शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त मृत/जखमींना नुकसानभरपाई जाहीर करा; शिवसेना आमदार आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:02 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे उदघाटन झाल्यानंतरही प्रत्यक्षात काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. राज्य सरकारने अपघातग्रस्त मृत व जखमींना तात्काळ नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शिवसेना आमदारांनी आज सभागृहात लावून धरली.

ठळक मुद्देआठ दिवसात बैठकीचे सरकारचे आश्वासन

आॅनलाईन लोकमतनागपूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे उदघाटन झाल्यानंतरही प्रत्यक्षात काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. राज्य सरकारने या अपघातांची जबाबदारी घेऊन अपघातग्रस्त मृत व जखमींना तात्काळ नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शिवसेना आमदारांनी आज सभागृहात लावून धरली.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याबाबत शिवसेना आमदार मनोहर भोईर यांनी लक्षवेधी उपस्थित केली. चंद्र्रकांत पाटील यांच्याकडून हा महामार्ग जून २०१८ पर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात येत असले तरी या डेडलाईनवर विश्वास नाही. यामध्ये झालेल्या अपघातांत ६५१ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांना सरकार नुकसान भरपाई देणार का, असा सवाल भोईर यांनी केला.सार्वजनिक बांधकाम खात्याने १६-१७ सालची दिलेली मुदत संपली आता २०१८ ची डेडलाईन दिली जात आहे. या डेडलाईनमध्ये कामे होतील का? इंदापूर-पळस्पेपर्यंत कितीतरी अपूर्ण कामं आहेत. अजूनही वडखळ ते इंदापूर काम झालेले नाही. अशा सुप्रीम कंत्राटदारालाच ५४० कोटींची मदत दिली जाते, त्याने काय काम केले ते सांगा? या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका? जे काम पाच वर्षांत करू शकले नाहीत ते काम कसे पूर्ण होणार, असा सवाल भरत गोगावले यांनी केला.पनवेलपासून इंदापूरपर्यंत ८४ किमीचा रस्ता आहे. येथील कंत्राटदार जर नादार झाला असेल तर त्याच्याकडून कंत्राट काढून घ्यायला हवे. यासाठी सरकारने हायकोर्टात जाऊन खटला भरायला हवा. पण कंत्राटदाराला पाठीशी घातले जातेय. आणखी किती जीवांशी खेळणार, असा सवाल शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केला. कोकणात आमची गावे असल्याने आम्ही आमदार तिथे जातो तेव्हा तिथले लोक आम्हाला प्रश्न करतात. रस्त्यांवर पडलेले खड्डे पाहिल्यानंतर आम्हाला कोकणात जायला लाज वाटते, अशी खंत करतानाच गगनबावडा ते वैभववाडी या रस्त्याची परिस्थिती मृत्यूच्या खाईतून चाललोय अशी झाली असल्याकडे सुनील प्रभू यांनी लक्ष वेधले. कोकणात जाण्यासाठी पर्याय असलेले एक्स्प्रेस वे तसेच अन्य रस्ते तरी चांगले करा, अशी मागणी त्यांनी केली.

 

 

टॅग्स :highwayमहामार्गAccidentअपघात