शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त मृत/जखमींना नुकसानभरपाई जाहीर करा; शिवसेना आमदार आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:02 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे उदघाटन झाल्यानंतरही प्रत्यक्षात काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. राज्य सरकारने अपघातग्रस्त मृत व जखमींना तात्काळ नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शिवसेना आमदारांनी आज सभागृहात लावून धरली.

ठळक मुद्देआठ दिवसात बैठकीचे सरकारचे आश्वासन

आॅनलाईन लोकमतनागपूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे उदघाटन झाल्यानंतरही प्रत्यक्षात काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. राज्य सरकारने या अपघातांची जबाबदारी घेऊन अपघातग्रस्त मृत व जखमींना तात्काळ नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शिवसेना आमदारांनी आज सभागृहात लावून धरली.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याबाबत शिवसेना आमदार मनोहर भोईर यांनी लक्षवेधी उपस्थित केली. चंद्र्रकांत पाटील यांच्याकडून हा महामार्ग जून २०१८ पर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात येत असले तरी या डेडलाईनवर विश्वास नाही. यामध्ये झालेल्या अपघातांत ६५१ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांना सरकार नुकसान भरपाई देणार का, असा सवाल भोईर यांनी केला.सार्वजनिक बांधकाम खात्याने १६-१७ सालची दिलेली मुदत संपली आता २०१८ ची डेडलाईन दिली जात आहे. या डेडलाईनमध्ये कामे होतील का? इंदापूर-पळस्पेपर्यंत कितीतरी अपूर्ण कामं आहेत. अजूनही वडखळ ते इंदापूर काम झालेले नाही. अशा सुप्रीम कंत्राटदारालाच ५४० कोटींची मदत दिली जाते, त्याने काय काम केले ते सांगा? या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका? जे काम पाच वर्षांत करू शकले नाहीत ते काम कसे पूर्ण होणार, असा सवाल भरत गोगावले यांनी केला.पनवेलपासून इंदापूरपर्यंत ८४ किमीचा रस्ता आहे. येथील कंत्राटदार जर नादार झाला असेल तर त्याच्याकडून कंत्राट काढून घ्यायला हवे. यासाठी सरकारने हायकोर्टात जाऊन खटला भरायला हवा. पण कंत्राटदाराला पाठीशी घातले जातेय. आणखी किती जीवांशी खेळणार, असा सवाल शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केला. कोकणात आमची गावे असल्याने आम्ही आमदार तिथे जातो तेव्हा तिथले लोक आम्हाला प्रश्न करतात. रस्त्यांवर पडलेले खड्डे पाहिल्यानंतर आम्हाला कोकणात जायला लाज वाटते, अशी खंत करतानाच गगनबावडा ते वैभववाडी या रस्त्याची परिस्थिती मृत्यूच्या खाईतून चाललोय अशी झाली असल्याकडे सुनील प्रभू यांनी लक्ष वेधले. कोकणात जाण्यासाठी पर्याय असलेले एक्स्प्रेस वे तसेच अन्य रस्ते तरी चांगले करा, अशी मागणी त्यांनी केली.

 

 

टॅग्स :highwayमहामार्गAccidentअपघात