रेल्वे मेन्ससाठी जुन्या विद्यार्थ्यांचे रियुनियन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST2021-01-04T04:07:41+5:302021-01-04T04:07:41+5:30
अजनी वाचवा नागपूर : कुठल्याशा प्रकल्पासाठी अजनीची रेल्वे मेन्स शाळा तुटणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ही माहिती जुन्या सहकाऱ्यांकडून ...

रेल्वे मेन्ससाठी जुन्या विद्यार्थ्यांचे रियुनियन ()
अजनी वाचवा
नागपूर : कुठल्याशा प्रकल्पासाठी अजनीची रेल्वे मेन्स शाळा तुटणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ही माहिती जुन्या सहकाऱ्यांकडून नाशिकला राहणाऱ्या रुक्मिणी जोशी यांनाही मिळाली आणि त्यांनी नागपूरकडे धाव घेतली. रविवारी शाळेसाठी स्वाक्षरी अभियान राबविले जात असल्याचे कळताच त्याही सहभागी झाल्या. रुक्मिणी या १९८१ च्या बॅचच्या. आश्चर्य म्हणजे त्यांच्या बॅचमधून त्या एकट्या नव्हत्या. त्यांच्यासोबत दहावीपर्यंत शिकलेले १०-१२ सहकारीही आंदोलनासाठी पोहचले होते.
एकीकडे अजनी कॉलनी परिसरातील हजारो झाडांची कटाई थांबावी म्हणून पर्यावरणप्रेमी सरसावले असताना दुसरीकडे या प्रकल्पामुळे पाडली जाणारी रेल्वे मेन्स शाळा वाचविण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी एकजूट झाले आहेत. शाळा तोडली जाऊ नये म्हणून सुरू असलेल्या आंदोलनात आपलाही खारीचा वाटा देण्यासाठी माजी विद्यार्थी सहभागी होत आहेत. माजी विद्यार्थी अनिकेत कुत्तरमारे याच्या पुढाकाराने रविवारी शाळेसाठी स्वाक्षरी अभियान राबिवले. साेशल मीडियावर याबाबत माहिती मिळताच अनेक जुने विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले. १९८१ च्या बॅचमधून रुक्मिणी यांच्यासह मनिषा उपासनी, तेजस्विनी दलदले, माया विश्वकर्मा, सुषमा मांडळकर, डाॅ. प्रशांत खेडकर, दीपक बुटले, अतुल जाेशी, सतीश डाेंगरे, किशाेर जाधव यांचा समावेश हाेता. याशिवाय डाॅ. हर्षवर्धन कांबळे (८७ बॅच), मिलिंद टानपे (८३ बॅच), अनिल कुळकर्णी व सुहास कुळकर्णी (८२ बॅच), संगीता साेंधिया, मंदा चाैरे, मालती चाैधरी, सीमा पाटील, कल्पना बुरेले, नम्रता वाळके, कविता निमसरकर (सर्व ९१ बॅच), शैलेश मेश्राम (२००२ बॅच) आणि २०११ मध्ये पासआऊट झालेले मंगेश आंबुलकर, स्वाती मून, समीक्षा डाेंगरे, अपेक्षा रामटेके व आदिती अनेवार यांचा समावेश आंदाेलनात हाेता.
सावित्रीबाइ फुले यांची जयंती साजरी
स्वाक्षरी अभियानादरम्यान जमा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी क्रांतिज्याेती सावित्रीबाइ फुले यांची जयंती साजरी केली. तेव्हा सर्वांना शाळेचे जुने दिवस आठवले. या माजी विद्यार्थ्यांपैकी अनेकजण त्यांच्या नाेकरीतून निवृत्त झाले आहेत. अनेक डाॅक्टर, इंजिनिअर व अनेक विदेशात स्थायिक झाले आहेत. अनेकजण माेठ्या पदावर आहेत. त्या सर्वांनी शाळेप्रति संवेदना व्यक्त करीत त्यांचे आयुष्य घडविले तसे भविष्यात इतर विद्यार्थी घडवावे, अशी भावना व्यक्त केली. शाळा वाचविण्यासाठी कुठल्याही आंदाेलनात सहभागी हाेण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.