शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Sushma Swaraj Death: तब्येत बरी नसतानाही त्या नितीन गडकरींसाठी आल्या... बोलल्या आणि जिंकल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 15:13 IST

‘मेरी प्यारी बहनों एवम् माताओं’ हे शब्द उच्चारताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजले.

ठळक मुद्देप्रकृती अस्वस्थ असतानादेखील केला होता गडकरींचा प्रचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘त्या आल्या, त्या बोलल्या आणि त्यांनी जिंकले’...राजकारणात असे फारच थोड्या व्यक्तींबाबत होते. त्यांच्या जिव्हेवर सरस्वतीचा वास होता अन् देशहितासाठी दूरदृष्टीचा अनोखा ध्यास होता. अगोदरच नागपूरचा उन्हाळा अन् प्रचाराची रणधुमाळी...अशा तापलेल्या वातावरणात येऊन भाषण करणे म्हणजे भल्याभल्यांची परीक्षा ठरते. परंतु प्रकृती खराब असतानादेखील त्यांनी इच्छाशक्तीतून मंचावरुन संवादाला सुरुवात केली अन् ‘मेरी प्यारी बहनों एवम् माताओं’ हे शब्द उच्चारताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजले. ज्येष्ठ महिलांपासून ते अगदी चिमुकल्या मुलामुलींपर्यंत सर्वांनीच उभे राहून त्यांचे अभिवादन केले. सर्वांच्या ध्यानी, मनी अन् ओठी एकच नाव होते, सुषमा, सुषमा, सुषमा !जीवघेण्या संकटाशी सामना करत असतानादेखील माजी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभा निवडणुकांच्या काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी नागपूरला भेट दिली होती. दुर्दैवाने ती त्यांची अखेरची भेट ठरली. परंतु नागपूरच्या या भूमीतूनच त्यांनी राजकारण, समाजकारणाचे संस्कार घेतले. या भूमीतील विचारातूनच आपल्याला दिशा मिळाली असे त्या अभिमानाने सांगायच्या. या भूमीशी त्यांचा विशेष जिव्हाळा होता.२ एप्रिल २०१९ रोजी नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी जगनाडे चौकाजवळ त्या महिला मेळाव्याला उपस्थित राहिल्या होत्या. प्रकृती खराब असताना देखील आपली मूल्य व तत्त्व यांच्यासाठी त्या जिद्दीने उभ्या होत्या. कितीही त्रास झाला, अडचण आली तरी पक्षाने सोपविलेली जबाबदारी पार पाडायचीच हा दृढनिश्चय होता. तब्येतीमुळे उभे राहता येत नव्हते. यावर त्यांनी मार्ग शोधला व सोफ्यावर बसूनच महिलांशी संवाद साधला होता.काश्मीरच्या स्थितीवर केले होते भाष्यमृत्यूच्या काही तास अगोदर सुषमा स्वराज यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. योगायोगाने नागपुरातील आपल्या अखेरच्या मेळाव्यात त्यांनी जम्मू-काश्मीरमधील स्थितीवरच भाष्य केले होते. केंद्र सरकारने फुटीरवाद्यांच्या सवलती बंद केल्या व त्याची आवश्यकता होती, असे म्हणत त्यांनी पुलवामा हल्ल्यानंतर देशाच्या सैन्यशक्ती व कूटनीतीचा विजय कसा झाला यावर भाष्य केले होते.संघ संस्कारांचा होता अभिमानसुषमा स्वराज अनेकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच राष्ट्रसेविका समितीच्या कार्यक्रमांसाठी नागपुरात आल्या होत्या. संघातील अनेक पदाधिकारी व स्वयंसेवकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. संघ संस्कारांचा मला अभिमान आहे, असे त्या नेहमी म्हणायच्या. २७ नोव्हेंबर २०१८ रोजी स्त्री शक्तिपीठाच्या कार्यक्रमाला त्यांनी आवर्जून हजेरी लावली होती. परराष्ट्र धोरण राबवित असताना त्यातून भारतीय संस्कृती व राष्ट्रहिताचे संस्कार दिसेल हाच प्रयत्न असतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNitin Gadkariनितीन गडकरी