शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

सततचा पाऊस, नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2022 16:48 IST

अंबाडा येथील घटना

जलालखेडा (नागपूर) : सततचा मुसळधार पाऊस, तीनदा केलेली पेरणी, पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान आणि वाढते कर्जबाजारपण यामुळे चिंतित असलेल्या वृद्ध शेतकऱ्याने स्वत:च्या घरी छताच्या पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडा येथे शनिवारी (दि. ३) मध्यरात्री घडली.

विठ्ठल नत्थूजी उमरकर (६२, रा. अंबाडा, ता. नरखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. यावर्षी सततच्या मुसळधार व अतिरिक्त पावसामुळे त्यांना तीनदा पेरणी करावी लागली. एवढे करूनही पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांची अवस्था वाईट असल्याने समाधानकारक उत्पादन हाेण्याची शक्यता मावळली आहे. त्यांच्याकडे बॅंकेचे पीककर्ज असून, कर्जाच्या परतफेडीची चिंता त्यांना भेडसावत हाेती. शिवाय, सरकारने आर्थिक मदतीही दिली नाही, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

त्यांच्या पत्नीला शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास झाेपेतून जाग आली असता, त्यांना ते पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी आरडाओरड करताच मुलगा कैलास व शेजाऱ्यांना जाग आली. माहिती मिळताच पाेलिसांनी मध्यरात्री घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणला. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

नरखेड तालुक्यात आत्महत्यांचे सत्र

नरखेड तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. वर्षभरात तालुक्यातील ११ शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून वेगवेगळ्या मार्गाने स्वत:ला संपवत आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुण शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. याला ‘ब्रेक’ लावण्यासाठी वेळीच याेग्य उपाययाेजना करणे अत्यावश्यक आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यू