यांचे भ्रमणमार्ग विस्तारण्याची गरज आहे. यापूर्वी अस्तित्वात असलेल्या मार्गावरील अडथळे दूर करण्यासोबतच नव्या मार्गांसाठी वाव मिळवून देणेही वनविभागापुढील महत्त्वाची जबाबदारी आहे. नवे अभयारण्य आणि घोषित झालेल्या राखीव संवर्धन वनक्षेत्रामुळे ही अडचण दूर होण्याची शक्यता आहे.

...कोट

वाघांचे सुरक्षित स्थलांतर होणे आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास जपणे, हा यामागील हेतू आहे. मागील १०-१२ वर्षांपासून सातत्याने याकडे लक्ष वेधले जात होते. मुख्यमंत्र्यांंनी पुढाकार घेऊन यात लक्ष घातल्याने हे शक्य होणार आहे. या निर्णयामुळे वाघांच्या भ्रमणमार्गाचे संरक्षण होईल.

- यादवराव तरटे पाटील, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ

...