शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

सततचा पाऊस, नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2022 16:48 IST

अंबाडा येथील घटना

जलालखेडा (नागपूर) : सततचा मुसळधार पाऊस, तीनदा केलेली पेरणी, पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान आणि वाढते कर्जबाजारपण यामुळे चिंतित असलेल्या वृद्ध शेतकऱ्याने स्वत:च्या घरी छताच्या पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडा येथे शनिवारी (दि. ३) मध्यरात्री घडली.

विठ्ठल नत्थूजी उमरकर (६२, रा. अंबाडा, ता. नरखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. यावर्षी सततच्या मुसळधार व अतिरिक्त पावसामुळे त्यांना तीनदा पेरणी करावी लागली. एवढे करूनही पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांची अवस्था वाईट असल्याने समाधानकारक उत्पादन हाेण्याची शक्यता मावळली आहे. त्यांच्याकडे बॅंकेचे पीककर्ज असून, कर्जाच्या परतफेडीची चिंता त्यांना भेडसावत हाेती. शिवाय, सरकारने आर्थिक मदतीही दिली नाही, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

त्यांच्या पत्नीला शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास झाेपेतून जाग आली असता, त्यांना ते पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी आरडाओरड करताच मुलगा कैलास व शेजाऱ्यांना जाग आली. माहिती मिळताच पाेलिसांनी मध्यरात्री घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणला. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

नरखेड तालुक्यात आत्महत्यांचे सत्र

नरखेड तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. वर्षभरात तालुक्यातील ११ शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून वेगवेगळ्या मार्गाने स्वत:ला संपवत आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुण शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. याला ‘ब्रेक’ लावण्यासाठी वेळीच याेग्य उपाययाेजना करणे अत्यावश्यक आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यू