शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

सततचा पाऊस, नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2022 16:48 IST

अंबाडा येथील घटना

जलालखेडा (नागपूर) : सततचा मुसळधार पाऊस, तीनदा केलेली पेरणी, पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान आणि वाढते कर्जबाजारपण यामुळे चिंतित असलेल्या वृद्ध शेतकऱ्याने स्वत:च्या घरी छताच्या पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडा येथे शनिवारी (दि. ३) मध्यरात्री घडली.

विठ्ठल नत्थूजी उमरकर (६२, रा. अंबाडा, ता. नरखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. यावर्षी सततच्या मुसळधार व अतिरिक्त पावसामुळे त्यांना तीनदा पेरणी करावी लागली. एवढे करूनही पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांची अवस्था वाईट असल्याने समाधानकारक उत्पादन हाेण्याची शक्यता मावळली आहे. त्यांच्याकडे बॅंकेचे पीककर्ज असून, कर्जाच्या परतफेडीची चिंता त्यांना भेडसावत हाेती. शिवाय, सरकारने आर्थिक मदतीही दिली नाही, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

त्यांच्या पत्नीला शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास झाेपेतून जाग आली असता, त्यांना ते पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी आरडाओरड करताच मुलगा कैलास व शेजाऱ्यांना जाग आली. माहिती मिळताच पाेलिसांनी मध्यरात्री घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणला. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

नरखेड तालुक्यात आत्महत्यांचे सत्र

नरखेड तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. वर्षभरात तालुक्यातील ११ शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून वेगवेगळ्या मार्गाने स्वत:ला संपवत आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुण शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. याला ‘ब्रेक’ लावण्यासाठी वेळीच याेग्य उपाययाेजना करणे अत्यावश्यक आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यू