शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

राजकीय अपयश असल्यावर नेत्यांच्या आरत्या करायच्या का?, अंबादास दानवे यांची टीका

By कमलेश वानखेडे | Updated: September 26, 2023 13:49 IST

नागपुरातील पूरग्रस्त भागांची केली पाहणी

नागपूर : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी सकाळी नागपुरातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, मोठया घराचा पोकळ वासा अशी म्हण आहे. मोठे नेते असताना विकास झाला नाही, मुंबईला तुंबई म्हणणारे, आता कुठे आहेत. मुंबई तर १ हजार मिलीमीटर पावसाला समोर गेली आहे. नागपुरात २०० ते ५०० मिमी पाऊस झाला तर काय होईल, याचा विचार राजकीय नेत्यांनी केला नाही. नागपूरची पूरस्थितीत हे राजकीय अपयश असल्यावर नेत्यांच्या आरत्या करायच्या का, अशी टीकाही त्यांनी केली.

दानवे यांनी अंबाझरी, डागा ले-आऊट, वर्मा लेआऊट, पंचशील चौक, सीताबर्डी यासह नागनदीच्या पात्राचीही पाहणी केली. काही घरांमध्ये जावून तेथील नुकसानीची माहिती घेतली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले, मुंबईतील नाले सफाईवर येथील नेते ओरडतात, पण नागपूरचे काय, येथे नालेसफाई झाली का, संरक्षण भिंत का झाली नाही, असा सवाल त्यांनी केला. डागा ले आउटमध्ये पार्किंगच्या नावाखाली, नाल्यावर आच्छादन टाकले आहे, नासुप्रने हा खर्च कुणासाठी केला होता. वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. आता ५५ टीम सर्वेक्षण करीत आहेत. हे सर्वेक्षण वार्ड नुसार व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. कोणत्याही शिवसैनिकांने नेत्यांच्या कुटुंबियांवर टीका करू नये, कोणी शिवसैनिक करत असेल तर मी थांबवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दानवे यांच्यासोबत माजी आ. दुष्यंत चतुर्वेदी,  माजी खा. प्रकाश जाधव, माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, नितीन तिवारी, दीपक कापसे, सतीश हरडे आदी उपस्थित होते.

अध्यक्ष सुनावणी घेण्यापूर्वी कुणाला भेटले ?

- अध्यक्ष हे न्यायाधीकरण आहे ते प्राधिकरण नाही. अपात्रे संदर्भात जो कायदा आहे त्याचा अर्थ लावण्याचे काम विधानसभा अध्यक्षांना करायचे आहे. जो अर्थ लावायचा असेल तो अर्थ त्यांनी लावावा. आमची जबरदस्ती नाही. पण अध्यक्ष हे सुनावाणी घेण्यापूर्वी कोणाला भेटले, त्यांच्याव कुणाचा दबाव आहे का, या सगळ्या गोष्टीची माहिती घेतलीच पाहिजे, असेही दानवे म्हणाले. लवकरात लवकर निर्णय घ्या, अशा सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना आणि निर्देश असताना अद्याप निकालाच्या सुनावणीला सुरुवात झाली नाही. प्रोसेस कशी करायची यातच विधानसभा अध्यक्ष गुंतलेले असल्यामुळे यातच सगळे राजकारण गुंतलेले आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणAmbadas Danweyअंबादास दानवेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूरfloodपूरRainपाऊस