शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

‘सॅटेलाइट’च्या माध्यमातून १० मिनिटांअगोदर मिळू शकणार वीज कोसळण्याचा ‘अलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2023 09:00 IST

Nagpur News लवकरच ‘सॅटेलाइट’च्या माध्यमातून संबंधित भूभागात १० मिनिटांअगोदर वीज पडण्याची नेमकी वेळ कळू शकणार आहे. यादृष्टीने ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरू असून ‘जिओस्टेशनरी मॅपर’वर काम सुरू करण्यात येणार आहे. यामुळे हजारो जीव वाचू शकणार आहेत.

ठळक मुद्दे‘जिओस्टेशनरी मॅपर’वरील प्रकल्प लवकरच, अनेक जीव वाचणार

योगेश पांडे

नागपूर : विदर्भासह देशात पावसाळ्यात वीज पडून जीव जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे असून भारताची अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ने यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सद्य:स्थितीत उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानातून तीन ते सहा तास अगोदरपर्यंत वीज पडण्याचा इशारा देणे शक्य आहे. मात्र, लवकरच ‘सॅटेलाइट’च्या माध्यमातून संबंधित भूभागात १० मिनिटांअगोदर वीज पडण्याची नेमकी वेळ कळू शकणार आहे. यादृष्टीने ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरू असून ‘जिओस्टेशनरी मॅपर’वर काम सुरू करण्यात येणार आहे. यामुळे हजारो जीव वाचू शकणार आहेत.

१०८ व्या ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’च्या निमित्ताने नागपुरात आलेले ‘इस्रो’चे वैज्ञानिक सचिव शंतनु भाटवडेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना असे प्रयत्न सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. वीज पडणे ही तशी गुंतागुंतीची वातावरणीय प्रक्रिया मानण्यात येते. भारतातील वीज पडण्याच्या घटना लक्षात घेता ‘इस्रो’ व ‘नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर’तर्फे देशात २५ ठिकाणी ‘लाइटनिंग डिटेक्शन सेन्सर्स’चे नेटवर्क स्थापन करण्यात आले आहे. आगमनाच्या वेळेचा ‘अल्गोरिदम’ वापरून वीज पडण्याचा अंदाज लावण्यात येतो. ‘क्लाऊट टू ग्राऊंड’चा हा अंदाज काही तासांअगोदर लावता येणे शक्य असते. मात्र, त्यात १०० किलोमीटरच्या भागाचा अंदाज लावण्यात येतो व नेमकी जागा वेळेत कळत नाही. ‘आयआयटीएम’ने देशात ८३ ठिकाणी यासंदर्भात यंत्रणा लावली आहे. त्या माध्यमातून २० ते ४० किमी अंतरात कुठे वीज पडू शकते, याची सूचना मिळू शकते. मात्र, बहुतांश वेळा नेमकी वेळ समोर येत नाही.

हीच बाब लक्षात घेता केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयानेदेखील ‘इस्रो’तील वैज्ञानिकांशी चर्चा केली होती. काही विकसित देशात ‘सॅटेलाइट’च्या माध्यमातून वीज पडण्याचा ‘अलर्ट’ मिळतो. त्याच धर्तीवर भारतीय बनावटीची यंत्रणा विकसित करण्यासंदर्भात पावले उचलण्यात येत आहेत. यात ‘जिओस्टेशनरी मॅपर’चा प्रकल्प राहणार आहे. तसेच ‘जिओस्टेशनरी सॅटेलाइट्स’वर वीज पडण्याची सूचना देणारे ‘डिटेक्टर’ व यंत्रणा ‘इन्टॉल’ करावी लागणार आहे. या माध्यमातून ढगांमधील विद्युत हालचालीवर लक्ष ठेवता येणार आहे. यासाठी संबंधित तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर राहणार आहे.

छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्रातच सर्वाधिक विजेचे तांडव

 

भारतीय हवामान विभागाने यापूर्वी ‘दामिनी’ नावाचे ॲप विकसित केले होते. विजेच्या घडामोडींवर जीपीएस व डाटाच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येते व तीन ते चार तास अगोदर वीज पडण्याबाबत सूचना देण्यात येते. मात्र, तरीदेखील विजेमुळे नुकसान सुरूच आहे. महाराष्ट्र, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये अलीकडच्या वर्षांत अधिक वीज पडण्याच्या घटना घडल्या.

२०२२ मध्ये ९०७ मृत्यू

वीज पडल्यामुळे २०२२ या एकाच वर्षात ९०७ मृत्यू झाले. मागील १४ वर्षांतील हा सर्वांत मोठा आकडा आहे. विविध शासकीय यंत्रणांद्वारे वीज पडण्याची आगाऊ सूचना देण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात ही सूचना काही तासांअगोदर मिळते व निश्चित स्थानदेखील कळत नाही. ‘सॅटेलाइट’च्या उपयोगामुळे ‘क्लाऊट टू क्लाऊड’ डाटा मिळून वीज पडण्याची नेमकी वेळ कळविणे शक्य होणार आहे.

टॅग्स :electricityवीज