शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दिल्लीवरून अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिल्याने शिंदे, फडणवीस अस्वस्थ; अनिल देशमुखांचा दावा

By कमलेश वानखेडे | Updated: July 22, 2023 17:26 IST

भाजपचे आमदार नाराज : शिंदे गटातील आमदारांमध्येही अस्वस्थता

नागपूर : जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून भाजपचे फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. एक वर्षापूर्वी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी चे आमदार फोडले. जनतेला हे आवडलेले नाही. दिल्लीवरून अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अस्वस्थ आहेत, असा दावा माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले, शिंदे गटातील आमदारांमध्येही अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीला चांगली खाती दिली, त्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे, हळुहळु ही नाराजी पुढे येईल. बाहेरच्या पक्षातून आलेल्या आमदारांना मंत्रिपद दिले आणि भाजपच्या आमदारांना मंत्रिपद दिले जात नाही, यामुळे भाजपचे आमदारही खाजगीत नाराजी व्यक्त करीत आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे आता तिसऱ्यांदा दिल्लीला गेले आहेत. कदाचित महाराष्ट्रातील काही प्रश्नांसाठी गेले असतील. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. दुबार, तीबार पेरणीची वेळ आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी. बियाणे, खते मिळाली पाहिजे. बोगस बियाणे आणि खतांवर सरकारने लक्ष द्यावे. शेतकऱ्यांना त्वरित कर्ज वाटप झाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

शक्ती कायद्याचे प्रारुप केंद्राकडे प्रलंबित

- गेल्या सहा महिन्यात राज्यातील ५ हजार ६०० तरुणी आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. मात्र सरकारला या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आपण मी गृहमंत्री असताना शक्ती कायदा चे प्रारूप तयार केले होते. अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याचे प्रावधान या कायद्यात आहेकेंद्र शासनाकडे हा प्रस्ताव गेल्या दीड महिन्यापासून प्रलंबित आहे. त्याचा पाठपुरावा सरकारने करण्याची गरज देशमुख यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnil Deshmukhअनिल देशमुख