शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

Sushma Swaraj Death: तब्येत बरी नसतानाही त्या नितीन गडकरींसाठी आल्या... बोलल्या आणि जिंकल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 15:13 IST

‘मेरी प्यारी बहनों एवम् माताओं’ हे शब्द उच्चारताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजले.

ठळक मुद्देप्रकृती अस्वस्थ असतानादेखील केला होता गडकरींचा प्रचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘त्या आल्या, त्या बोलल्या आणि त्यांनी जिंकले’...राजकारणात असे फारच थोड्या व्यक्तींबाबत होते. त्यांच्या जिव्हेवर सरस्वतीचा वास होता अन् देशहितासाठी दूरदृष्टीचा अनोखा ध्यास होता. अगोदरच नागपूरचा उन्हाळा अन् प्रचाराची रणधुमाळी...अशा तापलेल्या वातावरणात येऊन भाषण करणे म्हणजे भल्याभल्यांची परीक्षा ठरते. परंतु प्रकृती खराब असतानादेखील त्यांनी इच्छाशक्तीतून मंचावरुन संवादाला सुरुवात केली अन् ‘मेरी प्यारी बहनों एवम् माताओं’ हे शब्द उच्चारताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजले. ज्येष्ठ महिलांपासून ते अगदी चिमुकल्या मुलामुलींपर्यंत सर्वांनीच उभे राहून त्यांचे अभिवादन केले. सर्वांच्या ध्यानी, मनी अन् ओठी एकच नाव होते, सुषमा, सुषमा, सुषमा !जीवघेण्या संकटाशी सामना करत असतानादेखील माजी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभा निवडणुकांच्या काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी नागपूरला भेट दिली होती. दुर्दैवाने ती त्यांची अखेरची भेट ठरली. परंतु नागपूरच्या या भूमीतूनच त्यांनी राजकारण, समाजकारणाचे संस्कार घेतले. या भूमीतील विचारातूनच आपल्याला दिशा मिळाली असे त्या अभिमानाने सांगायच्या. या भूमीशी त्यांचा विशेष जिव्हाळा होता.२ एप्रिल २०१९ रोजी नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी जगनाडे चौकाजवळ त्या महिला मेळाव्याला उपस्थित राहिल्या होत्या. प्रकृती खराब असताना देखील आपली मूल्य व तत्त्व यांच्यासाठी त्या जिद्दीने उभ्या होत्या. कितीही त्रास झाला, अडचण आली तरी पक्षाने सोपविलेली जबाबदारी पार पाडायचीच हा दृढनिश्चय होता. तब्येतीमुळे उभे राहता येत नव्हते. यावर त्यांनी मार्ग शोधला व सोफ्यावर बसूनच महिलांशी संवाद साधला होता.काश्मीरच्या स्थितीवर केले होते भाष्यमृत्यूच्या काही तास अगोदर सुषमा स्वराज यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. योगायोगाने नागपुरातील आपल्या अखेरच्या मेळाव्यात त्यांनी जम्मू-काश्मीरमधील स्थितीवरच भाष्य केले होते. केंद्र सरकारने फुटीरवाद्यांच्या सवलती बंद केल्या व त्याची आवश्यकता होती, असे म्हणत त्यांनी पुलवामा हल्ल्यानंतर देशाच्या सैन्यशक्ती व कूटनीतीचा विजय कसा झाला यावर भाष्य केले होते.संघ संस्कारांचा होता अभिमानसुषमा स्वराज अनेकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच राष्ट्रसेविका समितीच्या कार्यक्रमांसाठी नागपुरात आल्या होत्या. संघातील अनेक पदाधिकारी व स्वयंसेवकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. संघ संस्कारांचा मला अभिमान आहे, असे त्या नेहमी म्हणायच्या. २७ नोव्हेंबर २०१८ रोजी स्त्री शक्तिपीठाच्या कार्यक्रमाला त्यांनी आवर्जून हजेरी लावली होती. परराष्ट्र धोरण राबवित असताना त्यातून भारतीय संस्कृती व राष्ट्रहिताचे संस्कार दिसेल हाच प्रयत्न असतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNitin Gadkariनितीन गडकरी