शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पावसाच्या आगमनासह नागपूर जिल्ह्यात अलर्ट जारी; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

By निशांत वानखेडे | Updated: August 12, 2025 19:41 IST

Nagpur : दडी मारलेला पाऊस मंगळवारी जाेरात बरसला

नागपूर : गेल्या दहा-बारा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने मंगळवारी नागपुरात अचानक जाेरदार हजेरी लावली. या हजेरीसह १३ पासून वर्तविलेल्या धुवांधार अंदाजाचे संकेतही दिले आहेत. हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात दिनांक १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत काही ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जाेरदार पावसाची शक्यता वर्तवलेली असून येलाे अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतली आहे. आकाशातून ढगांची गर्दीही हटली हाेती व सूर्याची तीव्रता वाढली हाेती. त्यामुळे तापमानात वाढ झाली असून नागरिकांना ऐन श्रावणात उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दरम्यान १० तारखेपासून गडचिराेली, चंद्रपूर, गाेंदिया व भंडारा जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम पावसाने हजेरी लावली. इतर जिल्ह्यात मात्र काेरड पडली हाेती. नागपूरही पावसाच्या गारव्यापासून वंचित हाेते. जुलै अखेरपर्यंत सरासरीपेक्षा २१ टक्के अधिक असलेला पाऊस दहा-बारा दिवसाच्या खंडामुळे सरासरीच्या खाली गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचीही चिंता वाढली हाेती.

मंगळवारीही तीच अवस्था हाेती. दरम्यान हवामान विभागाने मात्र १२ पासून पावसाचा अंदाज व्यक्त केला हाेता. सकाळपासून दुपारपर्यंत आकाश निरभ्र हाेते. दुपारनंतर मात्र आकाश ढगांनी व्यापले आणि ३.३० वाजता दरम्यान संथपणे सुरू झालेला पाऊस तीव्रतेने बरसला. मात्र शहरात ही हजेरी असमान हाेती. मेडिकल ते सीताबर्डीपर्यंत धुवांधार बरसत असताना गाेपालनगर परिसरात शुकशुकाट हाेता. शहरात सायंकाळपर्यंत ९ मि.मी. पावसाची नाेंद झाली. आर्द्रता मात्र ९५ टक्क्यावर पाेहचल्याने पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूरला १४ मि.मी. पाऊस झाला, तर भंडारा जिल्ह्यात किरकाेळ हजेरी लावली.

नागरिकांनी सतर्क रहावे

१३ ते १५ ऑगस्ट या तीन दिवसाकरीता नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळीवारा तसेच विज गर्जना व एक ते दोन ठिकासणी मुसळधार पाऊसाचा इशारा दिलेला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विज गर्जना होत असताना शक्यतो घरातच रहावे, मोबाईल फोन बाळगू नये, घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी, पाऊस व विजा होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, तसेच नदी, नाले, दुथळी वाहत असतात तेव्हा पाणी पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहत असते अशा वेळी चुकूनही तो पुल किंवा रस्ता चालत किंवा गाडी मधुन ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, ही आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊस