शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नागपुरात ‘निपाह’च्या पार्श्वभूमीवर ‘अलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 10:42 IST

केरळमध्ये घातक आणि अत्यंत दुर्मीळ अशा निपाह विषाणू संसर्गाचा रुग्ण नुकताच आढळून आला आहे. यातच विविध जिल्ह्यातील ३११ संशयित रुग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाने दिले खबरदारीचे आदेश केरळमधून आलेल्यांनी तपासणी करावी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केरळमध्ये घातक आणि अत्यंत दुर्मीळ अशा निपाह विषाणू संसर्गाचा रुग्ण नुकताच आढळून आला आहे. यातच विविध जिल्ह्यातील ३११ संशयित रुग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्र आरोग्य सेवा संचालनालयाने या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या खबरदारीचे आदेश दिले आहेत. नागपुरात शासकीयसह खासगी रुग्णालयांना अलर्ट करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने या रोगाची माहिती, लक्षणे, निदान व प्रतिबंधात्मक खबरदारीचे पत्रक सर्व उपसंचालक कार्यालयांना पाठविले आहे.निपाह मेंदुज्वराचे रुग्ण पहिल्यांदा १९९८ मध्ये क्वालालम्पूरजवळील निपाह या गावी दिसून आले. नंतर हा रोग इतर गावात आणि सिंगापूरलाही पसरला. नंतर तो डुकराचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना झाला. त्यावेळी २६५ रुग्णांची नोंद झाली होती. यातील १०४ रुग्ण बळी पडले होते. २००१ मध्ये सिलिगुडी येथे ६६ रुग्णांची नोंद झाली होती. तर गेल्या वर्षी म्हणजे, १७ मे २०१८ रोजी केरळ येथील २७ वर्षाच्या रुग्णामध्ये या रोगाचे निदान झाले. दुसºयाच दिवशी त्याचे वडील आणि आत्याही याच रोगाच्या प्रादुर्भावाने दवाखान्यात दाखल झाले. केरळमधील कोझीकोड जिल्ह्यात झालेल्या निपाह मेंदुज्वराच्या उद्रेकामध्ये १९ रुग्णांपैकी १७ रुग्ण मृत्युमुखी पडले होते. आता पुन्हा ३० मे रोजी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला या रोगाचा संसर्ग झाल्याने खळबळ उडाली. सोबतच विविध जिल्ह्यातील ३११ संशयित रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्राला या रोगापासून फारसा धोका नसला तरी खबरदारी म्हणून निपाहसदृश आजाराचे (मेंदुज्वर) सर्वेक्षण सर्व स्तरावर करणे, प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना करण्याचे आदेश आरोग्य सेवा संचालनालय, पुणे यांनी दिले आहेत. या संदर्भातील एक पत्र राज्यातील सर्व उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठविण्यात आले आहेत.

असा होतो निपाह विषाणूचा प्रसारनिपाह विषाणूचा प्रसार हा मुख्यत्वे फळांवर जगणाऱ्या वटवाघळांच्या मार्फत होतो. वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने किंवा खाल्ल्याने हा आजार होतो. डुक्कर आणि इतर पाळीवर प्राणी यांना देखील याची बाधा होऊ शकते. या विषाणूची लागण माणसांपासून माणसांना होऊ शकते. रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांनाही लागण होण्याचा धोका असतो. हा रोग अतिशय लागट आहे. या रोगाचा विषाणुबाधित ताडी प्याल्यामुळेसुद्धा माणसामध्ये संसर्ग होतो. जागतिक टॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले, रेबीजनंतर सर्वात घातक असलेल्या निपाह मेंदूज्वराचे मृत्यूचे प्रमाण ५० ते ७५ टक्के एवढे आहे. या भयंकर रोगाकरिता औषध नाही आणि प्रतिबंधक लसदेखील नाही. रोग कमी प्रमाणात दिसतो. परंतु घातक आहे. कारण, लक्षणे दिसताच सात दिवसांत रुग्ण दगावण्याची शक्यता असते. औषधी नसल्यामुळे या रोगापासून बचाव करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.संशयित रुग्णांना स्वतंत्र कक्षात ठेवाताप, डोकेदुखी, झोपाळलेपण, मानसिक गोंधळ उडणे, शुद्ध हरपणे ही निपाह रोगाची लक्षणे आहेत. आरोग्य विभागाने अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना, जपानी मेंदूज्वर असलेल्या किंवा निगेटिव्ह आलेल्या रुग्णांना, याशिवाय गेल्या तीन आठवड्यात केरळमध्ये विशेषत: एर्नाकुलम परिसरात, ईशान्य भारतात किंवा बंगाल देश किंवा सीमेलगतच्या भागात प्रवास केलेल्यांना किंवा इतिहास असलेल्यांमध्ये लक्षणे दिसताच संशयित रुग्ण म्हणून गृहित धरावे. रुग्णास स्वतंत्र कक्षात भरती करावे. रुग्णाचे नमुने ‘एनआयव्ही’ पुणे येथे पाठवावे, अशा सूचनाही आरोग्य विभागाने केल्या आहेत.

केरळ येथून आलेल्यांनी खबरदारी म्हणून डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायला हवी. निपाह रोगाची मिळतीजुळती लक्षणे दिसताच आरोग्य विभागाशी संपर्क साधायला हवा. सध्या तरी राज्यात या आजाराच्या रुग्णाची नोंद नाही. परंतु लोकांनी भीती न बाळगता जागरूक राहणे आवश्यक आहे. निपाह विषाणूविषयी आरोग्य सेवा संचालकांनी मार्गदर्शक तत्त्वे पाठविली आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयांना याविषयी ‘अलर्ट’ करण्यात आले आहे.-डॉ. संजय जयस्वाल, उपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर मंडळ

टॅग्स :Healthआरोग्य