शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त मृत/जखमींना नुकसानभरपाई जाहीर करा; शिवसेना आमदार आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:02 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे उदघाटन झाल्यानंतरही प्रत्यक्षात काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. राज्य सरकारने अपघातग्रस्त मृत व जखमींना तात्काळ नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शिवसेना आमदारांनी आज सभागृहात लावून धरली.

ठळक मुद्देआठ दिवसात बैठकीचे सरकारचे आश्वासन

आॅनलाईन लोकमतनागपूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे उदघाटन झाल्यानंतरही प्रत्यक्षात काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. राज्य सरकारने या अपघातांची जबाबदारी घेऊन अपघातग्रस्त मृत व जखमींना तात्काळ नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शिवसेना आमदारांनी आज सभागृहात लावून धरली.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याबाबत शिवसेना आमदार मनोहर भोईर यांनी लक्षवेधी उपस्थित केली. चंद्र्रकांत पाटील यांच्याकडून हा महामार्ग जून २०१८ पर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात येत असले तरी या डेडलाईनवर विश्वास नाही. यामध्ये झालेल्या अपघातांत ६५१ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांना सरकार नुकसान भरपाई देणार का, असा सवाल भोईर यांनी केला.सार्वजनिक बांधकाम खात्याने १६-१७ सालची दिलेली मुदत संपली आता २०१८ ची डेडलाईन दिली जात आहे. या डेडलाईनमध्ये कामे होतील का? इंदापूर-पळस्पेपर्यंत कितीतरी अपूर्ण कामं आहेत. अजूनही वडखळ ते इंदापूर काम झालेले नाही. अशा सुप्रीम कंत्राटदारालाच ५४० कोटींची मदत दिली जाते, त्याने काय काम केले ते सांगा? या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका? जे काम पाच वर्षांत करू शकले नाहीत ते काम कसे पूर्ण होणार, असा सवाल भरत गोगावले यांनी केला.पनवेलपासून इंदापूरपर्यंत ८४ किमीचा रस्ता आहे. येथील कंत्राटदार जर नादार झाला असेल तर त्याच्याकडून कंत्राट काढून घ्यायला हवे. यासाठी सरकारने हायकोर्टात जाऊन खटला भरायला हवा. पण कंत्राटदाराला पाठीशी घातले जातेय. आणखी किती जीवांशी खेळणार, असा सवाल शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केला. कोकणात आमची गावे असल्याने आम्ही आमदार तिथे जातो तेव्हा तिथले लोक आम्हाला प्रश्न करतात. रस्त्यांवर पडलेले खड्डे पाहिल्यानंतर आम्हाला कोकणात जायला लाज वाटते, अशी खंत करतानाच गगनबावडा ते वैभववाडी या रस्त्याची परिस्थिती मृत्यूच्या खाईतून चाललोय अशी झाली असल्याकडे सुनील प्रभू यांनी लक्ष वेधले. कोकणात जाण्यासाठी पर्याय असलेले एक्स्प्रेस वे तसेच अन्य रस्ते तरी चांगले करा, अशी मागणी त्यांनी केली.

 

 

टॅग्स :highwayमहामार्गAccidentअपघात