शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

घुसखोरीमुळे आंध्र, केरळ आणि प. बंगालची स्थिती चिंताजनक : विहिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 8:02 PM

शेजारी राष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये घुसखोरी सुरू आहे. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि केरळातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. यामुळे जिहादी कारवायाही वाढल्याची चिंता विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलींद परांडे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देजिहादी कारवाया वाढल्या : हितचिंतक अभियानातून करणार जनजागरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेजारी राष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये घुसखोरी सुरू आहे. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि केरळातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. यामुळे देशातील लोकसंख्येच्या असंतुलनाचा धोका निर्माण झाला असून जिहादी कारवायाही वाढल्याची चिंता विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलींद परांडे यांनी व्यक्त केली.विहिपच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, आंध्र व केरळमध्ये जिहादी कारवाया जोरात सुरू असून तिथे चार हजारांवर मुली बेपत्ता आहेत. घुसखोरांच्या माध्यमातून तिथे ह्युमन ट्राफिक सुरू आहे.ममता बॅनर्जी या संवैधानिक पदावर असतानाही एक प्रकारे घुसखोरांची पाठराखण करीत आहे. आपले ओळखपत्र हरविल्याची तक्रार पोलिसात करा, असा सल्ला त्या देत आहेत. यामुळ्य देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका पोहचू शकतो. योग्य प्रक्रिया पार पाडून शेजारच्या राष्ट्रातून भारतात शरण येणाऱ्या हिंदूंच्या सुरक्षेसाठी आणि सहकार्यासाठी भारत सरकारने सहकार्य करावे, अशी विहिपची मागणी आहे. या संदर्भात विहिपची भूमिका सांगताना ते म्हणाले, बांगलादेश व म्यानमारमधून भारतामध्ये येणारे प्रताडित हिंदू शरणार्थी असून रक्षणयोग्य आहेत. मात्र तिथून येणारे मुस्लिम घुसखोर आहेत. त्यांना शोधून देशाबाहेर घालवावे, अशी आमची भूमिका आहे.तिरूपती मंदिरासह अन्य हिंदू मंदिरांमध्ये गैरहिंदूनांना नोकऱ्या देण्याची घोषणा या सरकारने केली आहे. तेथील सेव्हन हिल्समधून धर्मांतराचे काम सुरु आहे. हे काम संविधान विरोधातील आहेत. त्याविरूद्ध आम्ही न्यायलयाकडे दाद मागू.१७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या काळामध्ये देशभर ‘हितचिंतक अभियान’ राबविले जाणार आहे. या माध्यमातून ५१ लाखांपेक्षा अधिक हिंदूंना जागृत करून विहिपसोबत जोडले जाईल. विदर्भ प्रांतामध्ये दोन लाख लोकांना या अभियानात सहभागी केले जाणार आहे. मागील अभियानातून ३२ लाखांवर अधिक नागरिकांना जोडण्यात आले होते. आमचे संघटन कोणाही विरूद्ध नाही. त्रीशुळ हे आमचे धार्मिक प्रतिक असून ते वाटणे अयोग्य नाही. आजवर अनेकदा आम्ही त्रीशुळ वाटले आहेत, अशा शब्दात त्यांनी त्रीशुळ वाटपे समर्थन केले. यावेळी विहिपचे प्रांतमंत्री गोविंद शेंडे आणि नागपूर महानगर मंत्री प्रशांत चित्रे उपस्थित होते.जगमोहन रेड्डी सरकारची हिंदूविरोधी पावलेआंध्र प्रदेशात निवडून आलेल्या जगनमोहन रेड्डी सरकारने हिंदूविरोधी पावले उचलल्याचा आरोप करून परांडे म्हणाले, समाजातील वंचितांना घरे बांधण्यासाठी मंदिरांची जमीन देण्याची घोषणा या सरकारने केली आहे. या निर्णयाला विरोध नाही. मात्र केवळ हिंदू मंदिरांचीच जमीन का द्यावी. अनेक चर्चला मिळालेल्या लीजवरील जमिनींची ९९ वर्षांची मुदत १९९४ मध्येच संपली आहे. वक्फ बोर्डाच्या कितीतरी जमिनी रिकाम्या पडून आहेत. त्यासुद्धा द्याव्यात. हिंदू मंदिरांना दानात मिळालेल्या या जमिनी आहेत. मंदिराच्या विकासाचे आणि व्यवस्थापनाचे काम त्यातून चालावे, हा त्यामागील हेतू होता. याला विहिंपचा विरोध राहील.

टॅग्स :HinduहिंदूMediaमाध्यमे