शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

Nagpur: पर्यटन क्षेत्रासाठी नवीन पर्यटन धोरण जाहीर करा,‘एआयडी’ची पर्यटन मंत्र्यांकडे मागणी

By मोरेश्वर मानापुरे | Updated: July 4, 2024 20:08 IST

Nagpur News: असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटने (एआयडी) महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना एक औपचारिक स्मरणपत्र जारी करून महाराष्ट्राचे नवीन पर्यटन धोरण त्वरित जारी करण्याची विनंती केली आहे. नव्या धोरणाने विदर्भात पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढणार आहे.

- मोरेश्वर मानापुरे नागपूर - असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटने (एआयडी) महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना एक औपचारिक स्मरणपत्र जारी करून महाराष्ट्राचे नवीन पर्यटन धोरण त्वरित जारी करण्याची विनंती केली आहे. नव्या धोरणाने विदर्भात पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढणार आहे.

गिरीश महाजन यांनी जानेवारी-२०२४ मध्ये नागपुरात आयोजित ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ या खासदार औद्योगिक महोत्सवात पर्यटन धोरण एक महिन्यात जाहीर करण्याची घोषणा केली होती. या घोषणेला सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. एआयडीने मंत्र्यांना एक स्मरणपत्र पाठविल्याची माहिती एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे यांनी दिली.  घोषणेच्या विलंबामुळे विविध उद्योगांमध्ये चिंता निर्माण झाली असून, विदर्भात पर्यटनाचा विकास करण्यासाठी सर्वसमावेशक योजनेची तातडीची गरज आहे. 

कार्यक्रमादरम्यान, विदर्भातील पर्यटन सुविधा वाढविण्याच्या गरजेवर भर देत अनेक प्रमुख मुद्यांवर चर्चा करण्यात आली होती. यामध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्स आणि पर्यटन स्थळांचा विकास करण्याचा समावेश होता. हॉटेलांना उद्योगाचा दर्जा देण्याची सरकारची यापूर्वीच्या घोषणेवर असूनही अंमलबजावणी झालेली नाही. नवीन धोरणामुळे हॉटेल्सना कमी वीज दर, कमी मालमत्ता कर आणि इतर फायदे मिळू शकतील. त्यामुळे उद्योजक आणि गुंतवणूकदारांना प्रोत्साहन मिळेल आणि आकर्षित होईल. 

काळे म्हणाले, महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्राचा विकास आणि वाढीसाठी उद्योजक नवीन पर्यटन धोरणाची आतुरतेने वाट पाहत आहे. हे धोरण विकासासाठी प्रेरणा देणारे ठरेल. योग्य पाठबळ आणि पायाभूत सुविधांमुळे महाराष्ट्र आणि विशेषत: विदर्भात पर्यटन क्षेत्रात मुबलक संधी आहे. हे देशातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनू शकते. त्यामुळे पर्यटक आणि गुंतवणूकदार आकर्षित होऊ शकतात. शेजारील राज्ये सध्या आकर्षक योजना आणि प्रोत्साहन देत आहेत. नवीन धोरण महाराष्ट्रातील पर्यटन उद्योजकांसाठी चालना देणारी ठरेल. परंतु मंत्र्यांच्या घोषणेनंतरही धोरण जाहीर न झाल्याने या क्षेत्रातील उद्योजकांचा चिंता वाढली आहे.

टॅग्स :tourismपर्यटनnagpurनागपूर