शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

अजनी रेल्वे पूल ठरू शकतो धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 00:33 IST

अजनी रेल्वे पूल खूप जुना आहे. ११० वर्षांच्या वर या पुलाचे आयुष्य झाले आहे. १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर इंग्रजांनी रेल्वेला पत्र पाठवून या पुलाचे आयुष्य संपल्याची माहिती दिली. परंतु अद्यापही दुसरा पूल तयार न केल्यामुळे या पुलावर कधी अपघात होईल याची शाश्वती नाही.

ठळक मुद्दे ११० वर्षे पूर्ण : त्वरित पर्यायी व्यवस्थेची गरज

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अजनी रेल्वे पूल खूप जुना आहे. ११० वर्षांच्या वर या पुलाचे आयुष्य झाले आहे. १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर इंग्रजांनी रेल्वेला पत्र पाठवून या पुलाचे आयुष्य संपल्याची माहिती दिली. परंतु अद्यापही दुसरा पूल तयार न केल्यामुळे या पुलावर कधी अपघात होईल याची शाश्वती नाही.अजनी रेल्वे पूल हा पूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी महत्त्वाचा पूल होता. परंतु मानेवाडा, बेसा, हुडकेश्वर परिसरात नागरिकांची संख्या वाढल्यामुळे या पुलावरून जाणाºया वाहनांमध्ये वाढ झाली. पुलाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर इंग्रजांनी रेल्वेला पत्र लिहून त्वरित पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना केली. परंतु रेल्वे तसेच महानगरपालिकेच्या वतीने तात्पुरती डागडुजी करून हा पूल वाहतुकीसाठी सुरू आहे. त्यामुळे हा पूल कधीही कोसळण्याची भीती अनेकांनी यापूर्वी व्यक्त केली आहे. पुलाच्या खालील भागाची डागडुजी रेल्वेच्या वतीने तर वरील भागाची काळजी महानगरपालिकेतर्फे घेण्यात येते. तात्पुरती काळजी घेतल्यामुळे प्रश्न सुटणार नसून नवा पूल तयार करण्याची मागणी होत आहे.अजनी रेल्वे पूल खूप जुना आहे. वरील भागाची काळजी महापालिकेच्या वतीने घेण्यात येत आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत आम्ही पुलाची काळजी घेत आहोत.लीना उपाध्ये, मुख्य अभियंता महापालिकाअजनी रेल्वे पुलावर कधीही अपघात होऊ शकतो. त्यामुळे रेल्वे गाड्यांची वाहतूक बंद पडू शकते. रेल्वेने पाठपुरावा करून महापालिका आणि राज्य शासनाच्या वतीने कारवाई करण्याची गरज आहे.हबीब खान, कार्यकारी अध्यक्ष, नॅशनल रेल्वे मजदूर युनियनअजनी रेल्वे पुलाची रेल्वेच्या वतीने नियमित देखभाल करण्यात येते. सध्या पुलाची परिस्थिती चांगली आहे. गरज भासल्यास आम्ही पुलाची डागडुजी करतो.एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर