शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ओबीसींच्या रिक्त झालेल्या सर्व जागा केल्या सर्वसाधारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 23:09 IST

Vacancies of OBCs are made general नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या १५ रद्द झालेल्या जागा या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात याव्यात, त्यातूनच ५० टक्के महिलांचे आरक्षण काढण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देराज्य निवडणूक आयोगाने दिला सोडतीचा कार्यक्रम

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेत व पंचायत समितीत ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. बुधवारी राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचा निर्देशानुसार आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या १५ रद्द झालेल्या जागा या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात याव्यात, त्यातूनच ५० टक्के महिलांचे आरक्षण काढण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करताना सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च रोजी दिलेल्या निर्णयाचा हवाला दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीतून ओबीसीचे आरक्षण संपविले का, असा सवाल ओबीसींच्या संघटनांकडून करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम, पालघर व नागपूर जिल्हा परिषदेतील ओबीसी प्रवर्गातील सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सदस्यत्व रद्द झालेल्या काही सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयात रिट याचिकाही दाखल केल्या आहेत. त्यावर अजूनही सुनावणी व्हायची आहे. पण १७ मार्च रोजी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात रद्द झालेल्या जागा सर्वसाधारण प्रवर्गात मोडून, महिला आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले आहे.

आरक्षण सोडत काढताना घ्यावयाची दक्षता

१) रिक्त झालेल्या जागांमधून सर्वसाधारण महिलांचे आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढण्यात यावी.

२) आरक्षणाची सोडत काढताना २००३, २००८ व २०१३ च्या सार्वत्रिक निवडणुकींमध्ये असलेले आरक्षण विचारात घेऊन आरक्षण चक्रानुक्रमे फिरविणे आवश्यक आहे.

३) जि.प.च्या निकालाची सोडत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत तर, पं.स.च्या निवडणुकीची सोडत तहसीलदारांकडून काढण्यात यावी.

४) सर्वसाधारण महिला आरक्षण सोडतीची सूचना १८ मार्चला प्रसिद्ध करावी.

५) २३ मार्च रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात यावी.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरreservationआरक्षण