शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

Nagpur: पर्यटन क्षेत्रासाठी नवीन पर्यटन धोरण जाहीर करा,‘एआयडी’ची पर्यटन मंत्र्यांकडे मागणी

By मोरेश्वर मानापुरे | Updated: July 4, 2024 20:08 IST

Nagpur News: असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटने (एआयडी) महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना एक औपचारिक स्मरणपत्र जारी करून महाराष्ट्राचे नवीन पर्यटन धोरण त्वरित जारी करण्याची विनंती केली आहे. नव्या धोरणाने विदर्भात पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढणार आहे.

- मोरेश्वर मानापुरे नागपूर - असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटने (एआयडी) महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना एक औपचारिक स्मरणपत्र जारी करून महाराष्ट्राचे नवीन पर्यटन धोरण त्वरित जारी करण्याची विनंती केली आहे. नव्या धोरणाने विदर्भात पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढणार आहे.

गिरीश महाजन यांनी जानेवारी-२०२४ मध्ये नागपुरात आयोजित ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ या खासदार औद्योगिक महोत्सवात पर्यटन धोरण एक महिन्यात जाहीर करण्याची घोषणा केली होती. या घोषणेला सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. एआयडीने मंत्र्यांना एक स्मरणपत्र पाठविल्याची माहिती एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे यांनी दिली.  घोषणेच्या विलंबामुळे विविध उद्योगांमध्ये चिंता निर्माण झाली असून, विदर्भात पर्यटनाचा विकास करण्यासाठी सर्वसमावेशक योजनेची तातडीची गरज आहे. 

कार्यक्रमादरम्यान, विदर्भातील पर्यटन सुविधा वाढविण्याच्या गरजेवर भर देत अनेक प्रमुख मुद्यांवर चर्चा करण्यात आली होती. यामध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्स आणि पर्यटन स्थळांचा विकास करण्याचा समावेश होता. हॉटेलांना उद्योगाचा दर्जा देण्याची सरकारची यापूर्वीच्या घोषणेवर असूनही अंमलबजावणी झालेली नाही. नवीन धोरणामुळे हॉटेल्सना कमी वीज दर, कमी मालमत्ता कर आणि इतर फायदे मिळू शकतील. त्यामुळे उद्योजक आणि गुंतवणूकदारांना प्रोत्साहन मिळेल आणि आकर्षित होईल. 

काळे म्हणाले, महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्राचा विकास आणि वाढीसाठी उद्योजक नवीन पर्यटन धोरणाची आतुरतेने वाट पाहत आहे. हे धोरण विकासासाठी प्रेरणा देणारे ठरेल. योग्य पाठबळ आणि पायाभूत सुविधांमुळे महाराष्ट्र आणि विशेषत: विदर्भात पर्यटन क्षेत्रात मुबलक संधी आहे. हे देशातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनू शकते. त्यामुळे पर्यटक आणि गुंतवणूकदार आकर्षित होऊ शकतात. शेजारील राज्ये सध्या आकर्षक योजना आणि प्रोत्साहन देत आहेत. नवीन धोरण महाराष्ट्रातील पर्यटन उद्योजकांसाठी चालना देणारी ठरेल. परंतु मंत्र्यांच्या घोषणेनंतरही धोरण जाहीर न झाल्याने या क्षेत्रातील उद्योजकांचा चिंता वाढली आहे.

टॅग्स :tourismपर्यटनnagpurनागपूर