शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

अनिरुद्ध ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा महाविजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 10:31 AM

महाराष्ट्र संगीत रत्न, सारेगमप यासारख्या मोठ्या स्पर्धा जिंकणाऱ्या अनिरुद्ध जोशी या नागपूरकर गायकाने शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, एका मराठी वाहिनीवरील अत्यंत गाजलेल्या ‘सूर नवा ध्यास नवा’ या स्पर्धेचा तो महाविजेता ठरला आहे.

ठळक मुद्देनागपूरला मिळाली ‘मानाची कट्यार’महाअंतिम फेरीत चौघांना टाकले मागे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जन्मजात लाभलेला गोड गळा अन् गायनातील नावीन्यपूर्ण प्रयोगांमुळे महाराष्ट्र संगीत रत्न, सारेगमप यासारख्या मोठ्या स्पर्धा जिंकणाऱ्या अनिरुद्ध जोशी या नागपूरकर गायकाने शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, एका मराठी वाहिनीवरील अत्यंत गाजलेल्या ‘सूर नवा ध्यास नवा’ या स्पर्धेचा तो महाविजेता ठरला आहे.८ एप्रिल रोजी मुंबईमध्ये पार पडलेल्या या महाअंतिम फेरीत परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मते या दोन्ही बाजूंवर अनिरुद्ध अव्वल ठरला. नागपूरकर रसिकांनी अनिरुद्धला भरभरून मते दिली. या महाअंतिम फेरीत अनिरुद्धबरोबर निहिरा जोशी, शरयू दाते, प्रसेनजित कोसंबी आणि विश्वजित बोरवणकर हे तगडे स्पर्धक होते. या स्पर्धेचे परीक्षण महेश काळे, अवधूत गुप्ते आणि शाल्मली खोलगडे यांनी केले. पं. हृदयनाथ मंगेशकर आणि सचिन पिळगावकर हे महाअंतिम सोहळ्याचे प्रमुख पाहुूणे होते. अनिरुद्धने या कार्यक्रमात सुरवातीपासून अप्रतिम गाणी सादर करून पाच वेळा कट्यार मिळविली होती. महाअंतिम फेरीत तर ही कट्यार कायमची त्याची झाली.

ही स्पर्धा माझ्यासाठी एक मोठे स्वप्न होते. मी या स्पर्धेचा महाविजेता ठरल्याने ते साकार झाले आहे. यापुढे गायक आणि संगीतकार म्हणून मला कारकीर्द घडवायची आहे. माझ्या या सांगितिक प्रवासात नागपूरकर रसिकांनी मला नेहमीच साथ दिली. यावेळीसुद्धा त्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला. नागपूरकरांचे माझ्यावरील हे प्रेम बघून मी भारावून गेलो आहे.- अनिरुद्ध जोशी

टॅग्स :musicसंगीत