शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दिल्लीवरून अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिल्याने शिंदे, फडणवीस अस्वस्थ; अनिल देशमुखांचा दावा

By कमलेश वानखेडे | Updated: July 22, 2023 17:26 IST

भाजपचे आमदार नाराज : शिंदे गटातील आमदारांमध्येही अस्वस्थता

नागपूर : जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून भाजपचे फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. एक वर्षापूर्वी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी चे आमदार फोडले. जनतेला हे आवडलेले नाही. दिल्लीवरून अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अस्वस्थ आहेत, असा दावा माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले, शिंदे गटातील आमदारांमध्येही अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीला चांगली खाती दिली, त्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे, हळुहळु ही नाराजी पुढे येईल. बाहेरच्या पक्षातून आलेल्या आमदारांना मंत्रिपद दिले आणि भाजपच्या आमदारांना मंत्रिपद दिले जात नाही, यामुळे भाजपचे आमदारही खाजगीत नाराजी व्यक्त करीत आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे आता तिसऱ्यांदा दिल्लीला गेले आहेत. कदाचित महाराष्ट्रातील काही प्रश्नांसाठी गेले असतील. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. दुबार, तीबार पेरणीची वेळ आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी. बियाणे, खते मिळाली पाहिजे. बोगस बियाणे आणि खतांवर सरकारने लक्ष द्यावे. शेतकऱ्यांना त्वरित कर्ज वाटप झाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

शक्ती कायद्याचे प्रारुप केंद्राकडे प्रलंबित

- गेल्या सहा महिन्यात राज्यातील ५ हजार ६०० तरुणी आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. मात्र सरकारला या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आपण मी गृहमंत्री असताना शक्ती कायदा चे प्रारूप तयार केले होते. अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याचे प्रावधान या कायद्यात आहेकेंद्र शासनाकडे हा प्रस्ताव गेल्या दीड महिन्यापासून प्रलंबित आहे. त्याचा पाठपुरावा सरकारने करण्याची गरज देशमुख यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnil Deshmukhअनिल देशमुख