शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमृत योजना आता मजिप्राकडे; नागपूर शहरालगतच्या भागाला पाणी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 11:52 IST

केंद्र सरकारच्या अटल अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरालगतच्या अनधिकृत, अधिकृत वस्त्या व झोपडपट्ट्यांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. २२७ कोटींची ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत राबविण्याचा निर्णय मंगळवारी मुंबई येथे घेण्यात आला.

ठळक मुद्दे२२७ कोटींची योजना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या अटल अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरालगतच्या अनधिकृत, अधिकृत वस्त्या व झोपडपट्ट्यांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. २२७ कोटींची ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत राबविण्याचा निर्णय मंगळवारी मुंबई येथे मंत्रालयात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या क क्षात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. सुधाकर देशमुख, प्रा.अनिल सोले, डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.२०१६ मध्ये अमृत योजना आली. या योजनेच्या माध्यमातून शहरातील सहाही विधानसभा मतदार संघात येणाऱ्या वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार होता. परंतु महापालिकेने योजनेच्या कामाच्या निविदा काढण्यासाठी दोन वर्ष लावले. ही योजना तातडीने पूर्ण करण्यासाठी मजिप्राकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.महापालिकेने या योजनेच्या कामाचा मूळ प्रस्ताव २८३ कोटींचा तयार केला होता. मात्र मजिप्राने २२६ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता दिली. महापालिकेने २०१६ पासून आतापर्यत ६ वेळा निविदा काढल्या. पण मूळ प्रकल्पापेक्षा ३५-४० टक्के ज्यादा दराच्या निविदा आल्या, कंत्राटदाराच्या साखळीत या योजनेच्या कामाच्या निविदा महापालिकेकडे योग्य दरात आल्या नाही. परिणामी या योजनेचे काम करता आले नाही.महापालिकेने काढलेल्या निविदांमध्ये आलेल्या दराची तुलना मजिप्राच्या सध्याच्या दराशी केली असता महापालिकेच्या निविदाची किंमत अधिक होती. यामुळे शासनाची मान्यता मिळाली नाही. २०१५ च्या दरानुसार २२७ कोटी रुपयांचे प्राकलन असलेली ही योजना मंजूर आहे. महापालिकेची ३० ते ४० टक्के ज्यादा दराची निविदा असल्यामुळे ही योजना रखडल्याने शहरातील पाणीपुरवठ्याचे जाळे नसलेल्या भागाला पाणी मिळू शकले नाही.महापालिकेकडून ही योजना कार्यान्वित होण्याची शक्यता नसल्याने २२७ कोटींची ही योजना दीड वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश लोणीकर यांनी दिले. मजिप्राने नागपूर पेरी अर्बन पाणीपुरवठा योजना दोन वर्षात पूर्ण केली.या योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. पण अमृत योजना मात्र कंत्राटदारांच्या साखळीत अडकली. परिणामी मजिप्रानेच ही योजना करावी असा निर्णय पालकमंत्री बावनकुळे व आमदारांच्या उपस्थितीत घेण्यात आला. मजिप्राने युध्दपातळीवर योजनेसाठी आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया करावी व काम सुरू करावे. महापालिकेने योजनेसंदर्भात सर्व कागदपत्रे महराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सुपूर्द करण्याचे निर्देशही लोणीकर यांनी दिले.

पेरी अर्बनच्या पाईपलाईनसाठी ३० कोटीपेरी अर्बनमधील पाणीपूरवठा योजनेच्या अतिरिक्त पाईपलाईनसाठी पाणीपुरवठा मंत्र्यांनी ३० कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली. पालकमंत्री बावनकुळे यांनी केलेल्या मागणीवरून हा निधी मंजूर करण्यात आला. १०३ कि.मी . पाईप लाईनचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही याप्रसंगी देण्यात आले. पेरी अर्बन योजनेतील बचत झालेल्या निधीतून हे काम करण्यात येत आहे. बिडगाव व तरोडी या दोन गावांचा समावेशही पेरी अर्बनमध्ये करण्यात आला.

टॅग्स :Waterपाणी